शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाचा लाभ वर्धेतील सहकारी सूतगिरण्यांना होणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:41 IST

राज्यमंत्रिमंडळाने मंगळवारी सहकारी सूत गिरण्यांच्या मदतीसाठी नवा आकृतीबंध जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील सहकारी तत्त्वावरील वस्त्रोउद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या धोरणात सुधारणा केली आहे.

ठळक मुद्देकामगारांना आशा : जुन्या गिरण्यांसाठी तरतूदीबाबत संंभ्रमावस्था

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यमंत्रिमंडळाने मंगळवारी सहकारी सूत गिरण्यांच्या मदतीसाठी नवा आकृतीबंध जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील सहकारी तत्त्वावरील वस्त्रोउद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या धोरणात सुधारणा केली आहे. या निर्णयाचा लाभ वर्धा जिल्ह्यातील बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी, इंदिरा सहकारी सूत गिरणी यांना मिळेल काय? असा सवाल कामगारांनी केला आहे.या सूत गिरण्या स्थापन होऊन १५ ते २० वर्षांचा कालावधी लोटला. त्यामुळे या सूत गिरण्यांचे आधुनिकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या सूत गिरण्यांवरील कर्जाचा बोझाही कमी करण्याची गरज आहे. मात्र, विद्यमान सरकारचे विदर्भातील सहकारी सूतगिरण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने या सूत गिरण्या कशाबशा सुरू व बंद अशा अवस्थेतून मार्गक्रमण करीत आहेत.काँग्रेस सरकारच्या राजवटीत दिवंगत बापूरावजी देशमुख आणि प्रमोद शेंडे यांनी वर्धा जिल्ह्यात सहकारी सूत गिरणी सुरू केली होती. या दोन्ही सूत गिरणींमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना नोकºया देण्यात आल्या होत्या. सुरूवातीच्या काळात राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन शेतकºयांसाठी या सूत गिरण्यांनी काम केले. शेतकºयांकडून थेट कापूस खरेदी करून त्याचे सूत तयार करण्याचे काम करण्यात आले. मात्र, त्यानंतर या सूत गिरण्या कर्जाच्या खाईत लोटल्या गेल्या. तसेच क्षमतेपेक्षा अधिक कामगारांची भरती, वीजेचे वाढते बिल, राज्य सहकारी बँकेच्या कर्जाचा बोझा यामुळे आधुनिक यंत्र सामुग्री खरेदी करणे शक्य झाले नाही. शिवाय कालांतराने यंत्र सामुग्रीची झीज होऊन या सूत गिरण्यांना उतरती कळा लागली. त्यानंतर या सूत गिरण्या आंध्रातील खासगी व्यापाºयांना चालविण्यासाठी देण्यात आल्या. राज्य सहकारी बँकेच्या कर्जाबाबतची प्रकरणे कोर्टापर्यंत गेली. मात्र, या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत सहकारी सूत गिरण्यांच्या मदतीसाठी नवा आकृतीबंध जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयात सध्याच्या १०:३०:६० या आकृतीबंधात सुधारणा करून तो ५:४५:५० असा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या निर्णयामुळे सभासद, भागभांडवल (५%) कमी करून शासकीय भागभांडवल (४५%) वाढविताना कर्जाचे प्रमाण कमी (५०%) याशिवाय नव्या आकृतीबंधामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या कापूस उत्पादक प्रदेशात सहकारी सूत गिरणीच्या स्थापनेस प्रोत्साहन देण्याबाबत ठरविण्यात आले आहे; पण विदर्भातील जुन्या सहकारी गिरण्यांना यात किती लाभ दिला जाईल. किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या गिरण्या म्हणून यांना डावलले जाईल काय? हा प्रश्न अजूनही कायम आहे. वर्धा जिल्ह्यातील या दोन गिरण्यात जवळपास अडीच हजार कामगारांचे भवितव्य गुंतलेले आहेत, हे विशेष.