शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

महिलांचा न्यायालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:45 IST

महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

ठाणेदारांना निवेदन : दारूबंदीच्या अंमलबजावणीची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रयत्न करीत असले तरी गाव-खेड्यात दारूविक्रीचा व्यवसाय सूरूच आहे. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी मंगळवारी दुपारी सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता सावित्रीबाई फुले दारूबंदीच्या महिलांनी थेट न्यायालयावर मोर्चा नेला. यावेळी न्यायालयाच्यावतीने पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. जिल्ह्यात नवीन वरिष्ठ अधिकारी येताच पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर कारवाई केली जाते. पोलीसही वॉश आऊट सारखी मोहीम राबवून लाखो रुपयाचा दारूसाठा पकडतात. तसेच दारूविक्रेत्यांना अटक करतात. परंतु, काही महिन्यांचा कालावधी लोटताच दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीचा पोलिसांनाच विसर पडत असल्याने हा अवैध व्यवसाय पुन्हा पायमुळ घट्ट करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुलगाव परिसरात खुलेआम दारूविक्री होत आहे. त्याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली;पण प्रभावी कारवाई होत नाही. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणी करिता जीवाचा धोका पत्कारून कार्य करणाऱ्या महिला देशी, विदेशी व गावठी दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतात. त्यानंतर पोलिसही दारूविक्रेत्यांना अटक करते. पण, अवघ्या काही दिवसातच दारूविक्रेते जामीनावर सुटून येतात आणि पुन्हा बिनधास्तपणे दारूविक्रीचा व्यवसाय करतात. दारूविक्रीमुळे शेकडो कुटुंब उघड्यावर आले असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. न्यायालयाने पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत दारूविक्रेत्यांना कठोर शिक्षा द्यावी, दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या महिलांना पोलिसांनी वेळोवेळी सहकार्य करावे, सदर महिलांना ओळख पत्र द्यावे, अटक करण्यात आलेल्या दारू विक्रेत्याला जामीन देवू नये, दारूबंदीच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, तसेच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये गांजा, ड्रग्ज, दारू आदी मादक पदार्थ विकणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मोर्चात अनुसया उके, कल्पना शेतेवार, राजु लोहकरे, विनोद बोरकर, प्रवीण हावरे यांचेसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.