शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

वेलींमुळे तारा लोंबकळल्या

By admin | Updated: July 23, 2016 02:41 IST

पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झुडपी वेली वाढल्या आहेत. विजेच्या खांबावरून तारांवर या वेली लोंबक ळत आहे.

तारा तुटल्यास वीजप्रवाह खंडित होण्याची भीती, वर्धा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झुडपी वेली वाढल्या आहेत. विजेच्या खांबावरून तारांवर या वेली लोंबक ळत आहे. दिवसेंदिवस या वेली वाढत असल्याने वजन वाढून ताराही लोंबकळत आहे. यामुळे तारा तुटून अपघाताचा धोका वाढला आहे. हाच प्रकार सध्या जेल रोड परिसरात पाहावयास मिळत आहे. महावितरणने याकडे लक्ष देत वेलींना तोडून तारांना स्वच्छ करणे गरजेचे झाले आहे. पावसाला सुरुवात होताच वेली, गवत उगवायला सुरुवात होते. पावसाळ्यात त्या अधिक बहरतात. वेलवर्गीय झाडे वाढताना वर जाण्यासाठी धडपड करीत असतो. त्यामुळे आसपासच्या झाडांचा अथवा वीजखांबांचा आधार घेत या वेली वर चढत जातात. वीजखांबांचा आधार घेत वर गेलेल्या वेली आडव्या तारांवर वाढत जातात. त्यामुळे आडव्या तारांवर वेलींचे बनच तयार होते. शिवाजी चौकाकडून जेल कडे जात असलेल्या मार्गावर वीजतारांवर वेलींचा असाच विळखा पडला आहे. त्यामुळे वीजतारांना लोंबकळत आहे. वेली वाढत आहे तससश्या ताराही दिवसेंदिवस लोंबकळत आहे. असेच सुरू राहिल्यास काहीच दिवसात झाडांपासून तार तुटून पडण्याची शक्यता आहे. या तारांमध्ये वीजप्रवाह सुरू असल्याने तारा तुटल्यास धोका होऊ शकतो. त्यातच सध्या पाऊस सुरू आहे. या वेली पावसाचेही पाणी धरून ठेवत असल्याने तारांवररील वेलींचे वजन आणखी वाढते. अश्यावेळी ंतारा तुटून रस्त्यावर पसरल्यास वीजतारांचा स्पर्श होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या मार्गावर अनेक शाळा असल्याने येथे विद्यार्थी सतत ये जा करीत असतात. अशा स्थितीत त्यांच्याही जीवितास धोका उत्पन्न होत आहे. पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी हा प्रकार दिसून येतो. तरेही महावितरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करतात. अपघात झाल्यावरच वीज वितरणला जाग येईल का असा प्रश्नही या परिसरात राहणारे नागरिक व्यक्त करतात. यावर कार्यवाही गरजेची आहे.(शहर प्रतिनिधी) वीजखांबही झुकले वेलींचा वीजतारांवर विळखा पडल्याने तारा तर लोंबकळत आहेच पण विजेचे खांबही झुकत चालले आहे. असेच चित्र राहिल्यास खांब आणखी झुकता केव्हा पडेल याचा नेम नाही. या वेली तोंडून तारांवरील भार कमी कराणे गरजेचे आहे. हा प्रकार शहरात सर्वत्र दिसतो. शेतशिवारांमध्येही हे चित्र आहे. पण कुणाचेही याकडे लक्ष नसल्याने धोका वाढला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शहराचा एकदा तरी फेरफटका मारल्यास त्यांना ही बाब निदर्शनास येईल. महावितरणने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे.