शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सीबीएसई शाळांवर नियंत्रण कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:02 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये मनमर्जी कारभार सुरू असतानाच खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्येही गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची पालकांना सक्ती केली जात आहे. यावर शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने रोष व्यक्त होत आहे. या प्रकाराला वेळीच आळा घालण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देगणवेश, पाठ्यपुस्तके खरेदीची सक्ती : पालकांची आर्थिक लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये मनमर्जी कारभार सुरू असतानाच खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्येही गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची पालकांना सक्ती केली जात आहे. यावर शिक्षण विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने रोष व्यक्त होत आहे. या प्रकाराला वेळीच आळा घालण्याची मागणी होत आहे.सीबीएसई शाळांमध्ये सर्वच शैक्षणिक व इतर साहित्य शाळांतूनच खरेदी करण्याबाबत सक्ती केली जाते. या शाळांचे कापड, पुस्तक व्यावसायिकांसोबतच साटेलोटे आहे. या माध्यमातून पालकांची आर्थिक लूट सुरू आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अनेक कायम विनाअनुदानित व अनुदानित शाळांमध्येही आता सर्रास पुस्तके आणि गणवेश विक्री सुरू आहे. सीबीएसईच्या सिलॅबसला पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याची मुभा शाळांना देण्यात आलेली आहे. २० टक्यांपर्यंतचा कन्टेट बदलण्याचा शाळांना अधिकार आहे. शाळानिहाय पुस्तके बदलतात. राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके अनुदानित व विनाअनुदानित शाळांकरिता एकसारखी असतात. तरीदेखील मागील काही वर्षांपासूनच पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश आणि इतर साहित्य शाळेतूनच खरेदी करण्याबाबत सक्ती करण्यात येत आहे. अनेक सीबीएसई व राज्य क्षिण मंडळाच्या शाळांकडून सवलतीच्या दरात पाठ्यपस्तके देत असल्याबाबत दावा करतात. मात्र, दोन्ही सत्राच्या वह्या एकत्रच खरेदी करण्याची सक्ती केली जात असून त्यामुळे पालकांचे अर्थकारण कोलमडत आहे. गणवेश, पाठ्यपुस्तके आणि इतर साहित्याचा खर्च पाच ते दहा हजारांपर्यंत आहे. यातून शाळा व्यवस्थापनेही मालामाल होत आहेत.यामुळे शाळेच्या माध्यमातूनच साहित्य खरेदी करण्याबाबत सक्ती केली जात आहे. नव्या सत्राची लवकरच सुरुवात होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापनांकडून पालकांना पाठ्यपुस्तके गणवेश व इतर शालेय वस्तू कोणत्या दुकानातून खरेदी करावे, याची यादीच देण्यात आलेली आहे.शाळांनी ठरवून दिलेला गणवेश ठरावीक दुकानातूनच खरेदी करावा, असा नियमच असल्याने पुरवठादार आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात आर्थिक साटेलोटे असून शाळा व्यवस्थापन अशा प्रकारच्या कंत्राटातून लाखोंची कमाई करताना दिसून येत आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांचे खिसे रिते होत आहेत. मात्र, शासन, शिक्षण विभागाचे यावर कुठलेही नियंत्रण नसल्याने शिक्षणाचे बाजारीकरण केले जात असल्याच्याही टीका शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहेत.शाळांचा दुकानांशी करारसीबीएसई व राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांनी शहरातील काही दुकानांशी करारच केला आहे. त्यामुळे संबंधित शाळेतील गणवेश ठरावीक दुकानातच उपलब्ध होतील, अशी स्थिती दरवर्षी असते. यात पालक अथवा विद्यार्थ्यांना दुसरा कुठलाही पर्याय देण्यात आलेला नाही. त्यामुळे सक्तीला आता विरोध होताना दिसत आहे.शाळांचे लूट धोरणसीबीएसई व राज्य शिक्षण मंडळाच्या शाळेतून वर्षभर विविध उपक्रमांच्या नावाखाली पैसे उकळले जातात. सत्राअखेर स्रेहसंमेलनाकरिता लागणारे कॉस्ट्युम शाळेकडूनच उपलब्ध करून दिले जात असून मोठ्या रकमा उकळल्या जातात. अनेक पालकांना हा खर्च न झेपावणारा असल्याने त्यांच्याकडून ओरड होते.