शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही!

By admin | Updated: November 30, 2015 01:59 IST

देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले.

सुधीर सावंत : जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महिला अधिवेशनवर्धा : देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले. त्यामुळे कृषिक्षेत्राचे महत्त्व कमी होऊन वैफल्य, आत्महत्या आदींचा शिरकाव झाला. शेतकऱ्यांचा स्वाभिमान परत येण्यासाठी कृषी क्षेत्राला अग्रक्रम द्यावाच लागेल, असे आग्रही मत माजी खासदार व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी सहाव्या सत्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन, चिंता आणि चिंतन या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात सावंत बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस किशोर माथनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डी. छाया महाले, देवीदास साबापुरे, नारायण चोपडे, जयश्री कुरूटकर, अनुराधा ठोंबरे, डॉ. रेखा पाटील, लता ढेरे, कांच उल्हे आणि सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते. सुधीर सावंत म्हणाले, भारतात बाराही महिने सूर्य तळपत असतो. त्यामुळे येथे बारमाही पिके घेता येतात. तरीही आपलेच उत्पन्न आपल्याला पुरत नसल्याची स्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे. शेतकरी आत्महत्या ह्या भारतातच नाही तर इतर देशातही होत आहेत. त्याचे मूळ कारणच भाडवली अर्थव्यवस्थेत शेतीला देण्यात आलेले दुय्यम स्थान. सेवाक्षेत्रामुळे सर्वांना शासकीय नोकरी हवी आहे. त्यामुळे तर कषी क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान पदोपदी दुखावला जात आहे. आपल्याच कुटुंबाचे पालन पोषण करू शकत नसल्याचं शक्य त्याला बोचत आहे. महाराष्ट्रात ४० टक्के शेतकरी आत्महत्या या मुलाच्या लग्नासाठी द्याव्या लागत असलेल्या हुंड्यामुळे होत असल्याचे निरीक्षणही सावंत यांनी यावेळी नोंदविले. किशोर माथनकर म्हणाले, निखळ शेती करीत असलेला शेतकरीच शेती कसताना काय समस्या येतात हे सांगू शकतो. अनेक क्षेत्र ही केवळ शेतीमुळे जिवंत आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रांनी शेतीची कदर करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान कमीत कमी खर्चात हळद काढण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या करंजाळा, हिंगोली येथील किसनराव मुळे यांचा सत्कार झाला. ते उपस्थित नसल्याने त्यांच्या पत्नीला हा सन्मान देण्यात आला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. संचालन प्रज्ञा ब्राह्माणकर तर आभार डॉ. विद्या कळसाईत यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)