शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महिलांना शेतीपुरक व्यवसाय काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:43 IST

राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देराहुल ठाकरे : बचत गट महिला कार्यशाळेला चार हजार महिलांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले.येथील सहकार मंगल कार्यालयामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचालित साधन केंद्र व राष्ट्रसंत ग्रामसमृध्दी संकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बचत गट प्रमुख प्रेमा सालंकार, होत्या. उद्घाटक राहुल श्रीधर ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून जिजामाता कृषी भुषण पुरस्कृत पोर्णिमा सवाई, खादी ग्रामोद्योग नागपुरचे एन.व्ही. गुढे उपस्थित होते.त्याप्रसंगी राहुल ठाकरे यांनी जीवन जगत असताना जशी आॅक्सीजनची गरज भासते तशीच महिला बचत गटांना सक्षमीकरण व मार्केटींगची गरज ही काळाची बनली आहे. ग्रामीण व शहरी भागातील बचत गटांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपल्या भागातील बचत गट आर्थिक परिस्थितीने ढासाळलेला आहे. त्याला कारण म्हणजे बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला योग्य ती मार्केटींगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बचत गट आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्या बचत गटांना आंधारातून प्रकाशामध्ये आणु, महिलांना शेतीपुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे. यावेळी मधुमक्षिका पालन प्रात्याक्षिक देवून पेटी वाटप करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत करणार असल्याचे सांगितले.त्याप्रसंगी जिजामाता कृषी भुषण पुरस्कृत पोर्णिमा सवाई म्हणाल्या की, महिलांनी माझ्यात कशाची तरी उणीव आहे असे कधीच भासु नये कारण स्वत:चे नकारात्मक विचार माणसाला कमतरतेची जाणीव करून देतात पण स्त्री शक्तीने आपण कोणत्याही आलेल्या संकटांचा सामना करू शकतो, असा निर्धार केला पाहिज. यावेळी उपस्थित अतिथींनी महिलांना मार्गदर्शन केले व योजनांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सुजाता लोहकरे तर प्रास्ताविक वैशाली देशमुख यांनी केले, आभार स्मिता भेंडे यांनी मानले.