शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पवनार येथील पर्यटनस्थळाची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

येथील धाम नदी पात्रात मुरुम टाकल्यानंतर तो वाहून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजुने संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथील मेडीटेशन हॉल, विसर्जन कुंडाची कामे अर्धवट स्थितीत आहे. विसर्जन कुंड तयार असला तरी त्या कुंडाकडे जाणारा रस्ता नसल्याने व कुंडात पाणी भरण्याची व्यवस्था न केल्याने एकाही गणपतीचे विजर्सन होऊ शकले नाही.

ठळक मुद्देसेवाग्राम विकास आराखडा : सौदर्यीकरणाला पर्यावरणप्रेमींचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनारच्या धाम नदी तीरावर दोन्ही बाजूने २६ कोटीच्या विकासकामाची धुमधडक्यात सुरूवात झाली. सौदर्यीकरणाच्या नावाखाली नदीपात्र मुरुम भरुन बुजविण्यात आल्याने यास पर्यावरणप्रेमींकडून मोठा विरोध झाला. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनीही याला विरोध दर्शविला होता. तरीही प्रशासनाकडून काम सुरुच ठेवले. पण, हल्ली या कामांना ब्रेक लागल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडतांना दिसून येत आहेत.येथील धाम नदी पात्रात मुरुम टाकल्यानंतर तो वाहून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजुने संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथील मेडीटेशन हॉल, विसर्जन कुंडाची कामे अर्धवट स्थितीत आहे. विसर्जन कुंड तयार असला तरी त्या कुंडाकडे जाणारा रस्ता नसल्याने व कुंडात पाणी भरण्याची व्यवस्था न केल्याने एकाही गणपतीचे विजर्सन होऊ शकले नाही. बांधलेल्या सरंक्षण भिंती पाहिल्याच पुरात जवळपास २० फुट कोसळली व तेथील मलबा पूर्ण वाहून गेला. यावरुन कामातील निकृष्ठता आणि नियोजनशुन्यता चव्हाट्यावर आली आहे.या घाटावर शौचालय व कपडे बदलण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने महिलांची मोठी कुचंबना होत आहे. त्यांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नंदीखेडा परिसरात गावकऱ्यांसह पर्यटकांनाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे स्वातंत्र्य हिरावल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. येत्या २ आॅक्टोबरला गांधीजींची १५० वी जयंती साजरी होणार असल्याने त्या दिवसापर्यंत तरी सर्व विकास कामे पूर्ण होऊन पर्यटकांच्या सेवेत येईल, अशी अपेक्षा होती.परंतु कामच रखडल्याने पवनारवासीयांच्या आशेवर पाणी फेरले आहे.आश्रमातील शांतता होतेय भंगपवनारच्या धाम नदी तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम असून हा परिसर शांततेचे प्रतिक आहे. पण, सध्या या नियोजनशुन्य कामामुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या आश्रम परिसराची शांतता भंग होत असल्याची ओरड आश्रमवासीयांकडून केली जात आहे. येथील नंदीखेडा परिसर पूर्णत: बंदीस्त केला असून त्या ठिकाणी होणारा दशक्रियेचा विधी आता आश्रम परिसरात करावा लागत आहे. दत्त मंदिर परिसरात दशक्रिया विधीसाठी व्यवस्था केली तरी पुरेशा सोयी अभावी नागरिकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.धान नदी तीरावरील सौदर्यीकरणाची कामे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत असल्याने त्यावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण नाही. दशक्रियेसाठी नंदीखेडा परिसर खुला करून देणे गरजेचे आहे. कारण त्या ठिकाणी स्वतंत्र हॉल, कपडे बदलविण्याची जागा, शौचालय, पिण्याचे पाणी या सर्व सुविधा आहे. नियोजित जागेवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर जागा बदलविण्यास हरकत नाही. पण, प्रशासनाने तसे केले नसल्याने अडचणी वाढल्या आहे.त्यामुळे आता या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करणार आहे.शालिनी आदमने, सरपंच,पवनार

टॅग्स :Pavnarपवनारtourismपर्यटन