शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

पाण्याकरीता महिलांची ग्रामपंचायतीवर धडक

By admin | Updated: May 24, 2014 00:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीतील नागरिकांवर आली आहे. गत पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या नळांना पाण्याचा एकही थेंब आला

वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीतील नागरिकांवर आली आहे. गत पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या नळांना पाण्याचा एकही थेंब आला नसल्याने शुक्रवारी दुपारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायतीने धरणाच्या गेटची दुरूस्ती करण्यात येत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले. हे गेट दुरूस्त होताच नागरिकांना पाणी देण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे. पिपरी (मेघे) गावातीन नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता ग्रामपंचायतीची नळ योजना आहे. या नळयोजनेला येळाकेळी येथील धरणावरून व धरणाशेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या येथे असलेल्या छोट्या धरणाच्या गेटमध्ये व नागरिकांना पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या पाईपलाईनमध्ये बिघाड आल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सध्या विहिरीत जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याच्या आधारावर पिपरी गावात पाणी पुरवठा करण्यात येत आहे; मात्र येथील अतिक्रमित असलेल्या या वस्तीत गत पाच दिवसांपासून पाणीच आले नसल्याने त्यांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. कधी परिसरातील कुण्या विहिरीवरून तर कधी हातपंपावरून भर उन्हात पाणी आणून नागरिकांना त्यांची गरज भागवावी लागत आहे. यामुळे गावात ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत रोष व्यक्त करण्यात आला. हाच रोष रस्त्यावर आणत संतप्त झालेल्या या वस्तीतील महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी महिलांनी आम्हाला पहिले पाणी द्या नंतर काय ते करा अशी भूमिका घेली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान धरणाची दुरूस्ती व पाईपलाईन मध्ये आलेल्या बिघाडामुळे पाणी पुरवठा करण्यास अडचण येत असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. धरणाची दुरूस्ती होताच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)