शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

हरणार नाय, लढणार, ४५०० झाडांचे करू रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:27 IST

स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देव्हीजेएमसह संघटनांचा संकल्प : आगलाव्या विकृतीला प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विकृतांनी घडविलेल्या आगीच्या या तिसऱ्या घटनेनंतर ‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू‘ असे म्हणत वैद्यकीय जनजागृती मंचासह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नव्या दमाने साडेचार हजार वृक्षरोपांची लागवड करून जिंकू आणि जिंकूच, असा संकल्प केला आहे. जळालेल्या झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देत नवसंजीवनी दिली जात आहे.ओसाड हनुमान टेकडी परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी आणि वर्धा शहरातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. पदाधिकाऱ्यांनी एवढ्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. यामुळे हनुमान टेकडी परिसराला आॅक्सिजन पार्क अशीच नवी ओळख मिळाली. याच आॅक्सिजन पार्क परिसरात कित्येक जण सकाळी फिरायला येतात. रविवारी रात्री उशीरा अचानक याच परिसरात आग लागली. परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत घटनेची माहिती इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांना दिली. दरम्यान, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले होते. एक-दीड महिन्यांच्या कालावधीत विकृत मानसिकतेने टेकडीला तीनवेळा ‘टार्गेट’ केले. या घटनांना प्रत्युत्तर म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचासह विविध संघटनांनी तुम्ही निरागस, कोवळ्या ४५० झाडांची होळी केली तर नव्याने ४५०० वृक्षरोपांची मियावाकी प्रकल्प राबवून लागवड करण्याचा निर्धार केला आहे. जळित झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जात आहे. झाडे जाळण्याचे कार्य करणाऱ्यांनो, सावध व्हा, कारण प्रत्येक निसर्गमित्र आमच्या पाठीशी ठामपणे उभा असून नव्याने वृक्षलागवडीसाठी सज्ज आहे आणि हे कार्य कधीच थांबणार नसल्याचेही वैद्यकीय जनजागृती मंचने म्हटले आहे.