शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दीड वर्षांत बंधाऱ्याला पडल्या भेगा

By admin | Updated: July 11, 2017 00:59 IST

सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिरकुटणी येथे दीड वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते; ..

पाणीसाठा शून्य : शेतकऱ्यांचा रस्ता झाला बंद, १४ एकर शेती पडिकलोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिरकुटणी येथे दीड वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते; पण संबंधित यंत्रणेने या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने बंधाऱ्याला दोन ठिकाणी भेगा पडल्या आहेत. शिवाय नाला खोलीकरण केल्याने शेतकऱ्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे १४ एकर शेती पडिक राहिली. याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मौजा शिरकुटणी शिवारात सर्व्हे क्र. ६६/१, ६६/२ हे शेत महिला शेतकरी पुष्पा कांदे, अर्चना कडवे यांच्या मालकीचे आहे. एकूण आराजी १४ एकर आहे. या शेतात अगदी धुऱ्यावर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यासाठी १२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. बंधारा बांधकाम झाल्यावर नाला खोलीकरण करण्यात आले. याठिकाणी असलेला शासकीय पांदण रस्ता पूर्णत: खोदकाम करून बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी वारंवार रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करण्यात आली; पण जि.प. लघुसिंचन उपविभागाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आता बांधकामाचा सूमार दर्जा समोर आल्याने या विभागात सध्या खळबळ माजली आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने एवढा मोठा बंधारा बांधूनही पाणीसाठा होताना दिसत नाही. सदर काम वर्धा येथील अग्रवाल एजेंसीने केल्याचे अभियंत्याकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी १४ एकर शेती मागील दोन वर्षांपासून पडिक ठेवली आहे. शेताचा बराच भाग नाला खोलीकरणात खोदून आराजीदेखील कमी करण्यात आली आहे. सदर बंधारा बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता समोरून भेगा पडल्याचे दिसून आले. मागील बाजूला भगदाड पडले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात गिट्टीऐवजी गोटे टाकल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या कामाचा फलक उभारण्यात आला असून त्यावर प्राकलन किंमत टाकली नाही. यामुळे नेमके किती रुपयांचे काम आहे, याचा अंदाज येत नाही. लघुसिंचन विभागाने बंधाऱ्याची दुरुस्ती करावी. १४ एकर शेताची नुकसान भरपाई द्यावी व खोदलेला रस्ता पाईप टाकून दुरूस्त करून द्यावा, अशी मागणी शेतकरी कांदे, कडवे यांनी निवेदनातून केली आहे. रस्ता करून देण्यासही दोन वर्षांपासून टाळाटाळजिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्यावतीने शिरकुटणी येथे शेतालगत बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यानंतर नाला खोलीकरण करण्यात आले. हे करीत असताना शेताची वहिवाट करण्याकरिता असलेल्या पांदण रस्त्याचेही खोदकाम करण्यात आले. यानंतर सदर पांदण रस्ता दुरूस्त करून देणे वा पुलाचे बांधकाम करीत शेतीच्या वहिवाटीसाठी रस्ता तयार करून देणे गरजेचे होते; पण रस्ता तयार करण्यात आला नाही. रस्ता करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने दोन वर्षांपासून १४ एकर शेती पडिक आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय खोदकामात शेताची आराजीही कमी झाली. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.जिल्हा परिषद लघुसिंचन उपविभाग आर्वीकडून बंधारा बांधकाम करण्यात आले. यात माझ्या शेताचा रस्ता खोदून नाला करण्यात आला. याची दुरुस्ती न केल्यास मला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल. - पुष्पा कांदे, महिला शेतकरी, आष्टी (शहीद). सदर बंधारा व नाला खोलीकरणामुळे रस्ता बंद झाल्याची पाहणी करतो. यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई करणार आहे. रस्ता दुरुस्त करून देण्यास सांगण्यात येईल.- एच.पी. गहलोत, कार्यकारी अभियंता, जि.प. लघुसिंचन विभाग, वर्धा.