शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बापू व बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:24 IST

हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी याच ठिकाणावरून सूत्र हलविली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा दिला आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : पालिकेच्या कार्यक्रमात दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी याच ठिकाणावरून सूत्र हलविली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा दिला आहे. दुसरीकडे राज्यघटनेच्या माध्यमातून देशवासियांना चाकोरीविरूद्ध जीवन प्रदान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राज्याचे रहिवासी राहिले आहे. त्यामुळे बापू व बाबासाहेब या दोन्ही महामानवाच्या स्मृती जोपासण्यासाठी सेवाग्राम येथे जागतिक दर्जाचे स्मारक करण्यासाठी प्रयत्न होत आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. डॉ. आंबेडकर ग्रंथालयाचे लोकार्पण व उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.नगर परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती विद्या भुजाडे, टायगर सेनेचे दादा शेळके, गटनेता शोभा तडस, न.प. सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनिता ताडाम, सुनिता बकाणे, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व प्रदीप वानखेडे यांची उपस्थिती होती.खा. तडस पुढे बोलताना म्हणाले, उच्च शिक्षणापासून वंचित ठरलेल्या समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची व राहण्याची सोय म्हणून याठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या नावाने वसतीगृहाची निर्मिती केली जाणार आहे. या ग्रंथालयाला आधी सुसज्ज करण्यासाठी तसेच डॉ. आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी १० लाखांचा खासदार निधी दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.याप्रसंगी डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात ग्रंथालयाचे लोकार्पण तसेच उद्यानाचे भूमिपूजन खा. तडस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात प्रा. मदनकर, शेळके व वानखेडे यांनीही विचार व्यक्त केले. सिने अभिनेत्री अंजली भारती यांचा बुद्ध, फुले, शाहू तसेच भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. संचालन माजी नगरसेवक रितेश लोखंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंशुल कांबळे यांनी मानले.कार्यक्रमाला न.प. सदस्य मारोती मरघाडे, संगीता तराळे, अब्दुल नईम, तसेच भाजपाचे महामंत्री दशरथ भुजाडे, मारोती लोहवे, आनंद सांडे, अवधूत बेंदले, सुरेश ताकसांडे तसेच न.प. अधिकारी कर्मचारी नागरिकांची उपस्थिती होती.सेवाग्राम विकास आराखड्यातून अनेक कामेमहात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी जिल्ह्यात आहेत. त्या आठवणी देशाना प्रेरणा देणाऱ्या आहेत. या आठवणींना उजाळा देण्याकरिता आणि त्याची माहिती सर्वसामान्यांना होण्याकरिता जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यातून मोठ्या प्रमाणात काम सुरू असून तो प्रकल्प पूर्णत्त्वास जात आहे.