शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यामुळे कार्यालयीन कामांचा खेळखंडोबा

By admin | Updated: November 7, 2016 00:50 IST

विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामांचा खोळंबा होतो

मुख्यालयी राहण्याचा नियम शासकीय कर्मचाऱ्यांकडून पायदळी पुलगाव : विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कार्यालयीन कामांचा खोळंबा होतो. याकरिता शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा नियम तयार केला. मात्र जिल्ह्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे चित्र आहे.नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याने ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसते. रेल्वेस्थानक, बसस्थानक येथे सकाळी ९ ते १० च्या सुमारास प्रवासी कर्मचाऱ्यांची गर्दी पाहिली तरी अंदाज येतो. घटनादुरुस्तीमुळे प्रशासकीय यंत्रणेला बळकटी येईल, अशी वल्गना केली जात असताना ग्रामविकास अधिकारी, महसूल यंत्रणेतील तलाठी, जिल्हा परिषदेचे शिक्षक, वनविभाग, जलसंधारण, पाटबंधारे, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा पुरवठा विभाग, समाजकल्याण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय, हिवताप विभाग, खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील अशा विविध सरकारी, निमसरकारी विभागातील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेर गावावरुन नित्याने ये-जा करताना दिसतात. त्यामुळे कामाची वेळ ही अर्ध्यावरच येते. कार्यालयीन वेळ प्रवासात जात असल्याने कामाचा खेळखंडोबा होतो. कामानिमित्त तालुकास्थळी आलेल्या नागरिकांना अडचणींना सामना करावा लागतो. शासनाच्या अधिनियमाद्वारे कर्मचाऱ्यांना सेवा, शिस्त, वर्तणूक अशा कर्तव्याचा मापदंड घालून दिला असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्याला छेद दिला जात आहे. कित्येक जण मुख्यालयी राहत नसताना घरभाडे भत्ता घेत असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करुन कारवाई केल्यास याला चाप बसेल. तसेच सर्वसामान्यांची कामे त्वरीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)