शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

आपत्तीकाळात ‘ओनरशिप’ पद्धतीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:07 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने ओनरशिप पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : मान्सूनपूर्व आढावा बैठक, धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने ओनरशिप पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी भिमनवार बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, चंद्रभान खंडाईत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, जिल्हा परिषद लघु सिंचन कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता मून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनटक्के उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदार यांच्याकडे असलेल्या नादुरुस्त बोटी तात्काळ दुरुस्त करून चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यात ९ पुलांवरून पुराचे पाणी वाहते. अशावेळी पुलांवरून पाणी उतरेपर्यंत तेथे निगराणीसाठी मंडळ अधिकारी यांनी एक व्यक्ती ठेवावी. तसेच अशा धोक्याच्या ठिकाणी अंधारात दिसतील असे फलक लावावेत. बोट चालविता येणाºया व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच ४ महिन्यांसाठी त्यांची नेमणूक करून त्यांना मानधन देता येईल. जेणेकरून, आपत्तीच्या काळात ऐनवेळी बोटचालक शोधण्याची गरज भासणार नाही, असेही भिमनवार म्हणाले.जिल्ह्यात २१४ नदीकाठावरील गावे आहेत. त्यापैकी ८८ गावे धोकादायक आहेत. या सर्व गावात आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करून शोध व बचावपथक स्थापन करावे. गावपातळीपर्यंत योग्य माहितीचे प्रसारण होते की नाही, याची शहानिशा करावी. तसेच गावस्तरीय शासकीय कर्मचाºयांचा समन्वय करण्याची जबाबदारी तलाठी यांच्यावर सोपविण्यात यावी. नगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करून त्या रिकाम्या कराव्यात आणि पाडण्यात याव्यात. नाले आणि गटारे यातील गाळ काढून स्वच्छ करावीत, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.पर्जन्यमापक यंत्र अद्ययावत आहेत का, याची तहसीलदारांनी खात्री करावी. आरोग्य विभागाने रोगराई संदर्भात सर्व तयारी करावी. औषधांचा मुबलक साठा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवावा. जास्त वीज पडणाºया गावांची यादी करून तिथे लायटनिंग अरेस्टर लावण्याचे नियोजन करावे. सर्पमित्रांची यादी तयार करावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दिल्यात. तसेच या बैठकीला अनुपस्थित असणाºया अधिकाºयांना नोटीस द्यावी, अशाही सूचना भिमनवार यांनी दिल्यात.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनीसुद्धा काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात. यामध्ये धरणाचे गेट चालू-बंद होत असल्याची तपासणी करून अहवाल द्यावा तसेच त्याची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करावी. ऐनवेळी गेट बंद न झाल्यामुळे पुराचा धोका होऊ शकतो, त्यामुळे यासंदर्भात विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. तसेच जिल्हाधिकारी यांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय धरणाचे गेट उघडू नयेत आणि पाण्याचा विसर्ग करू नये. धरणातून पाणी सोडल्यामुळे अनेक गावांना पुराचा धोका संभवू शकतो. त्यामुळे आधी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देणे आवश्यक असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण जगासमोर ओडिशाने उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यापद्धतीने आपणही काम करण्याची प्रेरणा घ्यावी, असे दैने म्हणाले.यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे सर्व विभागांनी करावयाच्या कामांची माहिती दिली. यावेळी तहसीलदार प्रीती डुडुलकर, राजू रणवीर, गटविकास अधिकारी तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी