शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पांदणमुक्तीविना ग्रामस्वच्छता नाही

By admin | Updated: July 25, 2016 01:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या ....

अनुदानातही केली वाढ : गावांतील पांदण रस्त्याची पालटणार दशा आष्टी (शहीद) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव आणि संत गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. या योजनांसाठी प्रत्येक गाव आधी पांदणमुक्त करावे लागणार आहे. तोपर्यंत योजनेत समावेश होणार नाही, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. यातून गावातील पांदण रस्ते विकासाची वाट मोकळी झाली आहे. शिवाय योजनेचे अनुदानही वाढवून देण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावातील पांदण रस्ते विकसित होण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगातून खर्च करता येणार आहे. मागील वर्षी राज्य शासनाने ग्रामस्वच्छता अभियानाला तात्पुरती स्थगिती देऊन गाव विकासासाठी परिश्रम घेणाऱ्या गावकरी तथा ग्रामसेवकांचा हिरमोड केला होता. अनेक गावांतील सरपंचांनी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाला जाब विचारला होता. यावर मंत्रीमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनुसार येत्या २ आॅक्टोबरपासून अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी विविध पातळीवरून मूल्यमापन होणार आहे. मुख्य संसाधन केंद्र यांच्याकडून गावातील सर्व बाबींची तपासणी होणार आहे. यानंतरच ग्रामस्वच्छता अभियानात गावाचा समावेश होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे शासकीय योजना कटाक्षाने राबविल्या जाणार असल्याचे दिसून येते. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने प्रती शौचालय १२ हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. नागरिकांनी खड्डा खोदून द्यायचा असून उर्वरित सर्व खर्च शासनाकडून केला जात आहे. एवढी सुविधा देऊनही काही गावांतील नागरिक आडकाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी गावातील राजकारण आडवे येत आहे. गाव शिवारातील अनेक पांदण रस्ते अतिक्रमणाने घेरले गेले आहेत. शेतकरी धुऱ्यावर अतिक्रमण करून बसल्याने पांदण रस्ते दिसत नाहीत. ग्रामपंचायत पातळीवर मोजमाप करून देण्यासाठी पैसे भरावे लागत आहेत. अनेक ग्रामपंचायतींची स्थिती जेमतेम असून कराचा पैसा वसूल झाला नाही. अशा स्थितीत गावातील पांदण रस्ते मोकळे झाले नाही; पण शासनाने नवीन अट घातल्याने याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. आष्टी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त गावामध्ये १०० टक्के पात्र ठरल्या आहेत. उर्वरित ठिकाणी शौचालयांचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे. हागणदारी मुक्तीनंतर आता शासनाने ग्रामस्वच्छता अभियानासाठी पांदण मुक्ती करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गावांतील पांदण रस्त्यांचे रूप पालटणार, असेच दिसते.(तालुका प्रतिनिधी) पुरस्काराच्या रकमेतही केली वाढ ग्रामस्वच्छता अभियान राबवित असताना शासनाकडून पुरस्कार दिले जात होते. या पुरस्कारांच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली आहे. यात तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतीला पूर्वी २५ हजार, द्वितीय १५ हजार तृतीय १० हजार अशी रक्कम दिली जात होती. आता प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय ५० हजार रुपये तर तृतीय २५ हजार रुपये पुरस्कार देण्यात येणार आहे. तेवढ्या तीव्रतेने गावांतील कामेही करावी लागणार आहेत. शिवाय पांदण रस्त्यांची अट घातल्याने आता गावाच्या स्वच्छतेसह पांदण रस्त्यांची दशाही पालटणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.