शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

कामबंद आंदोलनामुळे कामे खोळंबली

By admin | Updated: March 29, 2015 02:13 IST

विविध मागण्यांना घेऊन मनरेगा कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे.

वर्धा : विविध मागण्यांना घेऊन मनरेगा कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील कामे खोळंबली असून मजूरवर्गावरही उपासमारीचे वेळ ओढावली आहे.स्थानिक प्रशासन व शासनदरबारी मनरेगांतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, डाटा एन्ट्री आॅपरेटर, ग्रामरोजगारसेवक यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सदर मागण्या संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने मनरेगा कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. यामुळे मनरेगांतर्गत अनेक कामे खोळंबली आहेत. ग्रामरोजगारसेवक कामावर नसल्याने मजूरवर्गही अडचणीत आहेत. ग्रामपंचायतीची विविध कामे या योजनेंतर्गत केली जाते. त्या शिवाय शेतकऱ्यांच्या शेतातील फळबाग लागवडीचे काम व त्याची देखभाल करण्याचे कामसुद्धा करण्यात येते. या संपूर्ण कामांचा लेखाजोखा संबंधित कार्यालयात रोजगारसेवक सादर करतो. जोपर्यंत तो लेखाजोखा सादर करीत नाही, तोपर्यंत मजुरी मिळत नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्या मजुरांनी कामे केली आहेत, त्यांची मजुरी अद्यापही मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मनरेगा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, जि.प. सदस्य राणा रणनवरे, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, जि.प. सदस्य छोटू चांदूरकर यांची भेट घेऊन न्याय्य मागण्या निदर्शनास आणून दिल्या. राजू गोरडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासोबत चर्चा करताना जि.प. अध्यक्षांनी तत्काळ न्याय न मिळाल्यास आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. शासनाने मनरेगा कर्मचारी वर्गाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)