शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वडगावचे पुनर्वसन कधी होणार

By admin | Updated: October 22, 2014 23:22 IST

प्रकल्प निर्मितीला ३४ वर्षाचा काळ लोटला. मात्र अद्याप या धरणाच्या बॅक वॉटरचा फटका वडगाववासीयांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे

गिरड : प्रकल्प निर्मितीला ३४ वर्षाचा काळ लोटला. मात्र अद्याप या धरणाच्या बॅक वॉटरचा फटका वडगाववासीयांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात धरणाचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरुन मोठे नुकसान होते. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकतो. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबितच आहे. त्यामुळे पुनर्वसन कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. १९८० मध्ये पोथरा प्रकल्पाची निर्मिती झाली. या धरणाकरिता शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. पावसाळ्यात धरणाचे पाणी शिरुन गावाचा संपर्क तुटतो. गावाबाहेर जाणारे सर्व मार्ग बंद होतात. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरले. कित्येक दिवस गावकरी यातना सहन करीत होते. गावाचे पुनर्वसन करण्याकरिता गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन दिले. परंतु याकडे कानाडोळा केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, वर्धा यांना पत्र देऊन पुनर्वसन करण्याबाबतचा अहवाल सादर करण्यास कळविले. त्यानंतर त्याबाबत पाहणीसुद्धा झाली. पोथरा धरणाची पूर्ण पातळी २२९९.४०० मीटर तर महत्तम जलपातळी २३१.२३० मीटर व धरणमाथा पातळी २.३३.०३० मीटर आहे. तेव्हा धरणमाथा पातळी २३३.०३० तलंकापर्यंत येत असल्यामुळे वडगाव गावात बॅक वॉटर पूर्णपणे होते, असा निष्कर्ष काढण्यात आला. गावात येणारे संपूर्ण मार्ग बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करावे, असे शासनालासुद्धा कळविण्यात आले होते. अहवाल पाठविताना पोथरा प्रकल्प हा गावापासून ५०० मीटर अंतरावर असून लोकसंख्या ५६१ असून १३६ कुटुंबसंख्या आहे. पुनर्वसनाकरिता १२.६५ आर.क्षेत्राची गरज असल्याचेही नोंदविण्यात आले. ग्रा.प.द्वारे ठराव घेऊन पुनर्वसनासाठी आवश्यक शेतजमिनीचे सर्व्हे क्रमांक कळविण्यात आले. अनेक शेतकरी पुनर्वसनाकरिता शेतजमीन देण्यास तयार असल्याचे सुद्धा कळविण्यात आले. मात्र अद्याप शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)