शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

हरणार नाय, लढणार, ४५०० झाडांचे करू रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:27 IST

स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देव्हीजेएमसह संघटनांचा संकल्प : आगलाव्या विकृतीला प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विकृतांनी घडविलेल्या आगीच्या या तिसऱ्या घटनेनंतर ‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू‘ असे म्हणत वैद्यकीय जनजागृती मंचासह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नव्या दमाने साडेचार हजार वृक्षरोपांची लागवड करून जिंकू आणि जिंकूच, असा संकल्प केला आहे. जळालेल्या झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देत नवसंजीवनी दिली जात आहे.ओसाड हनुमान टेकडी परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी आणि वर्धा शहरातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. पदाधिकाऱ्यांनी एवढ्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. यामुळे हनुमान टेकडी परिसराला आॅक्सिजन पार्क अशीच नवी ओळख मिळाली. याच आॅक्सिजन पार्क परिसरात कित्येक जण सकाळी फिरायला येतात. रविवारी रात्री उशीरा अचानक याच परिसरात आग लागली. परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत घटनेची माहिती इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांना दिली. दरम्यान, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले होते. एक-दीड महिन्यांच्या कालावधीत विकृत मानसिकतेने टेकडीला तीनवेळा ‘टार्गेट’ केले. या घटनांना प्रत्युत्तर म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचासह विविध संघटनांनी तुम्ही निरागस, कोवळ्या ४५० झाडांची होळी केली तर नव्याने ४५०० वृक्षरोपांची मियावाकी प्रकल्प राबवून लागवड करण्याचा निर्धार केला आहे. जळित झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जात आहे. झाडे जाळण्याचे कार्य करणाऱ्यांनो, सावध व्हा, कारण प्रत्येक निसर्गमित्र आमच्या पाठीशी ठामपणे उभा असून नव्याने वृक्षलागवडीसाठी सज्ज आहे आणि हे कार्य कधीच थांबणार नसल्याचेही वैद्यकीय जनजागृती मंचने म्हटले आहे.