शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

एसटीच्या ११४ फेऱ्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

पाच महिन्यांपासून विलीनीकरणाचा लढा सुरू असतानाच न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम आंदोलनकर्त्यांना  दिला. न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १२४४ कर्मचारी कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही बसेस सोडल्या जात आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांमधून सध्या ९६६ फेऱ्यांद्वारे ७२ हजार किमीचा प्रवास बसेस करीत असल्या तरी अजूनही १४४ फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधी कोरोना संकट व नंतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, यामुळे लोकवाहिनी अशी ओळख असलेल्या रापमच्या बसेस आगारात उभ्या राहिल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर आता न्यायालयाच्या अल्टिमेटमनंतर रापमचे कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. परिणामी, ९६६ फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अजूनही जिल्ह्यातील तब्बल ११४ बस फेऱ्या सुरू न झाल्याने त्या केव्हा सुरू होणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.रापम कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर रापमलाही मोठा आर्थिक फटका बसला. बसेस आगारातच उभ्या राहिल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी दुप्पट-तिप्पट भाडे नागरिकांकडून घेत प्रवासी वाहतूक केली. पाच महिन्यांपासून विलीनीकरणाचा लढा सुरू असतानाच न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम आंदोलनकर्त्यांना  दिला. न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत १२४४ कर्मचारी कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही बसेस सोडल्या जात आहेत. जिल्ह्यातील पाच आगारांमधून सध्या ९६६ फेऱ्यांद्वारे ७२ हजार किमीचा प्रवास बसेस करीत असल्या तरी अजूनही १४४ फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्या वेळीच सुरू करण्याची गरज आहे. तशी  मागणीही  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची आहे.

शैक्षणिक फेऱ्या बंदच-   आदिवासी भागातील मुलींना शैक्षणिक सोयी-सवलतीसाठी राज्यात मानव विकासच्या निळ्या बसेस आहेत.-   वर्धा जिल्ह्याच्या शेजारील अमरावती आणि नागपूर विभागात या बसेस असून, वर्धा विभागातील पाचही आगारांत मानव विकासच्या या बसेस नाहीत. -    वर्धा जिल्ह्यात रापमच्या वतीने विद्यार्थ्यांची बाजू लक्षात घेता, काही बसेस सोडल्या जातात. असे असले तरी जिल्ह्यातील विविध शाळांनाही सुटी लागल्याने या बसफेऱ्या बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांची गैरसोय

पाच महिन्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला. त्यामुळे सर्व ठिकाणी बसेस धावत आहेत. मात्र, अनेक गावात बसेस जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. ग्रामीण भागासाठीही बसेस सोडण्यात याव्यात.- मनीष उभाड, ग्रामस्थ, लाडेगाव.

सुरुवातीला कोविड, तर नंतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बस गावात येत नव्हती. त्यामुळे खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. खासगी प्रवासी वाहतूक करणारे जास्तच प्रवासी भाडे घेतात. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन ग्रामीण भागातही बसेस सोडल्या पाहिजेत.- गौरव ठाकरे, ग्रामस्थ, हिवरा.

आर्वी आगारात ४३  बसेस असून, पूर्ण शेडुल्ड व फेऱ्या  सुरू आहे. १६ हजार कि.मी. या बसेस धावतात. विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी असल्याने त्या फेऱ्या गर्दीच्या ठिकाणी दुसरीकडे वळविण्यात आल्या आहेत. लग्नसराईचे दिवस असल्याने उत्पन्नातही भर पडली आहे. सध्या सव्वा सहा लाखांचे दररोजचे उत्पन्न आहे.- जयकुमार इंगोले, आगार व्यवस्थापक.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप