शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

वर्ध्यात येऊन गांधी आश्रमभेटीची इच्छा पूर्ण झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:48 IST

अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे गांधी आश्रमात घालविला दीड तास

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम  : सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी भेट देत आश्रमातील कार्याची माहिती जाणून घेतली. अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, सुमारे दीड तासांचा वेळ राज्यपालांनी गांधी आश्रमात घालविला.राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी १ वाजता आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळ, बापू की आत्मकथा, इंडिया माय ड्रीम व हिंद स्वराज ही पुस्तके देऊन त्यांचे आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत केले.

त्यानंतर राज्यपालांनी आदी निवास, बा-कुटी, बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास आदी स्मारकांना भेट देत माहिती जाणून घेतली. स्मारक तसेच आश्रमातील कार्याची माहिती प्रभू यांनी दिली. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली. या प्रसंगी पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, सरपंच सुजाता ताकसांडे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर आदींची उपस्थिती होती.भेटवहीत नोंदविला अभिप्रायबापू व विनोबा यांच्या साधनास्थळी येण्याची संधी मिळाली. साधेपणा, शांती, आत्मनिर्भरतेचा आभास या ठिकाणी होत आहे. या पवित्र तीर्थस्थळी युवाशक्तींचे भ्रमण व्हावे. नवीन पिढीने बापूंनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास सर्वच्या सर्व देशी, सर्व भाषा आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या बापूंच्या स्वप्नांना साकार करू शकतील. प्रवचक, साधक आहे, भगिनींना सादर प्रणाम! असा अभिप्राय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रमातील भेटवहीत नोंदविला.

रसोड्याच्या शेजारी घेतला जेवणाचा आस्वादआश्रमातील रसोड्याच्या बाजूच्या ठिकाणी टेबल-खुर्ची लावून राज्यपालांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी राज्यपाल कोश्यारी यांनी मिक्स भाजी, आलू-वांग्याची भाजी, पुरण, वरण-भात, मठ्ठा, सलाद आणि चटणीचा आस्वाद घेतला. तसेच आश्रम भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी खादीच्या कपड्यांची खरेदी केली. काही वेळ त्यांनी आश्रमच्या कार्यालयात घालवून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यपालांनी व्यक्त केली खंतपत्रकारांशी संवाद साधताना टी. आर. एन. प्रभू म्हणाले, अनेक दिवसांची गांधीजींच्या आश्रमात येण्याची इच्छा या भेटीतून पूर्ण झाली. नवी पिढी गांधी- विनोबांच्या विचारांकडे वळत नसल्याची खंत राज्यपालांनी व्यक्त केल्याचे प्रभू यांनी सांगितले. लॉकडाऊन शासनाचा निर्णय आहे. आश्रम पर्यटकांसाठी बंद आहे. अशातच राज्यपालांनी भेट दिली. ते अती महत्त्वाचे व्यक्ती असल्याने ते आश्रमात आले. आश्रम सर्वांचे असून या ठिकाणी येणाऱ्यांचे स्वागत आहे, असेही प्रभू यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSewagramसेवाग्राम