शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी कामगारांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2015 01:31 IST

दिवाळी हा महत्त्वाचा सण बुधवारी साजरा होत आहे. असे असताना कामगारांना आॅगस्ट महिन्यापासून वेतन मिळाले नाही.

पूर्ती शुगर अ‍ॅण्ड पॉवरचा प्रकार : चार महिन्यांचे वेतन थकीत, बोनसही नाहीआकोली : दिवाळी हा महत्त्वाचा सण बुधवारी साजरा होत आहे. असे असताना कामगारांना आॅगस्ट महिन्यापासून वेतन मिळाले नाही. कंपनी कायद्यानुसार बोनसही दिला गेला नाही. शिवाय दरवर्षी वाटप होणारी प्रती कामगार दहा किलो साखरही देण्यात आली नाही. यामुळे मंगळवारी सकाळी कामगारांनी काम बंद करून कार्यालयाच्या गेटपुढे ठिय्या आंदोलन केले.दिवाळी वर्षातील सर्वात मोठा समजला जाणारा महत्त्वाचा सण आहे; पण पूर्ती प्रशासनाच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे कामगार कुटुंबीयांच्या दिवाळी सणावरच विरजण पडले आहे. पूर्ती शुगर अ‍ॅण्ड पॉवरमधील रोजगारावर शेकडो कुटूंब विसंबून आहे. अवघ्या ५ ते ७ हजार रुपये तुटपुंज्या वेतनावर कामगार आपला कुटुंबाचा गाडा हाकत आहे. आॅगस्ट महिन्यापासून कामगारांचे वेतन थकले. किराणा दुकानदारासह इतरांची देणगी थकली आहे. अशात दिवाळी सणाकरिता दुकानदार उधारीवर किराणा द्यायला तयार नसल्याची व त्यामुळे घरी चटणी-भाकर खाण्याची वेळ आल्याचे कामगारांनी बोलून दाखविले.किमान एक महिन्याचे वेतन द्यावे, कंपनी कायद्यानुसार बोनस द्यावा वा एक महिन्याचे वेतन सानुग्रह मदत म्हणून देण्याची मागणी आहे. या मागण्यांकरिता कामगारांनी कामबंद आंदोलन करीत कंपनीच्या गेटसमोर ठिय्या मांडला. मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला. बुधवारी कंपनीच्या गेटसमोर घरची चटणी-भाकर आणून दिवाळी साजरी करण्याचा मानस कामगारांनी व्यक्त केला. १० किलो साखरेच्या वाटपालाही हरताळपूर्ती शुगर अ‍ॅण्ड पॉवर कंपनीच्या कामगारांना आॅगस्ट महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही. दिवाळी असताना बोनस नाही आणि प्रती कामगार १० किलो साखरही देण्यात आली नाही. यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. थकित वेतनाकरिता मंगळवारी कामगारांनी काम बंद करून गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते; पण कुठलाही तोडगा निघाला नाही.आंदोलनाची माहिती मिळताच पूर्ती समूहाचे कार्यकारी संचालक सुधीर दिवे कारखान्यात दाखल झाले. स्थानिक अधिकारी आणि विभाग प्रमुखांशी चर्चा करण्यात आली; पण आंदोलक कामगारांशी चर्चा करण्यात आली नाही. कारखान्यात दाखल झालेले दिवे कामगारांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा होती; पण कुठलीही बोलणी न करताच ते नागपूरकडे रवाना झाले. या प्रकारामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.