शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

पांढरे सोनं चकाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:04 IST

आनंद इंगोले । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यावर्षी पावसाच्या हुलकावणीने कापसाचे उत्पादन घटले आहेत. परिणामी आंततराष्ट्रीय बाजारात तेजी ...

ठळक मुद्देउत्पादनात घट : भाव सहा हजार पार होण्याची शक्यता

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी पावसाच्या हुलकावणीने कापसाचे उत्पादन घटले आहेत. परिणामी आंततराष्ट्रीय बाजारात तेजी राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पांढऱ्या सोन्याचे भाव दिवाळीनंतर वधारण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा भाव ६ हजारांचाही पल्ला पार करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन कापसाची विक्री करण्याची गरज आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून दगाफटकाच बसला आहे. मागील वर्षी कापूस उत्पादकांना गुलाबी बोंडअळीच्या प्रकोपामुळे नुकसान सहन करावे लागले. तर यावर्षी परतीच्या पावासाने पाठ फिरविल्याने उत्पादनात मोठी घट झाली. कोरडवाहू शेतकऱ्यांचे उत्पादन निम्यावर आले असून सिंचनाची सोय असलेल्या कापूस उत्पादनकांनाही यावर्षी तुट सहन करावी लागत आहे. मागील दोन वर्षापूर्वी एकारी १२ ते १४ क्विंटल कापूस झाला. परंतु, मागील वर्षी आणि यंदा हा उतारा केवळ सहा ते दहा दरम्यानच स्थिरावला आहे. काही भागांमध्ये पहिल्याच वेच्यात उलंगवाडी झाल्याची स्थिती पहावयास मिळते.यामुळे उत्पादनात घट असल्याने शासनाचा ५ हजार ४५० रुपयाचा हमीभाव पार करुन कापसाला सध्या ५ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हा भावही मागील काही दिवसांपासून कमी झाला नसल्याने दिवाळीनंतर वधारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत चांगल्या प्रतिचा कापूस निघणार असल्याने या कापसाला सहा हजार रुपयांपेक्षाही जास्त भाव मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. सध्या सीसीआयपेक्षाही अधीक भाव शासनाकडून मिळत असल्याने शेतकरी बाजार समित्यांकडेच धाव घेत आहेत. यावर्षी शेतकºयांनी सहा हजार रुपयापेक्षाही जास्त भाव मिळाला तर शेतकºयांना तेवढाच आधार होईल, असे कपाशी उत्पादक शेतकºयांकडून बोलले जात आहे. शासनानेही उत्पादन खर्चावर आधारीत कापसाला भाव देण्याची मागणी आहे.दुष्काळाच्या सावटामुळे उलंगवाडीजिल्ह्यात सध्या दुष्काळाचे सावट असल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. तसेच जलाशयही तळच दाखवत असल्याने शेतकऱ्यांना आता सिंचनाकरिता अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी कापूस उत्पादनात घट सहन करावी लागत आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांची पहिल्याच वेच्यात उलंगवाडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.यावर्षी कापसाचे पीक कमी झाले असून कोरवाहू कापसाच्या उत्पन्नात जवळपास ३० ते ४० टक्के घट झाली आहे. कापसाच्या भाव वाढीचा प्रश्न जागतिक दर्जाचा आहेत.सध्या सुताचे व कापडाचे भाव कमी आहेत. त्या भावात वाढ झाली तर कापसाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.पण, कापसाचे भाव यापेक्षा कमीही होणार नाही.- अ‍ॅड.सुधीर कोठारी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाटमोदी सरकारने हमीभाव वाढविल्यामुळे कापसाचे दर वाढलेले नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमुल्यन झाल्यामुळे कापसाचे दर वाढले आहेत. मागील वर्षी शासनाने ४ हजार ३०० रुपये हमी भाव जाहीर केल्यानंतर बाजारपेठेत कापूस ५ हजार २०० रुपयापर्यंत गेला होता. यावर्षी ५ हजार ४५० रुपये हमीभाव दिल्यानंतर कापसाचे भाव ५ हजार ८०० पर्यंत पोहोचले यात काही वावगं नाही. जागतिक बाजारात तेजी असल्याचे सांगितले जाते त्यानुसार कापसाला फारसा भाव मिळालेला नाही. सरकीचे आणि रुईचेही भाव कमी आहे. याच्या भावात वाढ झाली तरच कापसाचा भाव आणखी वाढू शकतो.-विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे पाईक