शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ५१५ बालके कुपोषित

By admin | Updated: January 23, 2016 02:06 IST

कुपोषणमुक्तीकरिता शासनाकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहे.

एनआरसी केंद्राची स्थापना : पोषण आहाराच्या योजनांनंतरही लक्ष्य असाध्यचप्रशांत हेलोंडे वर्धाकुपोषणमुक्तीकरिता शासनाकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहे. विविध पोषण आहाराच्या योजना राबविल्या जात आहेत; पण कुपोषणातून मुक्ती मिळताना दिसत नाही. जिल्ह्यात यावर्षीही ५१५ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. या बालकांकरिता आता पुनर्वसन केंद्र (एनआरसी) स्थापन करण्यात आले आहे. यातून कुपोषित बालक व त्यांच्या मातांना सेवा पुरविली जाणार आहे.कुपोषणातून मुक्ती मिळविण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आरोग्य यंत्रणेसह अंगणवाड्यांतून कुपोषित बालके व त्यांच्या मातांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुपोषित बालकांना अंगणवाड्यांतून वेगळ्या प्रकारचा पोषण आहार पुरविला जातो. शिवाय त्यांच्या मातांनाही आहार व उपचार दिले जातात. या संपूर्ण सुविधा मोफत पुरविल्या जातात. आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून अंगणवाडी केंद्रात जाऊन कुपोषित बालकांची तपासणी केली जाते. तालुकास्तरावर कुपोषित बालकांच्या सुश्रूषेकरिता व्हीसीडीसी केंद्र आहे. या बाल उपचार केंद्रात सौम्य व मध्यम गटातील कुपोषित बालक व मातेला तपासणी करीत पोषण आहार दिला जातो.यानंतर तीव्र गटातील बालकांकरिता जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरसी केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. यात कुपोषित बालक व त्यांच्या मातांना १४ दिवस भरती करून घेतले जाते. या १४ दिवसांची मजुरी सदर मातेला मिळते. शिवाय बालक व मातेची दररोज तपासणी होते. त्यांना पोषण आहार दिला जातो. तज्ञांकडून बालकाचे दररोज वजन व उंची मोजली जाते. १४ दिवसांत बालकाचे वजन १५ टक्केपेक्षा अधिक वाढले तर मग त्यांना सुटी दिली जाते. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातही एनआरसी केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्रांतर्गत कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात कुपोषणातून पूर्णत: मुक्ती मिळाली नसली तरी त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात सॅम (तीव्र) प्रकारात १०७ तर मॅम (मध्यम) गटातील ४०८ बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. यातही सर्वाधिक ११२ कुपोषित बालकांची नोंद कारंजा तालुक्यात झाल्याचेही आरोग्य यंत्रणेद्वारे कळविण्यात आले आहे.आता प्रत्येक जिल्हा रुग्णालयात पुनर्वसन केंद्रराज्य शासनाने कूपोषणमुक्तीकरिता एनआरसी केंद्राची स्थापना केली आहे. प्रारंभी राज्यातील केवळ आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये या केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. या केंद्रातून प्रायोगिक तत्वावर कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात बऱ्यापैकी यश आल्याने आता प्रत्येक जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये एनआरसी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार देणे व त्यांच्यावर उपचार करणे सोईचे झाले आहे.