शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

शेतमाल, पालेभाज्यांच्या भाववाढीवर ओरड का?

By admin | Updated: February 26, 2016 02:42 IST

शेतमाल, पालेभाज्यांचे भाव थोडे वाढले की, समाजातील गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांकडून ओरड केली जाते; पण भाव पडल्यावर कुणी बोलत नाही.

रोहणा : शेतमाल, पालेभाज्यांचे भाव थोडे वाढले की, समाजातील गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांकडून ओरड केली जाते; पण भाव पडल्यावर कुणी बोलत नाही. मग, ते भाव शेतकऱ्यांना परवडणारे नसले तरी त्याविरूद्ध आवाज उठविला जात नाही. शिवाय अन्य वस्तूंच्या महागाईवर सर्व गप्प असतात. यामुळे शेतमाल, पालेभाज्यांच्या दरवाढीवरच ओरड का, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.शेतमाल व पालेभाज्या तथा डाळींचे भाव थोडे वाढले तरी नोकरदार, व्यावसायिक व उद्योगपती भाववाढी विरूद्ध आवाज उठवितात. शासन यावर आयातीचा उपाय करून शेतमालाचे भाव पाडतात. परिणामी, शेतकऱ्यांच्या खिशात येणारे अधिकचे दोन पैसे त्वरित थांबतात. उलट भाव पडतात तेव्हा कुणीही ओरडत नाही. सद्यस्थितीत कांद्याला अजिबात भाव नाही. वांगे, टमाटर ठोकमध्ये पाच रुपये किलो मिळतात. फुलकोबी व पानकोबी किलोऐवजी पाच रुपये नगाने मिळते. पाच रुपयांत जुडीभर सांभार मिळतो. तायवान पपईला ग्राहक मिळनासे झाले आहे. आंबिया बहराचा संत्रा व्यापाऱ्यांअभावी गळून झाडाखालीच सडला. मृग बहराच्या संत्र्याला भाव आहे तर झाडावर संत्रीच लागली नाही. आज भाजीपाला बाजारात आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. कापसाचे भाव ४८०० वरून ४४०० पर्यंत खाली आले. दहा हजार रुपये भावाच्या तुरी सात हजारापर्र्यंत खाली आल्या. सोयाबीन ३५०० च्या वर जात नाही. गव्हाचे भाव उत्पादन खर्चाला परवडणारे नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी कुणीही ओरडताना दिसत नाही. शासन, प्रशासन, विरोधी पक्ष सारेच गप्प आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी हताश झाला असून धोरणात्मक उपाय गरजेचे झाले आहेत.(वार्ताहर)