शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीच्या शहीदभूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका महत्त्वपूर्ण इतिहास असूनही या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटन म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धुळखात आहे.

ठळक मुद्देहुतात्मा स्मारक समितीची धडपड : नागपंचमीलाच झाली होती रक्तरंजित क्रांती, नेत्यांनाही पडला आश्वासनाचा विसर

आकाश सव्वालाखे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात नागपंचमीच्या दिवशी आष्टीला रक्तरंजित क्रांती झाली होती. यामध्ये काहींनी हुताम्य पत्कारले तर काहींना जन्मठेप झाली होती. मात्र, या क्रांतीला ७८ वर्षाचा कार्यकाळ लोटला तरीही या शहीद भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी मिळेल, असा प्रश्न हुतात्मा स्मारक समितीने, क्रांतीदिनाच्या निमित्ताने उपस्थित केला आहे.आष्टीमध्ये नागपंचमीच्या दिवशी झालेल्या क्रांती लढ्यात सहा जणांनी बलिदान दिले. ६५ लोकांना जन्मठेप तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कालांतराने त्यांची शिक्षा माफही झाली. उकंडराव सोनवणे यांची अपील लंडनच्या मिली कॉन्सिलमध्ये चालली. इतका महत्त्वपूर्ण इतिहास असूनही या स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पर्यटन म्हणून शासनाने त्याचा विकास करावा, ही मागणी शासनदरबारी धुळखात आहे. क्रांतीस्थळ तेव्हाचे पोलीस स्टेशन तर आताचे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय म्हणून आळखले जाते. स्वातंत्र्यलढ्याचे स्थळ सुरक्षित रहावे म्हणून १९५८ साली येथे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. हुतात्मा स्मारक समितीच्या पुढाकारातून या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू लागले. गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय झालेल्या स्मारक समितीच्यावतीने या ऐतिहासिक स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी लाऊन धरली. आष्टीला पंतप्रधान ते मुख्यमंत्रीपर्यंतच्या मंत्र्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे आश्वासनही दिलेत पण, आज ७८ वर्षानंतरही ही क्रांतीभूमी त्यापासून वंचितच आहे....तर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेलयेथील स्वातंत्र्यलढ्यावरील लघुचित्रपट तयार करण्यात आला. त्याचे शाळा, महाविद्यालय, विधानसभा, विधान परिषद येथे सादरीकरण करण्यात आले. तसेच पंतप्रधानांपासून तर राष्ट्रपतींपर्यंत पोहोचून अरविंद मालपे व भरत वणझारा यांनी राष्ट्रीय स्मारकाची मागणी लावून धरली. पण, अद्याप यश प्राप्त झाले नाही. या स्वातंत्र्यलढ्याला तात्काळ राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिल्यास खºया अर्थाने शहिदांना श्रद्धांजली दिल्याचे सार्थक होईल, असे हुतात्मा स्मारक समितीकडून बोलेले जात आहे.येथे २६५ दिग्गज झालेत नतमस्तकदरवर्षी शहीद स्मृतिदिनी (नागपंचमी) शहीदांना श्रद्धांजली अपर्ण केली जाते. या कार्यक्रमाला देशातील दिग्गज मंडळी आष्टीत येतात. आतापर्यंत तब्बल २६५ दिग्गज लोकांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्यासह असंख्य केंद्रीयमंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार, कवी, लेखक आणि प्रतिष्ठित नागरिकांचाही समावेश आहेत.

टॅग्स :Nag Panchamiनागपंचमी