शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

जगाला युद्ध नकोच; बुद्ध हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:53 IST

महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वाचनालय व रमाई महिला मंडळ दुरगडाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म आहे. आज बदलत्या परिस्थितीमध्ये जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. बौद्ध धम्मातच जगाचे कल्याण आहे, असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (मुंबई) यांनी रमाबाई सार्वजनिक वाचनालय व रमाई महिला मंडळ दुरगडाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केले.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाटचे अध्यक्ष अनिल जवादे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भदन्त राजरत्न, विशाल मानकर, पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, मुकुंद नाखले, सुनील ढाले यांची उपस्थिती होती.राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी काम केले. जगातला मानवतावादी धम्म दिला. जो मानवा मानवामध्ये भेद न करता मानवा मानवाला जोडतो. त्यांनी १४ आॅक्टोबर १९५६ ला नागाच्या नागभूमित बौद्ध धम्माची दिक्षा दिली. तो कल्याणाचा धम्म प्रत्येक बौद्धांनी आत्मसात करून धम्माचा प्रचाार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. कारण धम्म कितीही चांगला असेल; पण त्याचा प्रचार आणि प्रसार करणारेच नसतील तर तो धम्म नष्ट पण होवू शकतो. यासाठी प्रत्येक बौद्ध बांधवांनी धम्म प्रचार आणि प्रसाराचे काम करावे, असे त्यांनी सांगितले.अनिल जवादे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या मातृसंघटना भारतीय बौद्ध महासभेचे सभासद होवून धम्म चळवळ अधिक बळकट करावी असे आवाहन केले. तर भदन्त राजरत्न यांनी बुद्धाचा धम्म आधी, मध्य आणि अंतही कल्याणकारी आहे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमात ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात चंद्रशेखर भुजाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद नाखले यांनी केले. संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार चंद्रशेखर भुजाडे यांनी मानले. त्यानंतर आशीषकुमार मून व वैशाली कांबळे यांचा बुद्ध व भीम गितांचा बहारदार कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत संयोजक जयंत फुलझेले, नारायण चिकराम, गौरव डबले, नितेश मून, ज्ञानोबा थूल, दिलीप शेंडे, योगिराज बागेश्वर, सुधाकर आत्राम, रामभाऊ निरगुडे, सुरज मून, प्रशिल तेलतुंंबडे, प्रशिल पाटील, चंदू ढाले, रमाई महिला मंडळ भिडी आदींनी सहकार्य केले.