शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

बालकांचे विश्व सुंदर आणि कल्पक असते

By admin | Updated: February 8, 2016 02:20 IST

बालकांचे सुंदर आणि कल्पक असे विश्व असते. त्यात ते रमत असतात. गमत असतात. जे दिसते त्याला बघत, समजून घेत त्याच्यात सामावले जातात.

सुगन बरंठ : नई तालीमच्या प्रांगणात बाल महोत्सव व शिक्षक मेळावासेवाग्राम : बालकांचे सुंदर आणि कल्पक असे विश्व असते. त्यात ते रमत असतात. गमत असतात. जे दिसते त्याला बघत, समजून घेत त्याच्यात सामावले जातात. निखळ, निकोप आणि कोमल बालपण जिज्ञासा, उत्सुकता, उत्साह आणि निरागसता घेऊन आपलं जग विकसित करीत असतात. गरज असते ती, त्यांना संधी व मुक्तता देण्याची. अशीच संधी नई तालीमच्या गुणवत्तापूर्ण सार्थक अभियानांतर्गत मुलांना व शिक्षकांना प्राप्त झाली आहे, असे मत नई तालिमचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी व्यक्त केले. ‘घेऊ या का गगन भरारी...’ या बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्याचे आयोजन नई तालीम आश्रम परिसरात करण्यात आले. नई तालीम समिती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांतून बजाज समूहाच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषणात मुलांना विविध गोष्टी सांगत बरंठ यांनी बालकांचे अंतरंग समजून घेत संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ. किरण धांदे, शिक्षणाधिकारी धनराज तेलंग, प्राचार्य सुषमा शर्मा, ज्येष्ठ अधिव्याख्याता नितू डंभारे, प्रा. सीमा पुसदकर, प्रा. उर्मिला हाडेकर, डॉ. शिवचरण ठाकूर, संयोजक प्रभाकर पुसदकर तसेच ३६ शाळांतील ८७ शिक्षक उपस्थित होते.‘पहाडी पर पेड था...’ या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मुलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच वर्धा जिल्ह्याच्या नकाशाचे त्या-त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी रंग भरून उद्घाटन केले. या सत्रात डॉ. बरंठ यांनी श्रमाच्या आधारावर व्यक्तीच्या अस्मितेचे विभाजन न करता सर्वांशी आदरभाव व सहिष्णुतेने वागण्याबाबत राजाची गोष्ट सांगून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रभाकर पुसदकर यांनी केले तर कार्यक्रमाची भूमिका सीमा पुसदकर यांनी मांडली. संचालन अनुश्री दोडके यांनी केले तर आभार देवेंद्र गाठे यांनी मानले.मुक्त व सहजीवनाचा आनंद, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दृश्यरूप, विविध उपक्रमातून जीवनशिक्षण, शिकण्याचा निखळ व निकोप आनंद, ग्रामीण मुलांना एक्सपोझर या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध उपक्रमांच्या आयोजनातून गांधीजींच्या आश्रमातील सादगी, स्वच्छता आणि रम्यता, गांधीचे विचार आणि शिक्षण, खुला आणि मुक्तपणे शिकण्याचा, सहवास व सहजीवनाचा आनंद व खेळी-मेळीच्या वातावरणात २१ विविध स्टॉल्सच्या माध्यमातून शिकणे आणि शिकविणे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय मातीकाम, चाककाम, किरीगामी, ओरीगामी, विज्ञान खेळणी, चित्र काढणे, वारली पेटींग, कापडावरील चित्रे, सामूहिक नृत्य, लोक नृत्य, सामूहिक गाणी, ग्रिटींग व सजावट, क्वॉलिंग, सर्प विज्ञान, पपेट शो, विविध वेशभूषा, चेहरा रंगविणे, रिंग घालून फिरणे, गाढवाचं शेपूट, फेटे बांधणे, कोलाज बनविणे आणि मैदानी खेळ अशा विविध कार्याची पर्वणीच मुलांकरिता खुली करण्यात आली होती. कुणीही कुठेही जाऊन मुक्तपणे शिकू शकत होते. महोत्सवाला शिवचरण ठाकूर, लक्ष्मी काकडे, ज्योत्स्ना वरघट, अनिल पेंदाम, संजय भगत, नीता माथनकर, अनुश्री दोडके, अश्विनी कचवे आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)टाकाऊ वस्तूपासून विविध मॉडेल्सकार्यक्रमाच्या अनुषंगाने कर्नाटक येथील डॉ. एचकेएस स्वामी यांनी टाकावू वस्तूपासून बनविलेल्या विविध मॉडेल्समधून गांधी विचार आणि व्यवहारातील गोष्टी याबाबत तसेच पर्यावरण जागृतीबाबत मार्गदर्शन केले. सर्प विज्ञान याबाबत प्रभाकर पुसदकर व आशिष गोस्वामी यांनी स्लाईड शो फिल्मच्या माध्यमातून मांडणी केली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध लोकनृत्ये आणि नाटके सादर केली. समारोप लहानपणाच्या आठवणींना उजाळा देत बाहुला-बाहुलीचे लग्न लावून करण्यात आला. सर्व मुलांनी त्यात भाग घेतला आणि सामूहिक नृत्य सादर केले. प्रत्येक मुलांना हाथकागदाची बॅग आणि बालपत्रिका भेट देण्यात आली. बाल महोत्सव व शिक्षक मेळाव्यानिमित्त दिपोत्सवाचा कार्यक्रमही घेण्यात आला. यासाठी प्रत्येक शाळेने पणत्या आणल्या होत्या. विविध उपक्रमामुळे बाल महोत्सव रंगला.