शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

जिल्हा संघाच्या दूध संकलनाला शासनाचे निकष का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:58 IST

जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे.

ठळक मुद्देसुनील राऊत यांचा सवाल : दूध उत्पादकांचे सर्वच दूध स्वीकारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने खासगी दूध संकलन करणाºयांचेही दूध तपासावे, अशी मागणी वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष सुनिल राऊत यांनी केली आहे.वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघाला दूध संकलनासाठी ११ हजार लिटर दूधाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. पूर्वी ८ हजार लिटर मर्यादा होती. ती २ हजार लिटरने वाढवून देण्यात आली. जिल्ह्याच्या १२ मार्गावरून दूधसंघ हे दूध संकलीत करीत असते. अनेकवेळा दूध उत्पादक अतिरिक्त दूधही जिल्हा दूध संघाला देतात. या दूधाचे संकलन करताना वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहे. त्याचे परिक्षण केल्यावरच दूधाची गुणवत्ता ठरविली जाते. मात्र हे निकष खासगी दूध संकलीत करणाºया कोणत्याही कंपनीला लागू करण्यात आलेली नाही. ते कमी, जास्त प्रतिचे सर्वच दूध संकलीत करतात. अनेकदा शेतकºयांना ज्यादा भावाचे आमीष दाखविले जाते. आमच्या दूध संघाने खरेदी केलेले दूध गुणवत्तेत नाही म्हणून परत पाठविल्याच्याही घटना घडल्या आहे. वर्धा जिल्ह्यात दूधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्यशासनाने सर्वच दूध खरेदी करण्याची मुभा जिल्हा दूध संघाला द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शासनाकडे बैठक लावून हा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले, अशी माहितीही राऊत यांनी दिली आहे.

टॅग्स :Governmentसरकारmilkदूध