शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यमराजा..., नेशील तर आम्हा दोघांनाही ने..!

By admin | Updated: March 9, 2016 03:05 IST

तिचे वय ७७ वर्षे. आयुष्याची सायंकाळ झाली तरी जगण्याची इच्छा कायम. कारण एकच. तिचा ४३ वर्षीय अपंग मुलगा.

आईच्या मायेचे जिवंत उदाहरण : आयुष्याच्या सायंकाळीही मुलाच्या उदरनिर्वाहाकरिता देत आहे लढा योगेश वरभे अल्लीपूरतिचे वय ७७ वर्षे. आयुष्याची सायंकाळ झाली तरी जगण्याची इच्छा कायम. कारण एकच. तिचा ४३ वर्षीय अपंग मुलगा. ती गेल्यावर त्याचा कोणी वाली नाही. आता जगायचे ते त्याच्याचसाठी. आयुष्याचा शेवट होईल ही काळ्या दगडावरची रेष. मागणे फक्त एकच.. यमराजा, नेशील तर आम्हा दोघांनाही ने.. मला एकटीला नेऊन माझ्या पोटच्या गोळ्याला उघड्यावर सोडू नको, अशी आर्त हाक येथील अपंग पद्माकरची आई शांताबाई हिची यमराजाला आहे. विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील पद्माकर गोविंद वाघमारे (४३) हा जन्मत:च अपंग आहे. जन्मापासून तो आजपर्यंत रांगतच आला. त्याचा वडिलाचा मृत्यू २००४ मध्ये झाला. तेव्हापासून त्याची आईच त्याचा आधार ठरली. ‘आईच्या प्रेमाला उपमा नाही’ असे म्हणतात. तोच प्रकार येथे घडत आहे. कोणी कर्ता नसल्याने म्हाताऱ्या आईवरच त्याची जबाबदारी. आज तिचे वय ७७ वर्षांवर आहे. तिही केवळ आपल्या मुलाकरिता जगत असल्याचे दिसते. यात जर तिला काही झाले तर या पद्माकरचे काय असा प्रश्न समोर येतो. आता म्हातारपणामुळे शरीर साथ देत नाही. आजारातही या दोघांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तिच्याच माथी. यामुळे ‘दिनानाथा आम्हा कोण वाली’ असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ आली. यामुळे आम्हा माय लेकांना एकाच दिवशी घेवून जा अशी आर्त हाक पद्माकरची आई देत असल्याचे तिच्या बोलण्यातून दिसते. शासनाच्यावतीने अनेक योजना अस्तित्वात असल्या तरी त्याचा लाभ या लाभार्थ्यांना होत नाही. येथील पद्माकरसारखे अनेक असे जीवन जगत आहेत. त्यांच्या उद्धाराकरिता शासनाच्यावतीने काही ठोस निर्णय घेण्याची गरज वर्तविल्या जात आहे. त्यांना शासनाच्या योजनातून जगण्याच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे. अपंग-निराधार योजनांपासून ग्रामीण लाभार्थी दूरचअपंग, निराधारांना जीवन जगताना आधार मिळावा, त्यांची हेळसांड थांबावी याकरिता शासनाच्यावतीने अनेक योजना अंमलात आणल्या. या योजनांचा लाभ घेण्याकरिता शासनाच्यावतीने असलेल्या कागदांच्या शर्यतीत ग्रामीण भागातील अनेक अपंग व निराधार मागे राहत असल्याने त्यांच्यावर वेठबिगारीचे जीणे आले आहे. जीवन व्यतित करताना अनेकांनी अखेर माधुकरी स्वीकारली असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाच्या योजना येथे कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे.