शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

कामबंद आंदोलनामुळे कामे खोळंबली

By admin | Updated: March 29, 2015 02:13 IST

विविध मागण्यांना घेऊन मनरेगा कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे.

वर्धा : विविध मागण्यांना घेऊन मनरेगा कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील कामे खोळंबली असून मजूरवर्गावरही उपासमारीचे वेळ ओढावली आहे.स्थानिक प्रशासन व शासनदरबारी मनरेगांतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, डाटा एन्ट्री आॅपरेटर, ग्रामरोजगारसेवक यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सदर मागण्या संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनरेगा कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. यामुळे मनरेगांतर्गत अनेक कामे खोळंबली आहेत. ग्रामरोजगारसेवक कामावर नसल्याने मजूरवर्गही अडचणीत आहेत. ग्रामपंचायतीची विविध कामे या योजनेंतर्गत केली जाते. त्या शिवाय शेतकऱ्यांच्या शेतातील फळबाग लागवडीचे काम व त्याची देखभाल करण्याचे कामसुद्धा करण्यात येते. या संपूर्ण कामांचा लेखाजोखा संबंधित कार्यालयात रोजगारसेवक सादर करतो. जोपर्यंत तो लेखाजोखा सादर करीत नाही, तोपर्यंत मजुरी मिळत नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्या मजुरांनी कामे केली आहेत, त्यांची मजुरी अद्यापही मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मनरेगा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि.प. सदस्य राणा रणनवरे, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, जि.प. सदस्य छोटू चांदूरकर यांची भेट घेऊन न्याय्य मागण्या निदर्शनास आणून दिल्या. राजू गोरडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासोबत चर्चा करताना जि.प. अध्यक्षांनी तत्काळ न्याय न मिळाल्यास आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. शासनाने मनरेगा कर्मचारी वर्गाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)