शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीकाळात ‘ओनरशिप’ पद्धतीने काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:07 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने ओनरशिप पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : मान्सूनपूर्व आढावा बैठक, धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्याने ओनरशिप पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी भिमनवार बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, चंद्रभान खंडाईत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, जिल्हा परिषद लघु सिंचन कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता मून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनटक्के उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदार यांच्याकडे असलेल्या नादुरुस्त बोटी तात्काळ दुरुस्त करून चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यात ९ पुलांवरून पुराचे पाणी वाहते. अशावेळी पुलांवरून पाणी उतरेपर्यंत तेथे निगराणीसाठी मंडळ अधिकारी यांनी एक व्यक्ती ठेवावी. तसेच अशा धोक्याच्या ठिकाणी अंधारात दिसतील असे फलक लावावेत. बोट चालविता येणाºया व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच ४ महिन्यांसाठी त्यांची नेमणूक करून त्यांना मानधन देता येईल. जेणेकरून, आपत्तीच्या काळात ऐनवेळी बोटचालक शोधण्याची गरज भासणार नाही, असेही भिमनवार म्हणाले.जिल्ह्यात २१४ नदीकाठावरील गावे आहेत. त्यापैकी ८८ गावे धोकादायक आहेत. या सर्व गावात आपत्ती व्यवस्थापन समिती गठित करून शोध व बचावपथक स्थापन करावे. गावपातळीपर्यंत योग्य माहितीचे प्रसारण होते की नाही, याची शहानिशा करावी. तसेच गावस्तरीय शासकीय कर्मचाºयांचा समन्वय करण्याची जबाबदारी तलाठी यांच्यावर सोपविण्यात यावी. नगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करून त्या रिकाम्या कराव्यात आणि पाडण्यात याव्यात. नाले आणि गटारे यातील गाळ काढून स्वच्छ करावीत, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.पर्जन्यमापक यंत्र अद्ययावत आहेत का, याची तहसीलदारांनी खात्री करावी. आरोग्य विभागाने रोगराई संदर्भात सर्व तयारी करावी. औषधांचा मुबलक साठा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवावा. जास्त वीज पडणाºया गावांची यादी करून तिथे लायटनिंग अरेस्टर लावण्याचे नियोजन करावे. सर्पमित्रांची यादी तयार करावी अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दिल्यात. तसेच या बैठकीला अनुपस्थित असणाºया अधिकाºयांना नोटीस द्यावी, अशाही सूचना भिमनवार यांनी दिल्यात.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनीसुद्धा काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात. यामध्ये धरणाचे गेट चालू-बंद होत असल्याची तपासणी करून अहवाल द्यावा तसेच त्याची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करावी. ऐनवेळी गेट बंद न झाल्यामुळे पुराचा धोका होऊ शकतो, त्यामुळे यासंदर्भात विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्यात. तसेच जिल्हाधिकारी यांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय धरणाचे गेट उघडू नयेत आणि पाण्याचा विसर्ग करू नये. धरणातून पाणी सोडल्यामुळे अनेक गावांना पुराचा धोका संभवू शकतो. त्यामुळे आधी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देणे आवश्यक असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण जगासमोर ओडिशाने उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यापद्धतीने आपणही काम करण्याची प्रेरणा घ्यावी, असे दैने म्हणाले.यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरणाद्वारे सर्व विभागांनी करावयाच्या कामांची माहिती दिली. यावेळी तहसीलदार प्रीती डुडुलकर, राजू रणवीर, गटविकास अधिकारी तसेच इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी