शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:58 IST

अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी द्विधा मनस्थितीत : ठोस निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाच्या भाववाढीची तो प्रतीक्षा करीत आहे.कापूस खरेदीच्या मुहूर्ताला व्यापाऱ्यांनी ५८०० ते ९०० असा भाव दिल्याने कापूस ६००० च्या वर जाईल, अशी आशा होती, पण दिवाळीचा सण आणि कापसाची वेचणी एकाचवेळी आल्याने शेतकऱ्यांजवळ कापूस वेचणीची मजुरी देण्यासाठी पैशाची चणचण असल्याने मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. यावर्षी पाऊस वेळेवर आला नसल्याने तसेच शेतातील विहिरीला असलेली पाणीपातळी कमी झाल्याने कोरडवाहू तसेच बागायती शेतातील कपाशीचे पिकाचे उत्पादन घटले. अशा परिस्थितीत कापसाला भाव चांगला मिळेल, अशी आशा कापूस उत्पादक शेतकºयांना होती. अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांनासुद्धा शेतमालाला मिळणारा भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºयांवर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय नेते शेतमालाला भाव कमी मिळत असताना गप्प आहेत. त्यामुळे अस्मानी संकट आले तर ते मान्य, पण सुल्तानी संकट कायमच असल्याने आच्छे दिनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा करावी लागत आहे कापूस वेचणीस मजूर मिळेना, कापूस वेचणी महागली, अशात भाव उतरत आहे. कापसाची प्रत चांगली नसल्याने भावात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी कापसाचे पीक परवडणार नाही, तर युवा शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापसाचे स्थिर भाव कापूस उत्पादकांच्या पथ्यावर पडत आहे. नवीन वर्षात तरी कापसाचे भाव वाढतील, ही आशा शेतकऱ्यांना असल्याने तूर्तास कापूस विक्री थांबविण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसत आहे. उत्पादन खर्चावर भाव हे मृगजळ ठरत असताना बोंडअळीच्या अनुदानासाठी शेतकरी बँकेच्या पायºया वर्षभरापासून झिजवत आहे. कर्जमाफीपासून शेतकरी अद्याप दूर असल्याने चर्चेतून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.राजकीय पुढारी मौन बाळगूनअच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांना सद्यस्थितीत शेतमालाला मिळत असलेला भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली तर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय पुढारी आज शेतमालाला कमी भाव मिळत असताना मौन बाळगून आहेत. कुणी वालीच नसल्याने दाद तरी कुणाकडे मागायची, असा पश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :cottonकापूस