दहेगाव येथील घटना : चारित्र्यावर संशय घेत पतीचा पत्नीवर हल्ला दहेगाव (गो.) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर प्राणघातक हल्ला करीत विळ्याने शरीरभर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली असून सेवाग्राम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मनाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवाररी रात्री २ वाजताच्या च्या सुमारास घडली. तानाबाई बाल्या जगताप (३२) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ाती बाल्या राणू जगताप रा. धपकी, नाथजोगी बेडा याला अटक करण्यात आली आहे. पोलीस सुत्रानुसार, तानाबाई आणि बाल्या या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. बाल्या हा नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्यांच्या वाद होत होते. याच कारणाने दोन वर्षांपासून ती माहेरी राहत होती. आठ दिवसाआधी आपसी समझोत्यावरुन ती पतीसोबत धपकी येथे आली. काही दिवसात बाल्याने पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली. यामुळे त्यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळला. सोमवारच्या रात्रीही बाल्याने तानाबाईच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने बाल्याने रागाच्या भरात विळ्याने तानाबाईच्या छातीवर, पोटावर, पाठीवर, मांड्यांवर वार केले. यामुळे गंभीर परिस्थितीत तिला तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. तिच्या बयानावरुन तसेच तिचा भाऊ दिलीप उकंडराव शिंदे (४0) रा. विटाळा ता.सेलू, जि.वर्धा याच्या तक्रारीवरुन बाल्यावर भादंविच्या कलम ३0७ अन्वये गुन्हा दाखल केला. बाल्याला अटक करण्यात असून तपास ठाणेदार खंडारे यांच्या मार्गदर्शनात जमादार मडावी, शिपाई रणजीत जाधव, रवी पुरोहित, संघपाल इंगोले, वांदीले करीत आहे.(वार्ताहर)
विळ्याने वार करून केले जखमी
By admin | Updated: May 27, 2014 23:53 IST