शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पुलाचे स्वप्न पूर्ण होणार?

By admin | Updated: January 10, 2015 23:01 IST

मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव ते आर्वी रस्त्यावर रेल्वेगेट आहे़ रेल्वे गाड्यांच्या सतत रहदारीमुळे हे गेट कित्येक तास बंद असते़ यामुळे वाहतुकीची कोंडी होते़ रेल्वे

प्रभाकर शहाकार - पुलगावमध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव ते आर्वी रस्त्यावर रेल्वेगेट आहे़ रेल्वे गाड्यांच्या सतत रहदारीमुळे हे गेट कित्येक तास बंद असते़ यामुळे वाहतुकीची कोंडी होते़ रेल्वे लाईनमुळे पुलगाव शहरही उत्तर-दक्षिण भागात विभागले गेले आहे़ यामुळे रेल्वे उड्डाण पूल गरजेचा आहे़ चार महिन्यांपूर्वी ४५ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन झाले़ निविदा काढल्या; पण कामास सुरूवात झाली नाही़ यामुळे रेल्वे उड्डाण पुलाचे स्वप्न पूर्ण होणार काय, हा प्रश्नच आहे़ अनेक वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले़ जागा, मुख्य बाजारपेठ, निधी व अन्य कारणांनी उड्डाण पुलाचा प्रश्न रेंगाळला होता़ यात हैदराबाद-भोपाळ महामार्ग बंद राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती़ ही कोंडी सुटावी म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले़ याचे फलित म्हणून रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लागला. राज्य शासनाचे ३५ कोटी व केंद्र शासनाचे १० कोटी असे ४५ कोटी रुपये पुलासाठी मंजूर झाले़ पुलाच्या बांधकामास राज्य शासनाने नियोजन प्रकरण क्र. ६७९ नियोजन-३ दि. २७ मे २०१४ अन्वये मान्यता दिली़ जून २०१४ च्या पुरवणी अर्थ संकल्पात हा प्रकल्प नव्याने समाविष्ट करून निधीची तरतूदही करण्यात आली़ रेल्वे मंत्रालयानेही उड्डाण पुलाच्या नकाशाला मान्यता दिली़ पुलाच्या बांधकाम निविदाही काढल्या; पण ठराविक मुदतीत कुठलीही निविदा प्राप्त न झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नरेंद्र बोरकर यांनी दिली.या उड्डाण पुलाची लांबी ६५६ मीटर तर रूंदी १२ मीटर राहणार आहे. रेल्वेच्या ३ खांबांसह एकूण ३४ खांबांवर बांधण्यात येणारा हा उड्डाण पूल तीन पदरी राहणार आहे. पुलाचा उतार आर्वी नाका व दुसऱ्या बाजूचा उतार मील व बस आगार यांच्या मधील मार्गावर राहणार आहे. आर्वीकडून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्याच्या दृष्टीने दक्षिणेकडील उताराखालून मार्ग राहणार आहे. यानवीन प्रस्तावामुळे स्टेशन चौकातील व्यापारी प्रतिष्ठानेही सुरक्षित राहणार आहेत़ आता या रेल्वे उड्डाण पुलाला प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊन मूर्त रूप कधी प्राप्त होणार, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत़