शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

आगीत गहू पीक खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:10 IST

अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.

ठळक मुद्दे५० हजारांचे नुकसान : गोंदापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, मौजा मदणी (दिंदोडा) येथील शेतकरी विलास टेंभरे याचे गोंदापूर शिवारात शेत आहे. त्यांनी यंदा रबी हंगामात गव्हाची लागवड केली होती. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. केवळ कापणी करून मळणी करणे शिल्लक असताना शेतात अचानक आग लागली. या आगीत शेतातील संपूर्ण गहू पीक जळून कोळसा झाले. यामुळे शेतकरी टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. तक्रारीवरून या घटनेची सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून त्याच अशा पद्धतीने आर्थिक नुकसान झाल्याने सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.जंगलाला लागलेल्या आगीवर नियंत्रणविरूळ (आकाजी.) : मौजा परसोडी, एकबुर्जी व पाचोड जंगल शिवारात लागलेली आग झपाट्याने गावाच्या दिशेने सरकत होती. सदर घटनेची माहिती मिळताच दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करून वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.जंगल शिवारात आग लागल्याचे लक्षात येताच वनरक्षक सोनटक्के यांनी परसोडी येथील पोलीस पाटील नयन लांडगे, टेंभरीचे पोलीस पाटील सतीश खंडारे यांना माहिती देत पोलिसांना माहिती दिली. शिवाय आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाढते तापमान आणि वारा असल्याने त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. बघता-बघता ही आग एकगुर्जी गावाच्या दिशेने सरकली. दरम्यान, वनविभागाच्या रोहना बीटप्रमुखांना तसेच कोतवाल कासार यांना आणि आर्वीच्या तहसीलदारांना माहिती देण्यात आली. त्यांची लगेच ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांची सूचना मिळताच पुलगाव न.प.प्रशासन व पुलगावच्या दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा केला. काही तासांच्या प्रयत्नाअंती सदर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.