शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आगीत गहू पीक खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:10 IST

अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.

ठळक मुद्दे५० हजारांचे नुकसान : गोंदापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, मौजा मदणी (दिंदोडा) येथील शेतकरी विलास टेंभरे याचे गोंदापूर शिवारात शेत आहे. त्यांनी यंदा रबी हंगामात गव्हाची लागवड केली होती. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. केवळ कापणी करून मळणी करणे शिल्लक असताना शेतात अचानक आग लागली. या आगीत शेतातील संपूर्ण गहू पीक जळून कोळसा झाले. यामुळे शेतकरी टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. तक्रारीवरून या घटनेची सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून त्याच अशा पद्धतीने आर्थिक नुकसान झाल्याने सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.जंगलाला लागलेल्या आगीवर नियंत्रणविरूळ (आकाजी.) : मौजा परसोडी, एकबुर्जी व पाचोड जंगल शिवारात लागलेली आग झपाट्याने गावाच्या दिशेने सरकत होती. सदर घटनेची माहिती मिळताच दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करून वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.जंगल शिवारात आग लागल्याचे लक्षात येताच वनरक्षक सोनटक्के यांनी परसोडी येथील पोलीस पाटील नयन लांडगे, टेंभरीचे पोलीस पाटील सतीश खंडारे यांना माहिती देत पोलिसांना माहिती दिली. शिवाय आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाढते तापमान आणि वारा असल्याने त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. बघता-बघता ही आग एकगुर्जी गावाच्या दिशेने सरकली. दरम्यान, वनविभागाच्या रोहना बीटप्रमुखांना तसेच कोतवाल कासार यांना आणि आर्वीच्या तहसीलदारांना माहिती देण्यात आली. त्यांची लगेच ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांची सूचना मिळताच पुलगाव न.प.प्रशासन व पुलगावच्या दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा केला. काही तासांच्या प्रयत्नाअंती सदर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.