शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एसटीच्या ११४ फेऱ्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

पाच महिन्यांपासून विलीनीकरणाचा लढा सुरू असतानाच न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम आंदोलनकर्त्यांना  दिला. न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १२४४ कर्मचारी कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही बसेस सोडल्या जात आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांमधून सध्या ९६६ फेऱ्यांद्वारे ७२ हजार किमीचा प्रवास बसेस करीत असल्या तरी अजूनही १४४ फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधी कोरोना संकट व नंतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, यामुळे लोकवाहिनी अशी ओळख असलेल्या रापमच्या बसेस आगारात उभ्या राहिल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर आता न्यायालयाच्या अल्टिमेटमनंतर रापमचे कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. परिणामी, ९६६ फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अजूनही जिल्ह्यातील तब्बल ११४ बस फेऱ्या सुरू न झाल्याने त्या केव्हा सुरू होणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.रापम कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर रापमलाही मोठा आर्थिक फटका बसला. बसेस आगारातच उभ्या राहिल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी दुप्पट-तिप्पट भाडे नागरिकांकडून घेत प्रवासी वाहतूक केली. पाच महिन्यांपासून विलीनीकरणाचा लढा सुरू असतानाच न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम आंदोलनकर्त्यांना  दिला. न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १२४४ कर्मचारी कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही बसेस सोडल्या जात आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांमधून सध्या ९६६ फेऱ्यांद्वारे ७२ हजार किमीचा प्रवास बसेस करीत असल्या तरी अजूनही १४४ फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्या वेळीच सुरू करण्याची गरज आहे. तशी  मागणीही  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची आहे.

शैक्षणिक फेऱ्या बंदच-   आदिवासी भागातील मुलींना शैक्षणिक सोयी-सवलतीसाठी राज्यात मानव विकासच्या निळ्या बसेस आहेत.-   वर्धा जिल्ह्याच्या शेजारील अमरावती आणि नागपूर विभागात या बसेस असून, वर्धा विभागातील पाचही आगारांत मानव विकासच्या या बसेस नाहीत. -    वर्धा जिल्ह्यात रापमच्या वतीने विद्यार्थ्यांची बाजू लक्षात घेता, काही बसेस सोडल्या जातात. असे असले तरी जिल्ह्यातील विविध शाळांनाही सुटी लागल्याने या बसफेऱ्या बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांची गैरसोय

पाच महिन्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. त्यामुळे सर्व ठिकाणी बसेस धावत आहेत. मात्र, अनेक गावात बसेस जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. ग्रामीण भागासाठीही बसेस सोडण्यात याव्यात.- मनीष उभाड, ग्रामस्थ, लाडेगाव.

सुरुवातीला कोविड, तर नंतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बस गावात येत नव्हती. त्यामुळे खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. खासगी प्रवासी वाहतूक करणारे जास्तच प्रवासी भाडे घेतात. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागातही बसेस सोडल्या पाहिजेत.- गौरव ठाकरे, ग्रामस्थ, हिवरा.

आर्वी आगारात ४३  बसेस असून, पूर्ण शेडुल्ड व फेऱ्या  सुरू आहे. १६ हजार कि.मी. या बसेस धावतात. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी असल्याने त्या फेऱ्या गर्दीच्या ठिकाणी दुसरीकडे वळविण्यात आल्या आहेत. लग्नसराईचे दिवस असल्याने उत्पन्नातही भर पडली आहे. सध्या सव्वा सहा लाखांचे दररोजचे उत्पन्न आहे.- जयकुमार इंगोले, आगार व्यवस्थापक.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप