शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही!

By admin | Updated: November 30, 2015 01:59 IST

देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले.

सुधीर सावंत : जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महिला अधिवेशनवर्धा : देश स्वतंत्र झाला त्या काळापासूनच देशात भांडवली अर्थव्यवस्थेची पाळेमुळे मजबूत झाली. तेव्हापासूनच कृषी क्षेत्र हे इतर उद्योगांकरिता केवळ कच्चा माल पुरविणारे साधन ठरले. त्यामुळे कृषिक्षेत्राचे महत्त्व कमी होऊन वैफल्य, आत्महत्या आदींचा शिरकाव झाला. शेतकऱ्यांचा स्वाभिमान परत येण्यासाठी कृषी क्षेत्राला अग्रक्रम द्यावाच लागेल, असे आग्रही मत माजी खासदार व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी सहाव्या सत्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन, चिंता आणि चिंतन या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणात सावंत बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस किशोर माथनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डी. छाया महाले, देवीदास साबापुरे, नारायण चोपडे, जयश्री कुरूटकर, अनुराधा ठोंबरे, डॉ. रेखा पाटील, लता ढेरे, कांच उल्हे आणि सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते. सुधीर सावंत म्हणाले, भारतात बाराही महिने सूर्य तळपत असतो. त्यामुळे येथे बारमाही पिके घेता येतात. तरीही आपलेच उत्पन्न आपल्याला पुरत नसल्याची स्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे. शेतकरी आत्महत्या ह्या भारतातच नाही तर इतर देशातही होत आहेत. त्याचे मूळ कारणच भाडवली अर्थव्यवस्थेत शेतीला देण्यात आलेले दुय्यम स्थान. सेवाक्षेत्रामुळे सर्वांना शासकीय नोकरी हवी आहे. त्यामुळे तर कषी क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान पदोपदी दुखावला जात आहे. आपल्याच कुटुंबाचे पालन पोषण करू शकत नसल्याचं शक्य त्याला बोचत आहे. महाराष्ट्रात ४० टक्के शेतकरी आत्महत्या या मुलाच्या लग्नासाठी द्याव्या लागत असलेल्या हुंड्यामुळे होत असल्याचे निरीक्षणही सावंत यांनी यावेळी नोंदविले. किशोर माथनकर म्हणाले, निखळ शेती करीत असलेला शेतकरीच शेती कसताना काय समस्या येतात हे सांगू शकतो. अनेक क्षेत्र ही केवळ शेतीमुळे जिवंत आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रांनी शेतीची कदर करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान कमीत कमी खर्चात हळद काढण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या करंजाळा, हिंगोली येथील किसनराव मुळे यांचा सत्कार झाला. ते उपस्थित नसल्याने त्यांच्या पत्नीला हा सन्मान देण्यात आला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले. संचालन प्रज्ञा ब्राह्माणकर तर आभार डॉ. विद्या कळसाईत यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)