शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मजुरांअभावी पांढरे सोन शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 21:55 IST

गत वर्षी तूर व सोयाबीन पिकाने दगा दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : स्व:खर्चाने करावी लागते मजुरांची ने-आण

आॅनलाईन लोकमतचिकणी (जामणी) : गत वर्षी तूर व सोयाबीन पिकाने दगा दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, सध्या कापूस वेचण्यासाठी वेळीच मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. अनेक शेतकऱ्यांना कापूस अद्यापही मजुरांअभावी शेतातच आहे. कापूस वेचणीसाठी जे मजूर उपलब्ध होत आहेत त्यांची ने-आण शेतकऱ्यांना स्व: खर्चाने करावी लागत आहे.गत दोन वर्षांपासून नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागला. मागील वर्षी तूर उत्पादकांनाही बºयापैकी उत्पन्न न झाल्याने यंदाच्यावर्षी बहूतांश शेतकऱ्यांनी तूर पिकाकडे पाठ करीत कपाशीची लागवड केली. पीक बोंडावर आले असता बोंडअळीच्या प्रकोपाने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले. इतकेच नव्हे तर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नातही घट झाल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येते. निसर्गाच्या लहरीपणाचा यंदाही फटका सहन करावा लागल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच कापूस वेचणीसाठी मजूरच सहज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मजूरही या ना त्या कारणाने वेठीस धरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जे शेतमजूर कापूस वेचणीच्या कामासाठी मिळत आहेत त्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्याला स्व:खर्चाने शेतात ने-आण करावी लागत आहे. त्यामुळे जादाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.करावी लागतेय भटकंतीगावातच कापूस वेचणीच्या कामासाठी सहज मजूर मिळत नसल्याने परिसरातील कापूस उत्पादकांना गावाबाहेरुन मजूर आणून कापूस वेचणीचे काम करावे लागत आहे. इतकेच नव्हे तर कापूस वेचणीच्या कामाकरिता मजुरांचा शोध घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकºयांना भटकंती करावी लागत आहे. कापूस उत्पादक शेतकºयांकडून परिसरातील गावांसह जिल्ह्याबाहेरील मजुरांकडून काम केले जात आहे. मजुरांअभावी डोकेदुकी वाढली आहे.