शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

लेखा कर्मचाऱ्यांचे सातव्या दिवशी लेखणीबंद आंदोलन सुरूच

By admin | Updated: March 22, 2017 00:58 IST

जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे.

खासदारांनी जाणून घेतल्या समस्या : पाठपुरावा करण्याचे दिले आश्वसन वर्धा : जिल्हा परिषदेतील लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. सातव्या दिवशीही आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने मंगळवारी सदर आंदोलन सुरू होते. मंगळवारी दुपारी खासदार रामदास तडस यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मागण्यांचा निकाली निघाव्या यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सावत्रपणाची वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी जि.प.तील लेखा कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला काळी फित लावून निषेध आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जि. प. लेखा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशीष दहिवडे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी योग्य पावले न उचलल्यास लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने १५ मार्च २०१७ पासून जि. प. च्या आवारात लेखा कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांवर योग्य तोडगा न निघाल्याने मंगळवारी सातव्या दिवशी सदर आंदोलन सुरूच होते. मंगळवारी दुपारी खा. रामदास तडस यांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी खासदार तडस यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या. त्यावर खासदारांनी जि.प.तील लेखा कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या निकाली निघण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच नगराध्यक्ष अतुल तराळे यांनीही लेखा कर्मचाऱ्यांच्या आंदोलन स्थळी जावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मार्च महिन्यात प्रत्येक शासकीय कार्यालयात कामाचा व्याप वाढतो. जिल्हा परिषदेतही कामाचा व्याप जास्त असतो. या आंदोलनामुळे जि.प.तील कामे खोळंबली आहे.(शहर प्रतिनिधी)