शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

कालावधी संपूनही काम सुरूच

By admin | Updated: December 31, 2015 02:23 IST

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या निवासस्थानाचे बांधकाम दोन वर्षापासून सुरू आहे.

फलकामुळे अनेक प्रश्न उपस्थित : कामाच्या कासवगतीने आश्चर्यविजय माहुरे सेलूयेथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या निवासस्थानाचे बांधकाम दोन वर्षापासून सुरू आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी संपून एक वर्ष झाले आहे. दोष दुरुस्तीचा कालावधीही अवघे तीन महिने राहिला आहे. असे असताना आजही बांधकाम सुरूच आहे. त्यातच मंगळवारी लावलेला ‘तो’ फलक काम कासवगतीने सुरू असल्याचे दर्शवित आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी रुग्णालया परिसरातच निवासस्थान बांधण्यासाठी २०१२-१३ मध्ये कंत्राटदाराकडून या बांधकामाचा करारनामा करण्यात आला. यासाठी प्रशासकीय मान्यतेनुसार ३४९.१५ लाख रूपये मंजूर करण्यात आले. ३१५.२५ लाख रूपयाची तांत्रिक मान्यता मिळाली. करारनाम्यानुसार या बांधकामाची किंमत २९९.७३ लाख आहे. मात्र दोन वर्षापासून येथील निवासस्थानाचे बांधकाम सुरूच आहे. पण २९ डिसेंबरला या बांधकामाच्या ठिकाणी या बाबतची माहिती देणारा फलक लावण्यात आला. या फलकावर काम सुरू झाल्याची तारीख ३० मार्च २०१३ अशी दर्शविण्यात आली. सदर बांधकाम १३ महिन्यात पूर्ण होणे गरजेचे होते. त्यानुसार निव्वळ बांधकाम हे ३० एप्रिल २०१४ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. एवढेच नव्हे तर काम पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून या कामात असणाऱ्या दोषाची दुरुस्ती २४ महिन्यापर्यंत करावयाची आहे. त्यानुसार दोष दुरुस्ती मार्च १६ पर्यंत करावी लागणार होती. पण अजूनही या निवासस्थानाचे बांधकामच सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून काही महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बांधकामाची माहिती दर्शविणारा फलक मंगळवारी २९ डिसेंबरला लावण्यामागचे कारण काय हे कळायला मार्ग नाही. दोष दुरुस्तीचाही कालावधी संपल्यानंतर या बांधकामाचे उद्घाटन होईल. त्यामुळे बांधकामात असणाऱ्या दोषच्या दुरुस्तीचे काय होईल असा प्रश्न हा फलक पाहून सर्वसामान्यांना पडत आहे. सदर काम सा. बा. विभागाच्या यंत्रणेखाली कार्यान्वित आहे. कामाची गती पाहाता काम कधी होणार हा प्रश्नच आहे.