शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे काम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:56 IST

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावरील गेटमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. रेल्वे लाईनमुळे शहरही उत्तर-दक्षिण, असे विभागले गेले आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा धोक्यात क्रॉसिंगजवळ खड्ड्यामुळे अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावरील गेटमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. रेल्वे लाईनमुळे शहरही उत्तर-दक्षिण, असे विभागले गेले आहे. यामुळे उड्डाणपुलाची मागणी होती. दोन वर्षांपूर्वी ती मान्य झाली असून ४५ कोटींच्या पुलाचे काम सुरू झाले; पण गेटजवळ खांबासाठी खोदलेल्या २० फुट खोल खड्ड्यामुळे अपघाताची तथा जलवाहिनी फुटल्यास पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनेक वर्षापासून या उड्डाणपुलाच्या निर्मितीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. जागा, मुख्य बाजारपेठ बांधकामासाठी लागणारा निधी व काही अन्य कारणांनी उड्डाणपुलाचा प्रश्न रेंगाळला होता. यात हैद्राबाद, भोपाळ या मार्गावर जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने कित्येक तास जड वाहनांच्या रांगा लागतात. ही कोंडी सुटावी म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले व हा प्रश्न मार्गी लागला. सध्या ४५ कोटींच्या उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरू झाले आहे. यात राज्य शासन ३५ कोटी तर केंद्र शासनाकडून १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाची लांबी ६५६ मीटर तर रूंदी १२ मीटर राहणार आहे. रेल्वेच्या तीन खांबांसह (पिलर्स) एकूण ३४ खांब आहेत. उड्डाणपूल तीन पदरी आहे. पुलाचा उतार आर्वी नाका व दुसºया बाजूचा उतार कॉटन मील भिंतीवर दक्षिणेकडे पंचधारा रोडकडे निघणार आहे. पुलाच्या ३४ पैकी अनेक खांबांसाठी मोठे खड्डे खोदून खांब उभे करण्याचे, नाल्यावरील पुलाचे काम सुरू आहे; पण रेल्वे क्रॉसिंगजवळ खांबासाठी खोदलेला खड्डा हा पुलगाव-आर्वी मार्गाच्या अर्ध्या भागात आहे. या खड्ड्यात पाणी पुरवठ्याची मुख्य जलवाहिनी आहे. खोदकामामुळे जलवाहिनी उघडी पडली असून तिला तीन जोड आहे. जलवाहिनीला आधार नसल्याने ती फुटून शहराचा पाणीपुरवठा प्रभावित होऊ शकतो. शिवाय अर्धा रस्ता खोदकामात असून उर्वरित रस्त्याने वाहतूक सुरू आहे. खड्ड्यात असलेल्या पाण्यामुळे ओलसर माती घसरल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित विभागाने येथील कंत्राटदारास सूचना दिल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामाकडे बांधकाम विभाग तथा संबंधित कंत्राटदार कंपनीने लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.