शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

जगाला युद्ध नकोच; बुद्ध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:53 IST

महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वाचनालय व रमाई महिला मंडळ दुरगडाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वाचनालय व रमाई महिला मंडळ दुरगडाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाटचे अध्यक्ष अनिल जवादे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भदन्त राजरत्न, विशाल मानकर, पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, मुकुंद नाखले, सुनील ढाले यांची उपस्थिती होती.राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी काम केले. जगातला मानवतावादी धम्म दिला. जो मानवा मानवामध्ये भेद न करता मानवा मानवाला जोडतो. त्यांनी १४ आॅक्टोबर १९५६ ला नागाच्या नागभूमित बौद्ध धम्माची दिक्षा दिली. तो कल्याणाचा धम्म प्रत्येक बौद्धांनी आत्मसात करून धम्माचा प्रचाार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. कारण धम्म कितीही चांगला असेल; पण त्याचा प्रचार आणि प्रसार करणारेच नसतील तर तो धम्म नष्ट पण होवू शकतो. यासाठी प्रत्येक बौद्ध बांधवांनी धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम करावे, असे त्यांनी सांगितले.अनिल जवादे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या मातृसंघटना भारतीय बौद्ध महासभेचे सभासद होवून धम्म चळवळ अधिक बळकट करावी असे आवाहन केले. तर भदन्त राजरत्न यांनी बुद्धाचा धम्म आधी, मध्य आणि अंतही कल्याणकारी आहे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमात ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात चंद्रशेखर भुजाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद नाखले यांनी केले. संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार चंद्रशेखर भुजाडे यांनी मानले. त्यानंतर आशीषकुमार मून व वैशाली कांबळे यांचा बुद्ध व भीम गितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत संयोजक जयंत फुलझेले, नारायण चिकराम, गौरव डबले, नितेश मून, ज्ञानोबा थूल, दिलीप शेंडे, योगिराज बागेश्वर, सुधाकर आत्राम, रामभाऊ निरगुडे, सुरज मून, प्रशिल तेलतुंंबडे, प्रशिल पाटील, चंदू ढाले, रमाई महिला मंडळ भिडी आदींनी सहकार्य केले.