शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

व्हिल्स इंडियाच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:21 IST

येथील औद्योगिक वसाहतीतील व्हिल्स इंडिया कंपनीच्या स्थायी व अस्थायी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कंपनी प्रशासनाला चार पत्रे देवून सुद्धा दखल घेतली नसल्याने संघटनेच्यावतीने रोष व्यक्त करण्यात आला....

ठळक मुद्देकंपनी व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे रोष : कामगारांना कमी करण्याच्या धमकीने भडका

ऑनलाईन लोकमतदेवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील व्हिल्स इंडिया कंपनीच्या स्थायी व अस्थायी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कंपनी प्रशासनाला चार पत्रे देवून सुद्धा दखल घेतली नसल्याने संघटनेच्यावतीने रोष व्यक्त करण्यात आला.या कंपनीत जिल्ह्यातील कामगारांची संख्या अधिक आहे. यापैकी बरेचशे कामगार वर्धा मुक्कामी राहत असून रात्री १२ वाजेनंतर शिफ्ट संपल्यानंतर त्यांना दुचाकीने जावे लागते. यामुळे कंपीच्यावतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरविलेली बससेवा कंपनीच्या टिममेंबर व टेक्निशियनला सुद्धा लागू करण्यात यावी अशी मागणी कामगारांकडून करण्यात आली. या कंपनीत ठेकेदार पद्धतीत काम करणाºया व अस्थायी कामगारांना १२ तास पर्यंत राबवून घेतले जात आहे. या कंपनीत पटले कॉन्ट्रक्टर यांच्या व्यतिरिक्त ओईएस, जेईएस, एसईडब्ल्यु, डिके, एसकेएस, नागा आदी कॉन्ट्रक्टर काम पाहत असून पावणे तीनशे कामगार कार्यरत आहे. त्यांच्याकडून आठ तासांऐवजी १२ तास काम करून घेतल्या जात आहे. कामगारांचा पीएफ कापला जातो; परंतु त्यांचा नंबर दिल्या जात नाही. कुशल व अकुशल दराने वेतनाची वर्गवारी करुन वेतन दिले जात नाही. कामगारांना वेतन स्लीप दिली जात नाही. आदी अनेक प्रकारे कामगारांची लुट केली जात आहे.बहुतांश कामगार गरजु असल्यामुळे त्यांना वेळोवेळी कामावरुन कमी करण्याची धमकी दिली जाते. गत दोन दिवसापासून संप सुरू आहे; परंतु याबाबत कंपनीने कोणताही पुढाकार न घेता कामगारांची आर्थिक कोंडी केली आहे. कारखाना प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याने याबाबत मानव संसाधन, कामगार आयुक्त जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना समज देण्याची मागणी कामगार संघटनेचे दिलीप उटाणे, अतुल ठाकरे, गणेश रावेकर, रशीक पोपटकर, बादल भालशंकर, पवन ढगे, पंकज हागोडे यांच्यासह कामगारांच्यावतीने करण्यात आली आहे.