शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

दारूमुक्त भारतासाठी विश्वशांती पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:15 IST

महात्मा गांधींनी दारुमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे ते स्वप्न साकार करण्यासोबतच त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवून विश्वात शांती निर्माण करण्यासाठी विश्वशांती पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा रविावारी सेवाग्राम आश्रमात नतमस्तक होऊन पुढील प्रवासाकरिता निघाली.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमाला भेट : यात्रेकरूंचे सूतमालेने स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: महात्मा गांधींनी दारुमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे ते स्वप्न साकार करण्यासोबतच त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवून विश्वात शांती निर्माण करण्यासाठी विश्वशांती पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा रविावारी सेवाग्राम आश्रमात नतमस्तक होऊन पुढील प्रवासाकरिता निघाली.महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवा निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी १२ जानेवारीला पुण्यातून या विश्वशांती पदयात्रेला सुुरुवात झाली. देशातील युवक-युवती ही देशाची ताकद असल्याने बापू व बा च्या जीवनकार्याचा संदेश देशाकरिता आवश्यक आहे. तो संदेश पोहचविण्याचे काम या यात्रेत सहभागी असलेले योगेश माथुरिया, आश्रमचे जालंधरनाथ, गणेश सूर्या, गिरीश कुलकर्णी व अ‍ॅड. शाम आसवा करीत आहे. रविवारी ही यात्रा आश्रमात पोहचल्यावर आश्रमच्या ज्येष्ठ गांधीवादी कुसूम पांडे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, सचिन हूड यांनी सुतमाळेने यात्रेकरुंचे स्वागत केले. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना व भजन करण्यात आले. यावेळी जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गुजर, अभिमन्यू भारतीय, भाई रजनीकांत, संदेश राऊत, पंडित चन्नोळे, आकाश लोखंडे, दिनेश गणवीर, रामसिंह बघेल, रुपेश कडू, अशोक वहिवटकर, इस्लाम हुसैन, प्रभा शहाने, सोनू उंबरकर, सुचित्रा झाडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जालंधरनाथ म्हणाले की, नुकतीच द. आफ्रिकेत पदयात्रा करुन आलो. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ते बांग्लादेश व जपान अशी यात्रा करीत आहे.गांधी १५० हे औचित्य असले तरी त्यांच्या विचायाची गरज आहे. अकरा वर्षापासून पदयात्रेच्या माध्यमातून बापू व बा यांचा संदेश पोहचविण्याचे कार्य करीत आहे. बापूंनी मेरा जीवन ही संदेश है, असे म्हटले. त्यानुसार ‘मेरे हाथ ही मेरा संदेश है’. आता हातावरील संदेश माझे जीवन बनले आहे, असेही ते म्हणाले. ही यात्रा आता सेवाग्राम, तरोडा, भिवापूर, रायपूर, छत्तीसगड, ओडिसा, बंगाल, बांगलादेश, जपान अशा सतरा देशात फिरणार असून २१ सप्टेंबर २०२० ला विश्वशांती दिवसाला जिनेव्हा येथे यात्रेचा समारोप होणार आहे. आतापर्यंत ८१३ कि.मी.चा प्रवास केल्याचे यात्रेकरु योगेश माथुरिया यांनी सांगितले. 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम