शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर ते कन्याकुमारी किसान यात्रेचे हिंगणघाट येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण झाले. किसान यात्रा रात्री ८ वाजता नंदोरी चौक हिंगणघाट येथे पोहचली. विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ...

ठळक मुद्देदेशभरातील नेते सहभागी : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर केली सडकून टीका

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण झाले. किसान यात्रा रात्री ८ वाजता नंदोरी चौक हिंगणघाट येथे पोहचली. विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे ढोल ताशासहीत स्वागत केले.या स्वागताला विराचे पूर्व विदर्भ प्रमुख अनिल जवादे, गिरीधर राठी, प्रदीप नागपूरकर, राजेंद्र पाटील, शेतकरी नेते दिनेश वाघ, महेश माकडे, भारत पाटील, जयंत धोटे, बंटी रघाटाटे, अजय मुळे, रोहीत राऊत, गौरव खिराळे, गोकुल पाटील व विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत सहभागी शेतकरी नेत्यांची भाषणे झाली.शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. सर्व शेतमालाला आधारभूत किंमत एमएसपी सी २ अधिक ५० जाहीर झाली पाहिजे. डॉ. स्वामीनाथ आयोग लागू झाला पाहिजे तो पर्यंत हा लढा सुरु राहील, असे आवाहन सभेतील सहभागी शेतकरी नेत्यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला केले. या किसान अधिकार यात्रेत अभिमन्यु कोहर यांनी आतापर्यंतच्या एकाही सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही. सर्वच सरकारने शेतकºयांची फसवणूक केली. गुरूनामसिंह चंदूरी (हरियाना) यांनी शेतकऱ्यांनी आपला लढा तीव्र करावा. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, असे सांगितले. जगजीत सिंह (पंजाब) यांनी विदर्भात झालेल्या शेतकºयांच्या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या त्या हत्या आहे, कारण आत्महत्या या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेल्या आहे असे सांगितले. हामीद मलीक (काश्मिर कुपवाडा), सुरेश खोथ (हरियाना), तामीळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगढ अशा अनेक राज्यांचे शेतकरी नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या सभेचे प्रास्ताविक विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष तथा पूर्व विदर्भ प्रमुख अनिल जवादे यांनी केले. शेतकºयांच्या आत्महत्या नंतर स्वामीनाथन आयोग गठीत करण्यात आला असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन गोपाल मांडवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव पडवे यांनी केले. या सभेला मंचावर गिरीधर राठी, प्राचार्य आर. के. पाटील, माजी प्राचार्य भारत पाटील, उपप्राचार्य गुडधे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवतळे, उपमुख्याध्यापक राऊत, पर्यवेक्षक वाघ, पडवे, बन्सोड, राजु चंदनखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेला हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.