शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत

By admin | Updated: January 15, 2015 22:55 IST

जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यानुसार प्रकल्पांतर्गत शहरीकरण वा अन्य कारणामुळे पीक घेतले जात नाही, अशी ४६ गावे वगळता उर्वरित १३४१ गावांची

अंतिम पैसेवारी जाहीर : जिल्ह्यातील १३४१ गावांत दुष्काळसदृश स्थितीवर्धा : जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यानुसार प्रकल्पांतर्गत शहरीकरण वा अन्य कारणामुळे पीक घेतले जात नाही, अशी ४६ गावे वगळता उर्वरित १३४१ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० च्या आत आहे. आर्वी तालुक्यातील ३६ गावांसह आष्टी आणि कारंजा तालुक्यातील एकूण २९२ गावांची पैसेवारीही ५० च्या आत दर्शविली आहे. या पूर्वी या गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक होती. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर जिल्हा प्रशासनाने दखल घेत या गावांनाही अखेर न्याय दिला आहे. अंतिम पैसेवारीनुसार, वर्धा तालुक्यातील १५४ गावे, सेलूतील १६८, देवळीतील १४९, हिंगणघाटातील १८७, समुद्रपूरातील २१९, आर्वीतील २०८, आष्टीतील १३६ आणि कारंजा तालुक्यातील १२० गावे अशी एकूण १३८७ पैकी १३४१ गावांची पैसेवारी ५० च्या आत जाहीर करण्यात आली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार मदतखरीप हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत १२८.८९ कोटी रुपये मिळणार आहे. पैकी ५३.७४ कोटी रुपये प्राप्त झालेले आहे. म्हणजे आवश्यकतेपैकी ४० टक्केच मदत प्राप्त झाली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात परस्पर जमा करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनात सुरू आहे.ही शासकीय मदत जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकऱ्यांना मिळणार याची आकडेवारीही प्रशासन काढण्याच्या कामात व्यस्त असली तरी ढोबळमानाने ती सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना मिळतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामध्ये सर्वच गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना मिळतील, अशी माहिती आहे.