शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पाण्याकरीता महिलांची ग्रामपंचायतीवर धडक

By admin | Updated: May 24, 2014 00:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीतील नागरिकांवर आली आहे. गत पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या नळांना पाण्याचा एकही थेंब आला

वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीतील नागरिकांवर आली आहे. गत पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या नळांना पाण्याचा एकही थेंब आला नसल्याने शुक्रवारी दुपारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायतीने धरणाच्या गेटची दुरूस्ती करण्यात येत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले. हे गेट दुरूस्त होताच नागरिकांना पाणी देण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे. पिपरी (मेघे) गावातीन नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता ग्रामपंचायतीची नळ योजना आहे. या नळयोजनेला येळाकेळी येथील धरणावरून व धरणाशेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या येथे असलेल्या छोट्या धरणाच्या गेटमध्ये व नागरिकांना पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या पाईपलाईनमध्ये बिघाड आल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सध्या विहिरीत जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याच्या आधारावर पिपरी गावात पाणी पुरवठा करण्यात येत आहे; मात्र येथील अतिक्रमित असलेल्या या वस्तीत गत पाच दिवसांपासून पाणीच आले नसल्याने त्यांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. कधी परिसरातील कुण्या विहिरीवरून तर कधी हातपंपावरून भर उन्हात पाणी आणून नागरिकांना त्यांची गरज भागवावी लागत आहे. यामुळे गावात ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत रोष व्यक्त करण्यात आला. हाच रोष रस्त्यावर आणत संतप्त झालेल्या या वस्तीतील महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी महिलांनी आम्हाला पहिले पाणी द्या नंतर काय ते करा अशी भूमिका घेली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान धरणाची दुरूस्ती व पाईपलाईन मध्ये आलेल्या बिघाडामुळे पाणी पुरवठा करण्यास अडचण येत असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. धरणाची दुरूस्ती होताच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)