शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

यंदा ५१५ बालके कुपोषित

By admin | Updated: January 23, 2016 02:06 IST

कुपोषणमुक्तीकरिता शासनाकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहे.

एनआरसी केंद्राची स्थापना : पोषण आहाराच्या योजनांनंतरही लक्ष्य असाध्यचप्रशांत हेलोंडे वर्धाकुपोषणमुक्तीकरिता शासनाकडून आरोग्य विभाग, अंगणवाड्या तसेच अन्य विभागांमार्फत प्रयत्न होत आहे. विविध पोषण आहाराच्या योजना राबविल्या जात आहेत; पण कुपोषणातून मुक्ती मिळताना दिसत नाही. जिल्ह्यात यावर्षीही ५१५ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. या बालकांकरिता आता पुनर्वसन केंद्र (एनआरसी) स्थापन करण्यात आले आहे. यातून कुपोषित बालक व त्यांच्या मातांना सेवा पुरविली जाणार आहे.कुपोषणातून मुक्ती मिळविण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आरोग्य यंत्रणेसह अंगणवाड्यांतून कुपोषित बालके व त्यांच्या मातांचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुपोषित बालकांना अंगणवाड्यांतून वेगळ्या प्रकारचा पोषण आहार पुरविला जातो. शिवाय त्यांच्या मातांनाही आहार व उपचार दिले जातात. या संपूर्ण सुविधा मोफत पुरविल्या जातात. आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून अंगणवाडी केंद्रात जाऊन कुपोषित बालकांची तपासणी केली जाते. तालुकास्तरावर कुपोषित बालकांच्या सुश्रूषेकरिता व्हीसीडीसी केंद्र आहे. या बाल उपचार केंद्रात सौम्य व मध्यम गटातील कुपोषित बालक व मातेला तपासणी करीत पोषण आहार दिला जातो.यानंतर तीव्र गटातील बालकांकरिता जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात एनआरसी केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. यात कुपोषित बालक व त्यांच्या मातांना १४ दिवस भरती करून घेतले जाते. या १४ दिवसांची मजुरी सदर मातेला मिळते. शिवाय बालक व मातेची दररोज तपासणी होते. त्यांना पोषण आहार दिला जातो. तज्ञांकडून बालकाचे दररोज वजन व उंची मोजली जाते. १४ दिवसांत बालकाचे वजन १५ टक्केपेक्षा अधिक वाढले तर मग त्यांना सुटी दिली जाते. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातही एनआरसी केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्रांतर्गत कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात कुपोषणातून पूर्णत: मुक्ती मिळाली नसली तरी त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात सॅम (तीव्र) प्रकारात १०७ तर मॅम (मध्यम) गटातील ४०८ बालके कुपोषित असल्याचे समोर आले आहे. यातही सर्वाधिक ११२ कुपोषित बालकांची नोंद कारंजा तालुक्यात झाल्याचेही आरोग्य यंत्रणेद्वारे कळविण्यात आले आहे.आता प्रत्येक जिल्हा रुग्णालयात पुनर्वसन केंद्रराज्य शासनाने कूपोषणमुक्तीकरिता एनआरसी केंद्राची स्थापना केली आहे. प्रारंभी राज्यातील केवळ आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये या केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. या केंद्रातून प्रायोगिक तत्वावर कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात बऱ्यापैकी यश आल्याने आता प्रत्येक जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये एनआरसी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहार देणे व त्यांच्यावर उपचार करणे सोईचे झाले आहे.