शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

उत्पादन खर्चावर आधारित भाव कधी मिळणार?

By admin | Updated: November 2, 2015 01:42 IST

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती या संकटांना तोंड देत बळीराजा पूरता खचला आहे.

शेतकऱ्यांचा सवाल : यंदाही होणार व्यापाऱ्यांकडून लूटरोहणा : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती या संकटांना तोंड देत बळीराजा पूरता खचला आहे. शेतकऱ्यांना तारण्यासाठी उत्पन्नावर आधारित भाव देणे गरजेचे आहे़ यंदाही कापसाच्या हमीभावावर केवळ ५० रुपये वाढ देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. शासन शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के लाभाचे भाव कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस्तव आजपर्यंत शासनाने कोट्यवधींचे पॅकेज दिले़ गत कित्येक वर्षांपासून अनेक पॅकेज खर्ची पडले; पण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत फरक पडला नाही. पॅकेजचा फायदा गरजुंना कमी अन् अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिक होतो, हे सर्वश्रूत आहे़ सर्व्हे करणारी यंत्रणा अनेकांची नावे सोडून देतात तर जवळच्या व्यक्तींना फायदा देण्याच्या उद्देशाने अधिक जमीन दाखविणे, जमीन नसलेल्यांच्या नावे जमीन दाखविणे आदी प्रकार करून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवतात. यापूर्वी असे प्रकार पॅकेजचा लाभ वितरित करताना घडले आहेत़ संत्रा बाग असलेल्या शेतकऱ्यांची झाडे सर्व्हे करणाऱ्या यंत्रणेला दिसत नाही; पण ज्यांनी कधी संत्राच लावला नाही, अशांची नावे यादीत टाकली जातात. या सर्व बाबींचा विचार करता शेतमालाला रास्त भाव दिल्याशिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊ शकत नाही. सध्या कापसाचे हमीभाव ४०५० रुपये आहेत. या भावात शेतकऱ्यांना कापूस विकणे परवडणारे नाही. शिवाय शासकीय खरेदी केंद्रही सुरू झालेले नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागणार आहे. परिणामी, यंदाही शेतकरी नागविला जाण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)