शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

दिवाळी साजरी करण्यासाठी पैसा आणायचा कोठून ?

By admin | Updated: October 18, 2014 23:41 IST

जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली. नवे सभापती निवडले गेले. विषय समित्यांचे वाटप बुधवारी करण्यात आले. यामध्ये शिक्षण समिती मिलिंद भेंडे यांना वाट्याला आले. ही सभा होताच त्यांनी

नव्या शिक्षण सभापतीच्या फतव्याने शिक्षक चिंतेत : गुंडाळलेल्या उपक्रमाची नव्याने सक्तीवर्धा : जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली. नवे सभापती निवडले गेले. विषय समित्यांचे वाटप बुधवारी करण्यात आले. यामध्ये शिक्षण समिती मिलिंद भेंडे यांना वाट्याला आले. ही सभा होताच त्यांनी शाळांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा फतवा काढला. दिवाळी ही आनंद देणारा, घरात सुख शांती आणणारा, जीवन प्रकाशमान करणारा सण आहे. राष्ट्रीय सण म्हणूही साजरा केला जातो. एकाएकी धडकलेल्या या निर्णयामुळे निधी कोठून आणायचा, लोकसहभाग किती लाभेल, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समित्यांंना पडला आहे. भेंडे हे यापूर्वी कॉँग्रेसमध्ये होते. तेव्हा जिल्हा परिषदेवर कॉँग्रेसची सत्ता असताना त्यांना सभापती पदाचा मान मिळाला होता. तेव्हाही त्यांच्याकडे जि.प.चे शिक्षण सभापतीपद होते. त्याहीवेळी त्यांनी शाळांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम पुढे आणला होता. त्यावेळीही हा उपक्रम वादग्रस्त ठरला होता. परिणामी त्यांच्यानंतरच्या सभापतींनी हा उपक्रम कायमचा बासणात काढला होता. आता ते भाजपात असताना सभापती झाले आणि पुन्हा तोच निर्णय शाळांवर लादल्याचा सूर शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे. कोणतीही योजना कागदावर आली म्हणजे ती राबविली असा अर्थ होत नाही. शाळा व्यवस्थापन समितीची आर्थिक सुबता नाही. ही योजना राबविण्यासाठी निधी कोठून आणायचा, याचा सभापतींनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात कुठेही उल्लेख नाही. मग हा उपक्रम योजना राबविण्यासाठी लागणारा निधी, शिक्षकांचा समन्वय, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा समन्वय या बाबींचा थातुरमातूर विचार करुन केवळ हा उपक्रम लादण्याचा प्रकार असल्याचा सूर शिक्षकवर्गात उमटत आहे. एकूणच या उपक्रमाबाबत साशंकतेचे वातावरण शाळांमध्ये निर्माण झाल्याने तो कितपत यशस्वी होतो, याबाबत संभ्रम आहे. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, शाळांमध्ये पोषण आहाराची रक्कम येते. त्यातून खाद्यपदार्थाचा खर्च करायचा आहे. तसेच समाज सहभागही घ्यायचा आहे. या उपक्रमाला शिक्षण समितीची मंजुरी मिळाली आहे. शाळेतील उपक्रमांना एकत्र करुन एक स्नेहमिलन सोहळा साजरा करायचा आहे. त्याला ‘दिवाळी सर्वांची स्नेहमिलन’ असे नाव दिले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)