शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

वडगावचे पुनर्वसन कधी होणार

By admin | Updated: October 22, 2014 23:22 IST

प्रकल्प निर्मितीला ३४ वर्षाचा काळ लोटला. मात्र अद्याप या धरणाच्या बॅक वॉटरचा फटका वडगाववासीयांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे

गिरड : प्रकल्प निर्मितीला ३४ वर्षाचा काळ लोटला. मात्र अद्याप या धरणाच्या बॅक वॉटरचा फटका वडगाववासीयांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे नुकसान होते. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकतो. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच आहे. त्यामुळे पुनर्वसन कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. १९८० मध्ये पोथरा प्रकल्पाची निर्मिती झाली. या धरणाकरिता शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. पावसाळ्यात धरणाचे पाणी शिरुन गावाचा संपर्क तुटतो. गावाबाहेर जाणारे सर्व मार्ग बंद होतात. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरले. कित्येक दिवस गावकरी यातना सहन करीत होते. गावाचे पुनर्वसन करण्याकरिता गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन दिले. परंतु याकडे कानाडोळा केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा यांना पत्र देऊन पुनर्वसन करण्याबाबतचा अहवाल सादर करण्यास कळविले. त्यानंतर त्याबाबत पाहणीसुद्धा झाली. पोथरा धरणाची पूर्ण पातळी २२९९.४०० मीटर तर महत्तम जलपातळी २३१.२३० मीटर व धरणमाथा पातळी २.३३.०३० मीटर आहे. तेव्हा धरणमाथा पातळी २३३.०३० तलंकापर्यंत येत असल्यामुळे वडगाव गावात बॅक वॉटर पूर्णपणे होते, असा निष्कर्ष काढण्यात आला. गावात येणारे संपूर्ण मार्ग बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, असे शासनालासुद्धा कळविण्यात आले होते. अहवाल पाठविताना पोथरा प्रकल्प हा गावापासून ५०० मीटर अंतरावर असून लोकसंख्या ५६१ असून १३६ कुटुंबसंख्या आहे. पुनर्वसनाकरिता १२.६५ आर.क्षेत्राची गरज असल्याचेही नोंदविण्यात आले. ग्रा.प.द्वारे ठराव घेऊन पुनर्वसनासाठी आवश्यक शेतजमिनीचे सर्व्हे क्रमांक कळविण्यात आले. अनेक शेतकरी पुनर्वसनाकरिता शेतजमीन देण्यास तयार असल्याचे सुद्धा कळविण्यात आले. मात्र अद्याप शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)