शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला पाणी मिळणार तरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:52 IST

निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. तसेच पाटचऱ्या झुडपानी माखल्या आहेत. पाटचºयांची साफसफाई करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देपाटचरींना झुडपांचा विळखा : पाण्याकरिता आॅईल इंजिनची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. तसेच पाटचऱ्या झुडपानी माखल्या आहेत. पाटचºयांची साफसफाई करण्यात आलेली नाही.विशेष म्हणजे ज्यांच्या शेताजवळून कालवा गेला आहेत. त्यांनाच पाण्याकरिता आटापीटा करावा लागत असल्याचे वास्तव आहेत. चिकणी शिवारात नितीन अतकरे यांच्या शेतातून मोठा कॅनल गेला आहेत व याच कॅनलच्या पाटचºया गजानन राऊत, संजय अतकरे, नितीन भोयर, बळवंत डायरे, प्रदीप भोयर, सुभाष कन्नाके, सोनबा डायरे, गुलाब डायरे, महादेव डायरे यांच्या शेताजवळून गेल्या आहेत. परंतु सदर कॅनलचे पाणी यांच्या शेतापर्यंत पोहचतच नाही. सदर शेतकरी पाण्याकरिता जिवाचा आटापीटा करीत आहेत. तसेच आॅईल इंजिनने पाणी देणे खर्चाला न परवडणारे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. आमचे शेत वरच्या भागाला असल्यामुळे पाणी येत नाही. परंतु पाटचºया खोल केल्यात तरा आम्हाला पण पाणी मिळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या परंतु शासनाच्या पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती सिंचन अडचणीत आले आहे. यांचा परिणाम उत्पादनावर होत आहे.लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सर्वच प्रकल्पाची व्यथा सारखीचवर्धा जिल्ह्यात बोर हा सर्वात जुना प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाटसºया या झाडे व झुडपांनी वेढलेल्या आहेत.त्यामुळे शेती सिंचनास अडचण निर्माण झाली आहे. अशीच परिस्थती ही आष्टी तालुक्यातील पाटसऱ्यांची आहे. निम्म वर्धा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणी हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे. पाटबंधारे विभागाने समस्या सोडवावी.वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमची समस्या सांगीतली व ते म्हणाले दुसऱ्या पाण्यापर्यंत तुमची समस्या मार्गी लागेल व तुम्हाला पाणी मिळेल परंतु अद्यापही समस्या कायम आहेत. त्वरीत पाटचऱ्या खोल कराव्यात व आम्हाला पाणी द्यावेत अशी आमची मागणी आहेत.- जगदीश डायरे, शेतकरी चिकणी.