शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आपत्तीकाळात ‘ओनरशिप’ पद्धतीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:07 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने ओनरशिप पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : मान्सूनपूर्व आढावा बैठक, धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने ओनरशिप पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी भिमनवार बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, चंद्रभान खंडाईत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, जिल्हा परिषद लघु सिंचन कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता मून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनटक्के उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदार यांच्याकडे असलेल्या नादुरुस्त बोटी तात्काळ दुरुस्त करून चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यात ९ पुलांवरून पुराचे पाणी वाहते. अशावेळी पुलांवरून पाणी उतरेपर्यंत तेथे निगराणीसाठी मंडळ अधिकारी यांनी एक व्यक्ती ठेवावी. तसेच अशा धोक्याच्या ठिकाणी अंधारात दिसतील असे फलक लावावेत. बोट चालविता येणाºया व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच ४ महिन्यांसाठी त्यांची नेमणूक करून त्यांना मानधन देता येईल. जेणेकरून, आपत्तीच्या काळात ऐनवेळी बोटचालक शोधण्याची गरज भासणार नाही, असेही भिमनवार म्हणाले.जिल्ह्यात २१४ नदीकाठावरील गावे आहेत. त्यापैकी ८८ गावे धोकादायक आहेत. या सर्व गावात आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करून शोध व बचावपथक स्थापन करावे. गावपातळीपर्यंत योग्य माहितीचे प्रसारण होते की नाही, याची शहानिशा करावी. तसेच गावस्तरीय शासकीय कर्मचाºयांचा समन्वय करण्याची जबाबदारी तलाठी यांच्यावर सोपविण्यात यावी. नगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करून त्या रिकाम्या कराव्यात आणि पाडण्यात याव्यात. नाले आणि गटारे यातील गाळ काढून स्वच्छ करावीत, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.पर्जन्यमापक यंत्र अद्ययावत आहेत का, याची तहसीलदारांनी खात्री करावी. आरोग्य विभागाने रोगराई संदर्भात सर्व तयारी करावी. औषधांचा मुबलक साठा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवावा. जास्त वीज पडणाºया गावांची यादी करून तिथे लायटनिंग अरेस्टर लावण्याचे नियोजन करावे. सर्पमित्रांची यादी तयार करावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दिल्यात. तसेच या बैठकीला अनुपस्थित असणाºया अधिकाºयांना नोटीस द्यावी, अशाही सूचना भिमनवार यांनी दिल्यात.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनीसुद्धा काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात. यामध्ये धरणाचे गेट चालू-बंद होत असल्याची तपासणी करून अहवाल द्यावा तसेच त्याची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करावी. ऐनवेळी गेट बंद न झाल्यामुळे पुराचा धोका होऊ शकतो, त्यामुळे यासंदर्भात विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. तसेच जिल्हाधिकारी यांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय धरणाचे गेट उघडू नयेत आणि पाण्याचा विसर्ग करू नये. धरणातून पाणी सोडल्यामुळे अनेक गावांना पुराचा धोका संभवू शकतो. त्यामुळे आधी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देणे आवश्यक असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण जगासमोर ओडिशाने उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यापद्धतीने आपणही काम करण्याची प्रेरणा घ्यावी, असे दैने म्हणाले.यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे सर्व विभागांनी करावयाच्या कामांची माहिती दिली. यावेळी तहसीलदार प्रीती डुडुलकर, राजू रणवीर, गटविकास अधिकारी तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी