शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बापू व बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:24 IST

हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी याच ठिकाणावरून सूत्र हलविली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा दिला आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : पालिकेच्या कार्यक्रमात दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : हा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी त्यांनी याच ठिकाणावरून सूत्र हलविली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा दिला आहे. दुसरीकडे राज्यघटनेच्या माध्यमातून देशवासियांना चाकोरीविरूद्ध जीवन प्रदान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राज्याचे रहिवासी राहिले आहे. त्यामुळे बापू व बाबासाहेब या दोन्ही महामानवाच्या स्मृती जोपासण्यासाठी सेवाग्राम येथे जागतिक दर्जाचे स्मारक करण्यासाठी प्रयत्न होत आहे, अशी माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. डॉ. आंबेडकर ग्रंथालयाचे लोकार्पण व उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.नगर परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती विद्या भुजाडे, टायगर सेनेचे दादा शेळके, गटनेता शोभा तडस, न.प. सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनिता ताडाम, सुनिता बकाणे, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व प्रदीप वानखेडे यांची उपस्थिती होती.खा. तडस पुढे बोलताना म्हणाले, उच्च शिक्षणापासून वंचित ठरलेल्या समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची व राहण्याची सोय म्हणून याठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या नावाने वसतीगृहाची निर्मिती केली जाणार आहे. या ग्रंथालयाला आधी सुसज्ज करण्यासाठी तसेच डॉ. आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी १० लाखांचा खासदार निधी दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.याप्रसंगी डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात ग्रंथालयाचे लोकार्पण तसेच उद्यानाचे भूमिपूजन खा. तडस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात प्रा. मदनकर, शेळके व वानखेडे यांनीही विचार व्यक्त केले. सिने अभिनेत्री अंजली भारती यांचा बुद्ध, फुले, शाहू तसेच भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. संचालन माजी नगरसेवक रितेश लोखंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अंशुल कांबळे यांनी मानले.कार्यक्रमाला न.प. सदस्य मारोती मरघाडे, संगीता तराळे, अब्दुल नईम, तसेच भाजपाचे महामंत्री दशरथ भुजाडे, मारोती लोहवे, आनंद सांडे, अवधूत बेंदले, सुरेश ताकसांडे तसेच न.प. अधिकारी कर्मचारी नागरिकांची उपस्थिती होती.सेवाग्राम विकास आराखड्यातून अनेक कामेमहात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी जिल्ह्यात आहेत. त्या आठवणी देशाना प्रेरणा देणाऱ्या आहेत. या आठवणींना उजाळा देण्याकरिता आणि त्याची माहिती सर्वसामान्यांना होण्याकरिता जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यातून मोठ्या प्रमाणात काम सुरू असून तो प्रकल्प पूर्णत्त्वास जात आहे.