शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन खर्चावर आधारित भाव कधी मिळणार?

By admin | Updated: November 2, 2015 01:42 IST

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती या संकटांना तोंड देत बळीराजा पूरता खचला आहे.

शेतकऱ्यांचा सवाल : यंदाही होणार व्यापाऱ्यांकडून लूटरोहणा : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती या संकटांना तोंड देत बळीराजा पूरता खचला आहे. शेतकऱ्यांना तारण्यासाठी उत्पन्नावर आधारित भाव देणे गरजेचे आहे़ यंदाही कापसाच्या हमीभावावर केवळ ५० रुपये वाढ देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. शासन शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के लाभाचे भाव कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस्तव आजपर्यंत शासनाने कोट्यवधींचे पॅकेज दिले़ गत कित्येक वर्षांपासून अनेक पॅकेज खर्ची पडले; पण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत फरक पडला नाही. पॅकेजचा फायदा गरजुंना कमी अन् अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिक होतो, हे सर्वश्रूत आहे़ सर्व्हे करणारी यंत्रणा अनेकांची नावे सोडून देतात तर जवळच्या व्यक्तींना फायदा देण्याच्या उद्देशाने अधिक जमीन दाखविणे, जमीन नसलेल्यांच्या नावे जमीन दाखविणे आदी प्रकार करून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवतात. यापूर्वी असे प्रकार पॅकेजचा लाभ वितरित करताना घडले आहेत़ संत्रा बाग असलेल्या शेतकऱ्यांची झाडे सर्व्हे करणाऱ्या यंत्रणेला दिसत नाही; पण ज्यांनी कधी संत्राच लावला नाही, अशांची नावे यादीत टाकली जातात. या सर्व बाबींचा विचार करता शेतमालाला रास्त भाव दिल्याशिवाय शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊ शकत नाही. सध्या कापसाचे हमीभाव ४०५० रुपये आहेत. या भावात शेतकऱ्यांना कापूस विकणे परवडणारे नाही. शिवाय शासकीय खरेदी केंद्रही सुरू झालेले नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागणार आहे. परिणामी, यंदाही शेतकरी नागविला जाण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)