शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

व्हाईट कॉलर मद्यपींसाठी विश्रामगृह ‘सेफ झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:40 IST

महात्मा गांधींच्या पावन स्पर्शाने पुणीत झालेल्या या जिल्ह्याला दारूबंदी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. पण, या जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे सर्वश्रुत आहे. नुकताच बुधवारी बापंूचा हुतात्मादिन पाळण्यात आला. याच दिवशी स्थानिक शासकीय विश्रामगृहाचा फेरफटका मारला असता ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाल्याने दारूबंदी जिल्ह्यातील हे वास्तव थक्क करणारे आहे.

ठळक मुद्देदारुबंदी जिल्ह्यातील वास्तव : दारुच्या बाटल्यांचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींच्या पावन स्पर्शाने पुणीत झालेल्या या जिल्ह्याला दारूबंदी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. पण, या जिल्ह्यातील दारूबंदी केवळ कागदोपत्रीच असल्याचे सर्वश्रुत आहे. नुकताच बुधवारी बापंूचा हुतात्मादिन पाळण्यात आला. याच दिवशी स्थानिक शासकीय विश्रामगृहाचा फेरफटका मारला असता ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाल्याने दारूबंदी जिल्ह्यातील हे वास्तव थक्क करणारे आहे.दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर वाहताना दिसतो. पोलिसांची अधिकाधिक मेहनत दारू पकडण्यातच खर्च होत आहे. त्यातून काही आपले जीवन समृद्ध करण्यासाठीही झटत आहे. पण, तरीही कारवाईचा धाक असणारे व्हाईट कॉलर मद्यपी आपल्या तोंडावरील सभ्यतेचा बुरखा कायम ठेवण्याकरिता शासकीय विश्राम गृहाचा आडोसा घेत आहेत. शहरातील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या विश्रामगृहाच्या आवारातील दारूच्या रिकाम्या बाटल्या येथील तळीरामांच्या कारनाम्याची साक्ष देतात. येथे काही शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व पांढरपेशे दारूरंगी रंगतात. यापूर्वीही असे प्रकार उघडकीस आले असून याला अद्यापही आळा बसलेला नाही.विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान येथून हाकेच्या अंतरावर आहे. पोलीस अधीक्षकांचेही निवासस्थान याच मार्गावर असताना काही दारूविक्रेतेही दुचाकीने याच परिसरात दारूची देवाण-घेवाण करताना दिसून येतात. शासकीय परिसर असल्याने याकडे कुणीही लक्ष देत नाही. याचाच फायदा काही दारूविके्रते व मद्यपी घेत आहेत. सध्या हे शासकीय विश्रामगृह व्हाईट कॉलर मद्यपींसाठी सेफ झोनच ठरत असल्याचे दिसून येत आहे.शासकीय कार्यालयातही हीच स्थितीसिव्हिल लाईन परिसरात अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारती आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रशासकीय भवन या परिसरात महागड्या दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून येतात. तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीतही दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहे. बाहेरचा व्यक्ती शासकीय कार्यालयात येऊन दारु पिण्याची हिंमत करणार नाही. त्यामुळे या बाटल्या कोण रिचवितात? हे सर्वांनाच कळण्यासारखे आहे. पण, याला पायबंद घालण्यासाठी कुणी धजावत नसल्याने दारुबंदीची शक्यता धूसरच आहे. या कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच आता हा प्रकार थांबवावा.प्रशासनाच्या दिव्याखाली अंधारशहरात शांतता व सुवस्था राखण्यासोबतच जिल्ह्यातील दारुबंदीची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. पण, याच प्रशासनातील शासकीय कार्यालयांत मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पाहावयास मिळत असल्याने प्रशासनाच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेत या प्रकाराला आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.