शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वर्ध्यात येऊन गांधी आश्रमभेटीची इच्छा पूर्ण झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:48 IST

अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे गांधी आश्रमात घालविला दीड तास

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम  : सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी भेट देत आश्रमातील कार्याची माहिती जाणून घेतली. अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, सुमारे दीड तासांचा वेळ राज्यपालांनी गांधी आश्रमात घालविला.राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी १ वाजता आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळ, बापू की आत्मकथा, इंडिया माय ड्रीम व हिंद स्वराज ही पुस्तके देऊन त्यांचे आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत केले.

त्यानंतर राज्यपालांनी आदी निवास, बा-कुटी, बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास आदी स्मारकांना भेट देत माहिती जाणून घेतली. स्मारक तसेच आश्रमातील कार्याची माहिती प्रभू यांनी दिली. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली. या प्रसंगी पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, सरपंच सुजाता ताकसांडे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर आदींची उपस्थिती होती.भेटवहीत नोंदविला अभिप्रायबापू व विनोबा यांच्या साधनास्थळी येण्याची संधी मिळाली. साधेपणा, शांती, आत्मनिर्भरतेचा आभास या ठिकाणी होत आहे. या पवित्र तीर्थस्थळी युवाशक्तींचे भ्रमण व्हावे. नवीन पिढीने बापूंनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास सर्वच्या सर्व देशी, सर्व भाषा आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या बापूंच्या स्वप्नांना साकार करू शकतील. प्रवचक, साधक आहे, भगिनींना सादर प्रणाम! असा अभिप्राय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रमातील भेटवहीत नोंदविला.

रसोड्याच्या शेजारी घेतला जेवणाचा आस्वादआश्रमातील रसोड्याच्या बाजूच्या ठिकाणी टेबल-खुर्ची लावून राज्यपालांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी राज्यपाल कोश्यारी यांनी मिक्स भाजी, आलू-वांग्याची भाजी, पुरण, वरण-भात, मठ्ठा, सलाद आणि चटणीचा आस्वाद घेतला. तसेच आश्रम भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी खादीच्या कपड्यांची खरेदी केली. काही वेळ त्यांनी आश्रमच्या कार्यालयात घालवून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यपालांनी व्यक्त केली खंतपत्रकारांशी संवाद साधताना टी. आर. एन. प्रभू म्हणाले, अनेक दिवसांची गांधीजींच्या आश्रमात येण्याची इच्छा या भेटीतून पूर्ण झाली. नवी पिढी गांधी- विनोबांच्या विचारांकडे वळत नसल्याची खंत राज्यपालांनी व्यक्त केल्याचे प्रभू यांनी सांगितले. लॉकडाऊन शासनाचा निर्णय आहे. आश्रम पर्यटकांसाठी बंद आहे. अशातच राज्यपालांनी भेट दिली. ते अती महत्त्वाचे व्यक्ती असल्याने ते आश्रमात आले. आश्रम सर्वांचे असून या ठिकाणी येणाऱ्यांचे स्वागत आहे, असेही प्रभू यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSewagramसेवाग्राम