शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

वेलींमुळे तारा लोंबकळल्या

By admin | Updated: July 23, 2016 02:41 IST

पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झुडपी वेली वाढल्या आहेत. विजेच्या खांबावरून तारांवर या वेली लोंबक ळत आहे.

तारा तुटल्यास वीजप्रवाह खंडित होण्याची भीती, वर्धा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झुडपी वेली वाढल्या आहेत. विजेच्या खांबावरून तारांवर या वेली लोंबक ळत आहे. दिवसेंदिवस या वेली वाढत असल्याने वजन वाढून ताराही लोंबकळत आहे. यामुळे तारा तुटून अपघाताचा धोका वाढला आहे. हाच प्रकार सध्या जेल रोड परिसरात पाहावयास मिळत आहे. महावितरणने याकडे लक्ष देत वेलींना तोडून तारांना स्वच्छ करणे गरजेचे झाले आहे. पावसाला सुरुवात होताच वेली, गवत उगवायला सुरुवात होते. पावसाळ्यात त्या अधिक बहरतात. वेलवर्गीय झाडे वाढताना वर जाण्यासाठी धडपड करीत असतो. त्यामुळे आसपासच्या झाडांचा अथवा वीजखांबांचा आधार घेत या वेली वर चढत जातात. वीजखांबांचा आधार घेत वर गेलेल्या वेली आडव्या तारांवर वाढत जातात. त्यामुळे आडव्या तारांवर वेलींचे बनच तयार होते. शिवाजी चौकाकडून जेल कडे जात असलेल्या मार्गावर वीजतारांवर वेलींचा असाच विळखा पडला आहे. त्यामुळे वीजतारांना लोंबकळत आहे. वेली वाढत आहे तससश्या ताराही दिवसेंदिवस लोंबकळत आहे. असेच सुरू राहिल्यास काहीच दिवसात झाडांपासून तार तुटून पडण्याची शक्यता आहे. या तारांमध्ये वीजप्रवाह सुरू असल्याने तारा तुटल्यास धोका होऊ शकतो. त्यातच सध्या पाऊस सुरू आहे. या वेली पावसाचेही पाणी धरून ठेवत असल्याने तारांवररील वेलींचे वजन आणखी वाढते. अश्यावेळी ंतारा तुटून रस्त्यावर पसरल्यास वीजतारांचा स्पर्श होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या मार्गावर अनेक शाळा असल्याने येथे विद्यार्थी सतत ये जा करीत असतात. अशा स्थितीत त्यांच्याही जीवितास धोका उत्पन्न होत आहे. पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी हा प्रकार दिसून येतो. तरेही महावितरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करतात. अपघात झाल्यावरच वीज वितरणला जाग येईल का असा प्रश्नही या परिसरात राहणारे नागरिक व्यक्त करतात. यावर कार्यवाही गरजेची आहे.(शहर प्रतिनिधी) वीजखांबही झुकले वेलींचा वीजतारांवर विळखा पडल्याने तारा तर लोंबकळत आहेच पण विजेचे खांबही झुकत चालले आहे. असेच चित्र राहिल्यास खांब आणखी झुकता केव्हा पडेल याचा नेम नाही. या वेली तोंडून तारांवरील भार कमी कराणे गरजेचे आहे. हा प्रकार शहरात सर्वत्र दिसतो. शेतशिवारांमध्येही हे चित्र आहे. पण कुणाचेही याकडे लक्ष नसल्याने धोका वाढला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शहराचा एकदा तरी फेरफटका मारल्यास त्यांना ही बाब निदर्शनास येईल. महावितरणने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे.