शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालन अर्थसाहाय्य योजना ठरली पांढरा हत्ती

By admin | Updated: October 15, 2014 23:22 IST

जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य

वर्धा : जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य योजना तयार करण्यात आली. पण शासकीय अधिकाऱ्यांच्या दफ्तरदिरंगाईमुळे ही योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.जिल्ह्यातील पशुधन घटत चालले आहे. ते वाढावे यासाठी शासनाने पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या योजना कागदावरच असल्याचे वास्तव दिसून येत आहे. जगण्याचे मुख्य साधन म्हणून शेतीकडे पाहिल्या जाते. आजही ग्रामीण भागातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीबरोबरच कुटुंबाचे अर्थचक्र व्यवस्थित चालावे यासाठी पशुपालनावर भर दिला जातो. सध्या पशूपालन हा व्यवसाय करीत असलेल्यांसाठी अनेक योजना आहेत. पण शासन त्याची योग्य माहितीच देत नसल्याने आणि अनुदान देताना त्रास देत असल्याने या योजना कागदावरच उरल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर शेती व्यवसायात सातत्याने वैशिष्टपूर्ण बदल झाले आहेत. अयोेग्य नियोजन, निसर्गाने न दिलेली साथ, व्यवसायासाठी कर्जाऊ घेतलेल्या भांडवलाचे वाढलेले व्याज, वाढती महागाई आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पशुपालन हा शेतकऱ्यासांठी आर्थिक आधार ठरत आहे. मात्र शासनाने राबविलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नसल्याने आर्थिक स्वावलंबनात अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षात सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता शासनाने पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या. परंतु, अद्यापही या योजनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही, ग्रामीण भागात मोजक्याच लोकांना या योजनाबद्दलची माहिती मिळाली आहे. बऱ्याच लोकांना योजनाच माहित नसल्याने योजना या पांढरा हत्ती ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)