शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ साक्षीदाराची आत्महत्या संशयास्पद

By admin | Updated: December 20, 2014 01:57 IST

अल्पेश हत्या प्रकरणातील एकमेव साक्षीदार विलास पांडुरंग उगेमुगे (२४) याची आत्महत्या संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

वायगाव(नि.) : अल्पेश हत्या प्रकरणातील एकमेव साक्षीदार विलास पांडुरंग उगेमुगे (२४) याची आत्महत्या संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याला बयाण नोंदविण्याच्या नावावर तब्बल तीन दिवस सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठेवले होते. ठाण्यातून घरी येताच त्याने आत्महत्या केल्यामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे.अल्पेश सुरेश ओंकार हा नेरी (मिरापूर) येथील रहिवासी होता. तो २७ सप्टेंबरला घरून निघून गेला. २९ सप्टेंबरला देऊळगाव-भुगाव शिवारातील एका विहिरीत त्याचा मृतदेहच आढळला. अल्पेश हा पट्टीचा पोहणारा असल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. कुटुंबीयांनीही अल्पेशही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनीही तपासाला योग्य दिशा दिली. अखेर तब्बल तीन महिन्यांनी का होईना अल्पेशची हत्या असल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. अल्पेश घरून गेला तेव्हा त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर काम करणारा विलास उगेमुगे हा या घटनेचा एकमेव साक्षदार होता. सेवाग्राम पोलिसांनी दि. १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्याचे तोंडी बयाण घेतले. दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पुन्हा बयाण नोंदविण्याच्या नावावर पोलिसांनी त्याला सोबत नेले. यानंतर दि. १४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता पोलीस त्याला घेऊन त्याला भुगाव येथे घरी घेऊन आले. घरी त्याला आंघोळ करू दिली. अर्ध्या तासांनी पुन्हा सोबत सेवाग्राम पोलीस ठाण्यात नेले.दि. १५ डिसेंबरला त्याची साक्ष नोंदविण्यात आली. नंतर त्याला त्याच्या आई-वडिलाकडे आॅटोतून सोडून पोलीस परत गेले. आॅटोतून उतरुन घरात जाताच विलासने विष प्राशन केले. यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला बयाण नोंदवायलाच नेले होते. तर त्याला तब्बल तीन दिवस पोलीस ठाण्यात का ठेवले. विलास ज्या प्रकरणाचा एकमेव साक्षदार होता. त्यावर साक्ष नोंदवू नये, यासाठी पोलिसांकडून दबाब तर नव्हता ना, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे. विलासने आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असावे, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याबाबत पोलीस मात्र अल्पेश हत्या प्रकरणातील आरोपींच्या धमकीमुळे विलासने आत्महत्या केली असावी, असा जावईशोध घेत आहे.(वार्ताहर)