शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

आष्टीच्या शहीदभूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका महत्त्वपूर्ण इतिहास असूनही या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटन म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धुळखात आहे.

ठळक मुद्देहुतात्मा स्मारक समितीची धडपड : नागपंचमीलाच झाली होती रक्तरंजित क्रांती, नेत्यांनाही पडला आश्वासनाचा विसर

आकाश सव्वालाखे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात नागपंचमीच्या दिवशी आष्टीला रक्तरंजित क्रांती झाली होती. यामध्ये काहींनी हुताम्य पत्कारले तर काहींना जन्मठेप झाली होती. मात्र, या क्रांतीला ७८ वर्षाचा कार्यकाळ लोटला तरीही या शहीद भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी मिळेल, असा प्रश्न हुतात्मा स्मारक समितीने, क्रांतीदिनाच्या निमित्ताने उपस्थित केला आहे.आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका महत्त्वपूर्ण इतिहास असूनही या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटन म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धुळखात आहे. क्रांतीस्थळ तेव्हाचे पोलीस स्टेशन तर आताचे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय म्हणून आळखले जाते. स्वातंत्र्यलढ्याचे स्थळ सुरक्षित रहावे म्हणून १९५८ साली येथे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. हुतात्मा स्मारक समितीच्या पुढाकारातून या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू लागले. गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय झालेल्या स्मारक समितीच्यावतीने या ऐतिहासिक स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी लाऊन धरली. आष्टीला पंतप्रधान ते मुख्यमंत्रीपर्यंतच्या मंत्र्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे आश्वासनही दिलेत पण, आज ७८ वर्षानंतरही ही क्रांतीभूमी त्यापासून वंचितच आहे....तर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेलयेथील स्वातंत्र्यलढ्यावरील लघुचित्रपट तयार करण्यात आला. त्याचे शाळा, महाविद्यालय, विधानसभा, विधान परिषद येथे सादरीकरण करण्यात आले. तसेच पंतप्रधानांपासून तर राष्ट्रपतींपर्यंत पोहोचून अरविंद मालपे व भरत वणझारा यांनी राष्ट्रीय स्मारकाची मागणी लावून धरली. पण, अद्याप यश प्राप्त झाले नाही. या स्वातंत्र्यलढ्याला तात्काळ राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिल्यास खºया अर्थाने शहिदांना श्रद्धांजली दिल्याचे सार्थक होईल, असे हुतात्मा स्मारक समितीकडून बोलेले जात आहे.येथे २६५ दिग्गज झालेत नतमस्तकदरवर्षी शहीद स्मृतिदिनी (नागपंचमी) शहीदांना श्रद्धांजली अपर्ण केली जाते. या कार्यक्रमाला देशातील दिग्गज मंडळी आष्टीत येतात. आतापर्यंत तब्बल २६५ दिग्गज लोकांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्यासह असंख्य केंद्रीयमंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार, कवी, लेखक आणि प्रतिष्ठित नागरिकांचाही समावेश आहेत.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमी