शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

पंतप्रधान निधीतून निम्न वर्धाचे काम

By admin | Updated: December 15, 2015 04:08 IST

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता महत्त्वाचा ठरणारा निम्न वर्धा प्रकल्प गत अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. हा प्रकल्प आता

वर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता महत्त्वाचा ठरणारा निम्न वर्धा प्रकल्प गत अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. हा प्रकल्प आता पूर्णत्त्वास येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रात अपूर्ण प्रकल्प म्हणून नोंद असलेल्या २३ प्रकल्पात निम्न वर्धाचा समावेश झाला असून पंतप्रधान यांच्या निधीतून त्याचे काम होणार आहे. तसे पत्र केंद्रशासनाकडून राज्य शासनाच्या जलसंधार मंंत्रालयाला प्राप्त झाल्याची माहिती खा. रामदारस तडस यांनी दिली.नवी दिल्ली येथील जलसंसाधन सभागृहात जल संधारण मंत्रालयाची अपूर्ण सिंचन प्रकल्पांना प्राधान्यक्रम ठरविण्याबाबत बैठक झाली. या बैठकीमध्ये संपूर्ण भारतातील २३ प्रकल्पांच्या अपूर्ण कामाबाबत चर्चा झाली. रखडलेले हे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता सिंचन लाभ कार्यक्रम (एआयबीए) व निती आयोगांतर्गत पंतप्रधान निधीतून हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तसे पत्र राज्य शासनाला प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प २०१७ पर्यंत पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पत्राच्या आधारे खा. तडस यांनी केंद्रीय जलसंधारण विभागाचे आयुक्त प्रदीप कुमार यांच्याशी जलसंधारण विभागात भेट देऊन निम्न वर्धा प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.निम्न वर्धा प्रकल्पाच्या सुधारित किमतीपैकी शिल्लक किमतीएवढा निधी येत्या दोन वर्षांत प्राप्त होणार आहे. त्यामध्ये केंद्रशासनाचा ६० टक्के व राज्यशासनाचा ४० टक्के सहभाग राहणार असल्याची माहिती आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमतेनुसार दोन वर्षांत निर्माण अनिवार्य असल्याची अट केंद्रशासनातर्फे लादण्यात आलेली आहे. राज्यशासनातर्फे निम्न वर्धा प्रकल्पाला राज्य शासनाच्या वाट्याएवढा निधी देण्यात येईल, अशी हमी राज्यशासनाला द्यावी लागणार आहे. राज्यशासनाकडून निम्न वर्धा प्रकल्पासंदर्भात तीन महिन्यातील नियोजन केंद्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचे संनियत्रण चार यंत्रणांमार्फत करण्यात येणार असल्याचे खासदारांनी कळविले आहे.या प्रकल्पाला केंद्रशासनाने मुबलक निधी उपलब्ध करून दिल्याने प्रलंबित असलेल्या विकास कामाला गती मिळणार असून २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत केंद्र शासन व राज्य शासनाकडे त्याचा सदैव पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले.(प्रतिनिधी)दोन वर्षांत निधी४निम्न वर्धा प्रकल्पाच्या सुधारित किमतीपैकी शिल्लक किमतीएवढा निधी येत्या दोन वर्षांत प्राप्त होणार आहे. त्यामध्ये केंद्रशासनाचा ६० व राज्यशासनाचा ४० टक्के सहभाग राहणार आहे. प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार दोन वर्षांत निर्माण अनिवार्य असल्याची अट केंद्रशासनातर्फे लादण्यात आल्याने राज्य शासन या कामाला लागले आहे.