शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही!

By admin | Updated: November 30, 2015 01:59 IST

देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले.

सुधीर सावंत : जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महिला अधिवेशनवर्धा : देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले. त्यामुळे कृषिक्षेत्राचे महत्त्व कमी होऊन वैफल्य, आत्महत्या आदींचा शिरकाव झाला. शेतकऱ्यांचा स्वाभिमान परत येण्यासाठी कृषी क्षेत्राला अग्रक्रम द्यावाच लागेल, असे आग्रही मत माजी खासदार व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी सहाव्या सत्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन, चिंता आणि चिंतन या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात सावंत बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस किशोर माथनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डी. छाया महाले, देवीदास साबापुरे, नारायण चोपडे, जयश्री कुरूटकर, अनुराधा ठोंबरे, डॉ. रेखा पाटील, लता ढेरे, कांच उल्हे आणि सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते. सुधीर सावंत म्हणाले, भारतात बाराही महिने सूर्य तळपत असतो. त्यामुळे येथे बारमाही पिके घेता येतात. तरीही आपलेच उत्पन्न आपल्याला पुरत नसल्याची स्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे. शेतकरी आत्महत्या ह्या भारतातच नाही तर इतर देशातही होत आहेत. त्याचे मूळ कारणच भाडवली अर्थव्यवस्थेत शेतीला देण्यात आलेले दुय्यम स्थान. सेवाक्षेत्रामुळे सर्वांना शासकीय नोकरी हवी आहे. त्यामुळे तर कषी क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान पदोपदी दुखावला जात आहे. आपल्याच कुटुंबाचे पालन पोषण करू शकत नसल्याचं शक्य त्याला बोचत आहे. महाराष्ट्रात ४० टक्के शेतकरी आत्महत्या या मुलाच्या लग्नासाठी द्याव्या लागत असलेल्या हुंड्यामुळे होत असल्याचे निरीक्षणही सावंत यांनी यावेळी नोंदविले. किशोर माथनकर म्हणाले, निखळ शेती करीत असलेला शेतकरीच शेती कसताना काय समस्या येतात हे सांगू शकतो. अनेक क्षेत्र ही केवळ शेतीमुळे जिवंत आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रांनी शेतीची कदर करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान कमीत कमी खर्चात हळद काढण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या करंजाळा, हिंगोली येथील किसनराव मुळे यांचा सत्कार झाला. ते उपस्थित नसल्याने त्यांच्या पत्नीला हा सन्मान देण्यात आला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. संचालन प्रज्ञा ब्राह्माणकर तर आभार डॉ. विद्या कळसाईत यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)