शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

आगीत गहू पीक खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:10 IST

अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.

ठळक मुद्दे५० हजारांचे नुकसान : गोंदापूर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अचानक लागलेल्या आगीत शेतातील गहू पीक जळून खाक झाले. ही घटना गोंदापूर शिवारात घडली असून यामुळे शेतकरी विलास टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.प्राप्त माहितीनुसार, मौजा मदणी (दिंदोडा) येथील शेतकरी विलास टेंभरे याचे गोंदापूर शिवारात शेत आहे. त्यांनी यंदा रबी हंगामात गव्हाची लागवड केली होती. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. केवळ कापणी करून मळणी करणे शिल्लक असताना शेतात अचानक आग लागली. या आगीत शेतातील संपूर्ण गहू पीक जळून कोळसा झाले. यामुळे शेतकरी टेंभरे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. तक्रारीवरून या घटनेची सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असून त्याच अशा पद्धतीने आर्थिक नुकसान झाल्याने सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.जंगलाला लागलेल्या आगीवर नियंत्रणविरूळ (आकाजी.) : मौजा परसोडी, एकबुर्जी व पाचोड जंगल शिवारात लागलेली आग झपाट्याने गावाच्या दिशेने सरकत होती. सदर घटनेची माहिती मिळताच दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करून वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.जंगल शिवारात आग लागल्याचे लक्षात येताच वनरक्षक सोनटक्के यांनी परसोडी येथील पोलीस पाटील नयन लांडगे, टेंभरीचे पोलीस पाटील सतीश खंडारे यांना माहिती देत पोलिसांना माहिती दिली. शिवाय आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाढते तापमान आणि वारा असल्याने त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळाले नाही. बघता-बघता ही आग एकगुर्जी गावाच्या दिशेने सरकली. दरम्यान, वनविभागाच्या रोहना बीटप्रमुखांना तसेच कोतवाल कासार यांना आणि आर्वीच्या तहसीलदारांना माहिती देण्यात आली. त्यांची लगेच ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांची सूचना मिळताच पुलगाव न.प.प्रशासन व पुलगावच्या दारूगोळा भांडाराच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा केला. काही तासांच्या प्रयत्नाअंती सदर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.