शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेलींमुळे तारा लोंबकळल्या

By admin | Updated: July 23, 2016 02:41 IST

पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झुडपी वेली वाढल्या आहेत. विजेच्या खांबावरून तारांवर या वेली लोंबक ळत आहे.

तारा तुटल्यास वीजप्रवाह खंडित होण्याची भीती, वर्धा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झुडपी वेली वाढल्या आहेत. विजेच्या खांबावरून तारांवर या वेली लोंबक ळत आहे. दिवसेंदिवस या वेली वाढत असल्याने वजन वाढून ताराही लोंबकळत आहे. यामुळे तारा तुटून अपघाताचा धोका वाढला आहे. हाच प्रकार सध्या जेल रोड परिसरात पाहावयास मिळत आहे. महावितरणने याकडे लक्ष देत वेलींना तोडून तारांना स्वच्छ करणे गरजेचे झाले आहे. पावसाला सुरुवात होताच वेली, गवत उगवायला सुरुवात होते. पावसाळ्यात त्या अधिक बहरतात. वेलवर्गीय झाडे वाढताना वर जाण्यासाठी धडपड करीत असतो. त्यामुळे आसपासच्या झाडांचा अथवा वीजखांबांचा आधार घेत या वेली वर चढत जातात. वीजखांबांचा आधार घेत वर गेलेल्या वेली आडव्या तारांवर वाढत जातात. त्यामुळे आडव्या तारांवर वेलींचे बनच तयार होते. शिवाजी चौकाकडून जेल कडे जात असलेल्या मार्गावर वीजतारांवर वेलींचा असाच विळखा पडला आहे. त्यामुळे वीजतारांना लोंबकळत आहे. वेली वाढत आहे तससश्या ताराही दिवसेंदिवस लोंबकळत आहे. असेच सुरू राहिल्यास काहीच दिवसात झाडांपासून तार तुटून पडण्याची शक्यता आहे. या तारांमध्ये वीजप्रवाह सुरू असल्याने तारा तुटल्यास धोका होऊ शकतो. त्यातच सध्या पाऊस सुरू आहे. या वेली पावसाचेही पाणी धरून ठेवत असल्याने तारांवररील वेलींचे वजन आणखी वाढते. अश्यावेळी ंतारा तुटून रस्त्यावर पसरल्यास वीजतारांचा स्पर्श होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या मार्गावर अनेक शाळा असल्याने येथे विद्यार्थी सतत ये जा करीत असतात. अशा स्थितीत त्यांच्याही जीवितास धोका उत्पन्न होत आहे. पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी हा प्रकार दिसून येतो. तरेही महावितरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करतात. अपघात झाल्यावरच वीज वितरणला जाग येईल का असा प्रश्नही या परिसरात राहणारे नागरिक व्यक्त करतात. यावर कार्यवाही गरजेची आहे.(शहर प्रतिनिधी) वीजखांबही झुकले वेलींचा वीजतारांवर विळखा पडल्याने तारा तर लोंबकळत आहेच पण विजेचे खांबही झुकत चालले आहे. असेच चित्र राहिल्यास खांब आणखी झुकता केव्हा पडेल याचा नेम नाही. या वेली तोंडून तारांवरील भार कमी कराणे गरजेचे आहे. हा प्रकार शहरात सर्वत्र दिसतो. शेतशिवारांमध्येही हे चित्र आहे. पण कुणाचेही याकडे लक्ष नसल्याने धोका वाढला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शहराचा एकदा तरी फेरफटका मारल्यास त्यांना ही बाब निदर्शनास येईल. महावितरणने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे.