शहरं
Join us  
Trending Stories
1
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
4
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
5
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
6
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
7
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
8
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
9
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
10
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
11
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
12
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
13
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
14
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
15
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
16
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
17
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
18
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
19
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
20
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी

पशुपालन अर्थसाहाय्य योजना ठरली पांढरा हत्ती

By admin | Updated: October 15, 2014 23:22 IST

जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य

वर्धा : जिल्ह्यात वनविभागाचे क्षेत्र हे बरेच आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या ही लक्षणीय आहे. असे असतानाही चराईसाठी पशुधन मात्र मोठ्या प्रमाणात घटले चालले आहे. ते वाढावे यासाठी पशुपालन अथसहाय्य योजना तयार करण्यात आली. पण शासकीय अधिकाऱ्यांच्या दफ्तरदिरंगाईमुळे ही योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.जिल्ह्यातील पशुधन घटत चालले आहे. ते वाढावे यासाठी शासनाने पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या योजना कागदावरच असल्याचे वास्तव दिसून येत आहे. जगण्याचे मुख्य साधन म्हणून शेतीकडे पाहिल्या जाते. आजही ग्रामीण भागातील जनतेचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीबरोबरच कुटुंबाचे अर्थचक्र व्यवस्थित चालावे यासाठी पशुपालनावर भर दिला जातो. सध्या पशूपालन हा व्यवसाय करीत असलेल्यांसाठी अनेक योजना आहेत. पण शासन त्याची योग्य माहितीच देत नसल्याने आणि अनुदान देताना त्रास देत असल्याने या योजना कागदावरच उरल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर शेती व्यवसायात सातत्याने वैशिष्टपूर्ण बदल झाले आहेत. अयोेग्य नियोजन, निसर्गाने न दिलेली साथ, व्यवसायासाठी कर्जाऊ घेतलेल्या भांडवलाचे वाढलेले व्याज, वाढती महागाई आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पशुपालन हा शेतकऱ्यासांठी आर्थिक आधार ठरत आहे. मात्र शासनाने राबविलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नसल्याने आर्थिक स्वावलंबनात अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षात सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता शासनाने पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या. परंतु, अद्यापही या योजनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही, ग्रामीण भागात मोजक्याच लोकांना या योजनाबद्दलची माहिती मिळाली आहे. बऱ्याच लोकांना योजनाच माहित नसल्याने योजना या पांढरा हत्ती ठरत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)