शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

महिलांना शेतीपुरक व्यवसाय काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:43 IST

राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देराहुल ठाकरे : बचत गट महिला कार्यशाळेला चार हजार महिलांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले.येथील सहकार मंगल कार्यालयामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचालित साधन केंद्र व राष्ट्रसंत ग्रामसमृध्दी संकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बचत गट प्रमुख प्रेमा सालंकार, होत्या. उद्घाटक राहुल श्रीधर ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून जिजामाता कृषी भुषण पुरस्कृत पोर्णिमा सवाई, खादी ग्रामोद्योग नागपुरचे एन.व्ही. गुढे उपस्थित होते.त्याप्रसंगी राहुल ठाकरे यांनी जीवन जगत असताना जशी आॅक्सीजनची गरज भासते तशीच महिला बचत गटांना सक्षमीकरण व मार्केटींगची गरज ही काळाची बनली आहे. ग्रामीण व शहरी भागातील बचत गटांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्या भागातील बचत गट आर्थिक परिस्थितीने ढासाळलेला आहे. त्याला कारण म्हणजे बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला योग्य ती मार्केटींगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बचत गट आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्या बचत गटांना आंधारातून प्रकाशामध्ये आणु, महिलांना शेतीपुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे. यावेळी मधुमक्षिका पालन प्रात्याक्षिक देवून पेटी वाटप करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत करणार असल्याचे सांगितले.त्याप्रसंगी जिजामाता कृषी भुषण पुरस्कृत पोर्णिमा सवाई म्हणाल्या की, महिलांनी माझ्यात कशाची तरी उणीव आहे असे कधीच भासु नये कारण स्वत:चे नकारात्मक विचार माणसाला कमतरतेची जाणीव करून देतात पण स्त्री शक्तीने आपण कोणत्याही आलेल्या संकटांचा सामना करू शकतो, असा निर्धार केला पाहिज. यावेळी उपस्थित अतिथींनी महिलांना मार्गदर्शन केले व योजनांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सुजाता लोहकरे तर प्रास्ताविक वैशाली देशमुख यांनी केले, आभार स्मिता भेंडे यांनी मानले.