शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

वर्ध्यात येऊन गांधी आश्रमभेटीची इच्छा पूर्ण झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:48 IST

अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे गांधी आश्रमात घालविला दीड तास

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम  : सेवाग्राम येथील गांधी आश्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रविवारी भेट देत आश्रमातील कार्याची माहिती जाणून घेतली. अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, सुमारे दीड तासांचा वेळ राज्यपालांनी गांधी आश्रमात घालविला.राज्यपाल कोश्यारी यांचे दुपारी १ वाजता आश्रमात आगमन होताच आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री मुकुंद मस्के यांनी सूतमाळ, बापू की आत्मकथा, इंडिया माय ड्रीम व हिंद स्वराज ही पुस्तके देऊन त्यांचे आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने स्वागत केले.

त्यानंतर राज्यपालांनी आदी निवास, बा-कुटी, बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास आदी स्मारकांना भेट देत माहिती जाणून घेतली. स्मारक तसेच आश्रमातील कार्याची माहिती प्रभू यांनी दिली. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली. या प्रसंगी पालकमंत्री सुनील केदार, खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, सरपंच सुजाता ताकसांडे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर आदींची उपस्थिती होती.भेटवहीत नोंदविला अभिप्रायबापू व विनोबा यांच्या साधनास्थळी येण्याची संधी मिळाली. साधेपणा, शांती, आत्मनिर्भरतेचा आभास या ठिकाणी होत आहे. या पवित्र तीर्थस्थळी युवाशक्तींचे भ्रमण व्हावे. नवीन पिढीने बापूंनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास सर्वच्या सर्व देशी, सर्व भाषा आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या बापूंच्या स्वप्नांना साकार करू शकतील. प्रवचक, साधक आहे, भगिनींना सादर प्रणाम! असा अभिप्राय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आश्रमातील भेटवहीत नोंदविला.

रसोड्याच्या शेजारी घेतला जेवणाचा आस्वादआश्रमातील रसोड्याच्या बाजूच्या ठिकाणी टेबल-खुर्ची लावून राज्यपालांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. याच ठिकाणी राज्यपाल कोश्यारी यांनी मिक्स भाजी, आलू-वांग्याची भाजी, पुरण, वरण-भात, मठ्ठा, सलाद आणि चटणीचा आस्वाद घेतला. तसेच आश्रम भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी खादीच्या कपड्यांची खरेदी केली. काही वेळ त्यांनी आश्रमच्या कार्यालयात घालवून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यपालांनी व्यक्त केली खंतपत्रकारांशी संवाद साधताना टी. आर. एन. प्रभू म्हणाले, अनेक दिवसांची गांधीजींच्या आश्रमात येण्याची इच्छा या भेटीतून पूर्ण झाली. नवी पिढी गांधी- विनोबांच्या विचारांकडे वळत नसल्याची खंत राज्यपालांनी व्यक्त केल्याचे प्रभू यांनी सांगितले. लॉकडाऊन शासनाचा निर्णय आहे. आश्रम पर्यटकांसाठी बंद आहे. अशातच राज्यपालांनी भेट दिली. ते अती महत्त्वाचे व्यक्ती असल्याने ते आश्रमात आले. आश्रम सर्वांचे असून या ठिकाणी येणाऱ्यांचे स्वागत आहे, असेही प्रभू यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSewagramसेवाग्राम