शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

काश्मीर ते कन्याकुमारी किसान यात्रेचे हिंगणघाट येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण झाले. किसान यात्रा रात्री ८ वाजता नंदोरी चौक हिंगणघाट येथे पोहचली. विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ...

ठळक मुद्देदेशभरातील नेते सहभागी : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर केली सडकून टीका

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण झाले. किसान यात्रा रात्री ८ वाजता नंदोरी चौक हिंगणघाट येथे पोहचली. विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे ढोल ताशासहीत स्वागत केले.या स्वागताला विराचे पूर्व विदर्भ प्रमुख अनिल जवादे, गिरीधर राठी, प्रदीप नागपूरकर, राजेंद्र पाटील, शेतकरी नेते दिनेश वाघ, महेश माकडे, भारत पाटील, जयंत धोटे, बंटी रघाटाटे, अजय मुळे, रोहीत राऊत, गौरव खिराळे, गोकुल पाटील व विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत सहभागी शेतकरी नेत्यांची भाषणे झाली.शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. सर्व शेतमालाला आधारभूत किंमत एमएसपी सी २ अधिक ५० जाहीर झाली पाहिजे. डॉ. स्वामीनाथ आयोग लागू झाला पाहिजे तो पर्यंत हा लढा सुरु राहील, असे आवाहन सभेतील सहभागी शेतकरी नेत्यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला केले. या किसान अधिकार यात्रेत अभिमन्यु कोहर यांनी आतापर्यंतच्या एकाही सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही. सर्वच सरकारने शेतकºयांची फसवणूक केली. गुरूनामसिंह चंदूरी (हरियाना) यांनी शेतकऱ्यांनी आपला लढा तीव्र करावा. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, असे सांगितले. जगजीत सिंह (पंजाब) यांनी विदर्भात झालेल्या शेतकºयांच्या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या त्या हत्या आहे, कारण आत्महत्या या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेल्या आहे असे सांगितले. हामीद मलीक (काश्मिर कुपवाडा), सुरेश खोथ (हरियाना), तामीळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगढ अशा अनेक राज्यांचे शेतकरी नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या सभेचे प्रास्ताविक विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष तथा पूर्व विदर्भ प्रमुख अनिल जवादे यांनी केले. शेतकºयांच्या आत्महत्या नंतर स्वामीनाथन आयोग गठीत करण्यात आला असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन गोपाल मांडवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव पडवे यांनी केले. या सभेला मंचावर गिरीधर राठी, प्राचार्य आर. के. पाटील, माजी प्राचार्य भारत पाटील, उपप्राचार्य गुडधे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवतळे, उपमुख्याध्यापक राऊत, पर्यवेक्षक वाघ, पडवे, बन्सोड, राजु चंदनखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेला हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.