शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:58 IST

अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी द्विधा मनस्थितीत : ठोस निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाच्या भाववाढीची तो प्रतीक्षा करीत आहे.कापूस खरेदीच्या मुहूर्ताला व्यापाऱ्यांनी ५८०० ते ९०० असा भाव दिल्याने कापूस ६००० च्या वर जाईल, अशी आशा होती, पण दिवाळीचा सण आणि कापसाची वेचणी एकाचवेळी आल्याने शेतकऱ्यांजवळ कापूस वेचणीची मजुरी देण्यासाठी पैशाची चणचण असल्याने मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. यावर्षी पाऊस वेळेवर आला नसल्याने तसेच शेतातील विहिरीला असलेली पाणीपातळी कमी झाल्याने कोरडवाहू तसेच बागायती शेतातील कपाशीचे पिकाचे उत्पादन घटले. अशा परिस्थितीत कापसाला भाव चांगला मिळेल, अशी आशा कापूस उत्पादक शेतकºयांना होती. अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांनासुद्धा शेतमालाला मिळणारा भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºयांवर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय नेते शेतमालाला भाव कमी मिळत असताना गप्प आहेत. त्यामुळे अस्मानी संकट आले तर ते मान्य, पण सुल्तानी संकट कायमच असल्याने आच्छे दिनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा करावी लागत आहे कापूस वेचणीस मजूर मिळेना, कापूस वेचणी महागली, अशात भाव उतरत आहे. कापसाची प्रत चांगली नसल्याने भावात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी कापसाचे पीक परवडणार नाही, तर युवा शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापसाचे स्थिर भाव कापूस उत्पादकांच्या पथ्यावर पडत आहे. नवीन वर्षात तरी कापसाचे भाव वाढतील, ही आशा शेतकऱ्यांना असल्याने तूर्तास कापूस विक्री थांबविण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसत आहे. उत्पादन खर्चावर भाव हे मृगजळ ठरत असताना बोंडअळीच्या अनुदानासाठी शेतकरी बँकेच्या पायºया वर्षभरापासून झिजवत आहे. कर्जमाफीपासून शेतकरी अद्याप दूर असल्याने चर्चेतून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.राजकीय पुढारी मौन बाळगूनअच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांना सद्यस्थितीत शेतमालाला मिळत असलेला भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली तर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय पुढारी आज शेतमालाला कमी भाव मिळत असताना मौन बाळगून आहेत. कुणी वालीच नसल्याने दाद तरी कुणाकडे मागायची, असा पश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :cottonकापूस