शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
3
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
4
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
5
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
6
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
7
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
8
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
9
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
10
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
11
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
12
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
13
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
14
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
15
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
16
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
17
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
18
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
19
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
20
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

पंतप्रधान निधीतून निम्न वर्धाचे काम

By admin | Updated: December 15, 2015 04:08 IST

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता महत्त्वाचा ठरणारा निम्न वर्धा प्रकल्प गत अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. हा प्रकल्प आता

वर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता महत्त्वाचा ठरणारा निम्न वर्धा प्रकल्प गत अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. हा प्रकल्प आता पूर्णत्त्वास येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रात अपूर्ण प्रकल्प म्हणून नोंद असलेल्या २३ प्रकल्पात निम्न वर्धाचा समावेश झाला असून पंतप्रधान यांच्या निधीतून त्याचे काम होणार आहे. तसे पत्र केंद्रशासनाकडून राज्य शासनाच्या जलसंधार मंंत्रालयाला प्राप्त झाल्याची माहिती खा. रामदारस तडस यांनी दिली.नवी दिल्ली येथील जलसंसाधन सभागृहात जल संधारण मंत्रालयाची अपूर्ण सिंचन प्रकल्पांना प्राधान्यक्रम ठरविण्याबाबत बैठक झाली. या बैठकीमध्ये संपूर्ण भारतातील २३ प्रकल्पांच्या अपूर्ण कामाबाबत चर्चा झाली. रखडलेले हे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता सिंचन लाभ कार्यक्रम (एआयबीए) व निती आयोगांतर्गत पंतप्रधान निधीतून हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तसे पत्र राज्य शासनाला प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प २०१७ पर्यंत पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पत्राच्या आधारे खा. तडस यांनी केंद्रीय जलसंधारण विभागाचे आयुक्त प्रदीप कुमार यांच्याशी जलसंधारण विभागात भेट देऊन निम्न वर्धा प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.निम्न वर्धा प्रकल्पाच्या सुधारित किमतीपैकी शिल्लक किमतीएवढा निधी येत्या दोन वर्षांत प्राप्त होणार आहे. त्यामध्ये केंद्रशासनाचा ६० टक्के व राज्यशासनाचा ४० टक्के सहभाग राहणार असल्याची माहिती आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमतेनुसार दोन वर्षांत निर्माण अनिवार्य असल्याची अट केंद्रशासनातर्फे लादण्यात आलेली आहे. राज्यशासनातर्फे निम्न वर्धा प्रकल्पाला राज्य शासनाच्या वाट्याएवढा निधी देण्यात येईल, अशी हमी राज्यशासनाला द्यावी लागणार आहे. राज्यशासनाकडून निम्न वर्धा प्रकल्पासंदर्भात तीन महिन्यातील नियोजन केंद्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचे संनियत्रण चार यंत्रणांमार्फत करण्यात येणार असल्याचे खासदारांनी कळविले आहे.या प्रकल्पाला केंद्रशासनाने मुबलक निधी उपलब्ध करून दिल्याने प्रलंबित असलेल्या विकास कामाला गती मिळणार असून २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत केंद्र शासन व राज्य शासनाकडे त्याचा सदैव पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले.(प्रतिनिधी)दोन वर्षांत निधी४निम्न वर्धा प्रकल्पाच्या सुधारित किमतीपैकी शिल्लक किमतीएवढा निधी येत्या दोन वर्षांत प्राप्त होणार आहे. त्यामध्ये केंद्रशासनाचा ६० व राज्यशासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे. प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार दोन वर्षांत निर्माण अनिवार्य असल्याची अट केंद्रशासनातर्फे लादण्यात आल्याने राज्य शासन या कामाला लागले आहे.