शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

सेवाग्राम विकास आराखड्याचे काम ७० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

महेश सायखेडे। लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यंदा भारतासह संपूर्ण जगात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी ...

ठळक मुद्देमहत्त्वाची कामे पूर्ण करून राष्ट्रपित्याला करणार अभिवादन : बांधकाम विभागाचा अभिनव संकल्प

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा भारतासह संपूर्ण जगात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. येत्या काही दिवसांवर २ ऑक्टोबर हा महत्त्वाचा दिवस असून या दिवशीपूर्वीपर्यंत वर्धा शहरातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंतचा सिमेंट रस्ता तसेच तेथील सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करीत न्युरल सुरू करून सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहे. वर्धा शहरात होत असलेले हे विकास काम सेवाग्राम विकास आराखड्यातील एक भाग आहे. तर सध्या स्थितीत सेवाग्राम विकास आराखड्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यांनी सेवाग्राम आश्रमातूनच स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावन भूमीचा विकास करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली आहे. सेवाग्राम विकास आराखड्याच्या एकूण पाच टप्प्यात विविध विकास काम हाती घेऊन ती पूर्णत्त्वास नेली जात आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत तब्बल दहा महत्त्वाचे चौक सौंदर्यीकरण, विविध भागातील रस्त्यांचे सिमेंटीकरण व डांबरीकरण, पवनार येथील धाम नदीचे सौंदर्यीकरण, सेवाग्राम येथे चरखा पॉर्इंट, सभागृह, यात्रीनिवास, पर्यटन सुविधा, फेरीवाले क्षेत्र, सुसज्ज वाचनालय, १८ किमीच्या सिमेंट नाल्या, अण्णासागर तलावाचे सौंदर्यीकरण आदी कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ७० टक्के कामे सध्या पूर्ण झाली आहेत. येत्या काही दिवसांवर २ आॅक्टोबर हा महत्त्वाचा दिवस असून या दिवसापूर्वीपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंतचा सिमेंट रस्ता तसेच तेथील सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करीत न्युरल सुरू करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहे. तर सेवाग्राम विकास आराखड्यातील उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस बांधकाम विभागाचा आहे.विकासकामांची स्थितीसेवाग्राम विकास आराखड्यात समावेश असलेल्या महत्त्वाच्या कामापैकी पवनारच्या धाम नदी पात्राच्या सौंदर्यीकरणाचे काम ९० टक्के झाले आहे. तर सेवाग्राम येथील यात्रीनिवास, चरखा पॉर्इंट, सभागृह, १८ कि. मी. पैकी ९ कि. मी. च्या सिमेंट नाल्या, एकूण ११ महत्त्वाच्या चौकांपैकी ९ चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम, न्यायालयासमोरील फेरीवाले क्षेत्र, पर्यटन सुविधेतील तीन इमारतीचे सिव्हील काम, वर्धा शहरातील व्हीआयपी मार्गाचे सिमेंटीकरण, बापूराव देशमुख पुतळा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पर्यंतच्या मार्गाचे डांबरीकरण, वाचनालयाच्या इमारतीचे ६० टक्के काम, वाहनतळाचे काम, पवनार येथील इको पार्कचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवाय महिला आश्रम चौक ते सेवाग्राम रेल्वे स्थानक या मार्गाचे सिमेंटीकरण, सेवाग्राम येथील सायकल ट्रकचे काम, फेरीवाले क्षेत्र, आरटीओ कार्यालयासमोरील फेरीवाले क्षेत्र, अण्णासागर तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम अपूर्ण आहे.शहरातील अकरा चौक घालणार भुरळवर्धा शहरातील महात्मा गांधी पुतळा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, बापूराव देशमुख पुतळा चौक तर सेवाग्राम येथील मेडीकल चौक, गिताई मंदिर चौक आदी एकूण दहा महत्वाचे चौक परिसराचा सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत होत असलेल्या विकास कामामुळे चेहराच बदल्या जात आहे. सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर हे चौक नागरिकांना व पर्यटकांना भुरळच घालणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा समावेशसेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरूवातीला एकूण दहा महत्त्वाच्या चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाचा समावेश नसल्याचे लक्षात येताच पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून या परिसराचा विकास कामात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाचा चेहरा बदलणार आहे.अभियंत्याचाही झाला सत्कारसेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित असलेली विविध विकास कामे दर्जेदार व पारदर्शी पद्धतीने तसेच ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय मंत्री विशेष प्रयत्न करीत आहेत. त्याच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गौरविण्यात आले आहे.यापूर्वी चरखा पॉर्इंटचे काम पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदा संकल्प सोडला आहे. त्याला १०० टक्के यशही मिळाले. त्यावेळीही प्रत्यक्ष कामातून आम्ही राष्ट्रपित्यांना अभिवादन केले होते. तर यंदा वर्धा शहरातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंतचा सिमेंट रस्ता तसेच तेथील सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करीत न्युरल सुरू करून सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहे. सध्या सेवाग्राम विकास आराखड्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.- संजय मंत्री, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम