शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल, पालेभाज्यांच्या भाववाढीवर ओरड का?

By admin | Updated: February 26, 2016 02:42 IST

शेतमाल, पालेभाज्यांचे भाव थोडे वाढले की, समाजातील गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांकडून ओरड केली जाते; पण भाव पडल्यावर कुणी बोलत नाही.

रोहणा : शेतमाल, पालेभाज्यांचे भाव थोडे वाढले की, समाजातील गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांकडून ओरड केली जाते; पण भाव पडल्यावर कुणी बोलत नाही. मग, ते भाव शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी त्याविरूद्ध आवाज उठविला जात नाही. शिवाय अन्य वस्तूंच्या महागाईवर सर्व गप्प असतात. यामुळे शेतमाल, पालेभाज्यांच्या दरवाढीवरच ओरड का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतमाल व पालेभाज्या तथा डाळींचे भाव थोडे वाढले तरी नोकरदार, व्यावसायिक व उद्योगपती भाववाढी विरूद्ध आवाज उठवितात. शासन यावर आयातीचा उपाय करून शेतमालाचे भाव पाडतात. परिणामी, शेतकऱ्यांच्या खिशात येणारे अधिकचे दोन पैसे त्वरित थांबतात. उलट भाव पडतात तेव्हा कुणीही ओरडत नाही. सद्यस्थितीत कांद्याला अजिबात भाव नाही. वांगे, टमाटर ठोकमध्ये पाच रुपये किलो मिळतात. फुलकोबी व पानकोबी किलोऐवजी पाच रुपये नगाने मिळते. पाच रुपयांत जुडीभर सांभार मिळतो. तायवान पपईला ग्राहक मिळनासे झाले आहे. आंबिया बहराचा संत्रा व्यापाऱ्यांअभावी गळून झाडाखालीच सडला. मृग बहराच्या संत्र्याला भाव आहे तर झाडावर संत्रीच लागली नाही. आज भाजीपाला बाजारात आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. कापसाचे भाव ४८०० वरून ४४०० पर्यंत खाली आले. दहा हजार रुपये भावाच्या तुरी सात हजारापर्र्यंत खाली आल्या. सोयाबीन ३५०० च्या वर जात नाही. गव्हाचे भाव उत्पादन खर्चाला परवडणारे नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी कुणीही ओरडताना दिसत नाही. शासन, प्रशासन, विरोधी पक्ष सारेच गप्प आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी हताश झाला असून धोरणात्मक उपाय गरजेचे झाले आहेत.(वार्ताहर)