शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल, पालेभाज्यांच्या भाववाढीवर ओरड का?

By admin | Updated: February 26, 2016 02:42 IST

शेतमाल, पालेभाज्यांचे भाव थोडे वाढले की, समाजातील गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांकडून ओरड केली जाते; पण भाव पडल्यावर कुणी बोलत नाही.

रोहणा : शेतमाल, पालेभाज्यांचे भाव थोडे वाढले की, समाजातील गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांकडून ओरड केली जाते; पण भाव पडल्यावर कुणी बोलत नाही. मग, ते भाव शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी त्याविरूद्ध आवाज उठविला जात नाही. शिवाय अन्य वस्तूंच्या महागाईवर सर्व गप्प असतात. यामुळे शेतमाल, पालेभाज्यांच्या दरवाढीवरच ओरड का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतमाल व पालेभाज्या तथा डाळींचे भाव थोडे वाढले तरी नोकरदार, व्यावसायिक व उद्योगपती भाववाढी विरूद्ध आवाज उठवितात. शासन यावर आयातीचा उपाय करून शेतमालाचे भाव पाडतात. परिणामी, शेतकऱ्यांच्या खिशात येणारे अधिकचे दोन पैसे त्वरित थांबतात. उलट भाव पडतात तेव्हा कुणीही ओरडत नाही. सद्यस्थितीत कांद्याला अजिबात भाव नाही. वांगे, टमाटर ठोकमध्ये पाच रुपये किलो मिळतात. फुलकोबी व पानकोबी किलोऐवजी पाच रुपये नगाने मिळते. पाच रुपयांत जुडीभर सांभार मिळतो. तायवान पपईला ग्राहक मिळनासे झाले आहे. आंबिया बहराचा संत्रा व्यापाऱ्यांअभावी गळून झाडाखालीच सडला. मृग बहराच्या संत्र्याला भाव आहे तर झाडावर संत्रीच लागली नाही. आज भाजीपाला बाजारात आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. कापसाचे भाव ४८०० वरून ४४०० पर्यंत खाली आले. दहा हजार रुपये भावाच्या तुरी सात हजारापर्र्यंत खाली आल्या. सोयाबीन ३५०० च्या वर जात नाही. गव्हाचे भाव उत्पादन खर्चाला परवडणारे नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी कुणीही ओरडताना दिसत नाही. शासन, प्रशासन, विरोधी पक्ष सारेच गप्प आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी हताश झाला असून धोरणात्मक उपाय गरजेचे झाले आहेत.(वार्ताहर)