शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

भारनियमनाने शेतकरी वैतागले

By admin | Updated: July 2, 2014 23:24 IST

तालुक्यातील काही भागात अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांना वैतागून सोडले आहे. पाऊस येईल या आशेवर लावलेल्या बियाण्याचे अंकुर उगविण्याआधीच करपले आहे. ओलिताची सोय आहे;

सेलू : तालुक्यातील काही भागात अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांना वैतागून सोडले आहे. पाऊस येईल या आशेवर लावलेल्या बियाण्याचे अंकुर उगविण्याआधीच करपले आहे. ओलिताची सोय आहे; मात्र शेतातील मोटारपंप मनमानी भारनियमनाने सतत तासभरही चालत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.कान्हापूर - रमणा परिसरातील शेतकरी सध्या रडकुंडीला आले आहे. पाऊस गायब झाला आहे. प्रचंड उकाडा आहे. लावलेले कपाशीचे बियाणे जगविण्यासाठी ओलिताची सोय असूनही पिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांनी मोटारपंप चालू केला व तो दुसऱ्या कामात लागला की काही वेळातच वीज जाते. पुन्हा काही वेळात येते. या हुलकावणीमुळे शेतात लावलेले ठिबक व स्प्रिंंकलर धड काम करीत नाही. प्रत्येक वेळी वीज गेल्यावर पुन्हा-पुन्हा मोटारपंप चालू करण्याची वेळ येते. या कटकटीमुळे पाण्याची सोय असूनही अनेकांनी स्प्रिंकलर व ठिंबक संच लावलेच नाही. ज्यांनी लावले त्यांची योग्य ओलित होत नाही. त्यामुळे अंकुरलेले रोपटे करपून जात आहे. पोटाला चिमटा काढून तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांची काळजी शेतकरी घेत आहे. पण वीजभारनियमनामुळे प्रचंड आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काही भागात चार दिवस सकाळी आणि तीन दिवस रात्री वीज नसते. त्यामुळे रात्ररात्र शेतकरी वर्गाला शेतात थांबाबे लागत आहे. कान्हपूर-रमणा येथील शेतकरी तुकाराम गरड यांनी डोळ्यात आसवे आणून सर्व शेतकऱ्यांचे होत असलेले हाल ‘लोकमत’जवळ कथन केले. वीज वितरण कंपनीच्या मनमानीपणामुळे भारनियमनाचे ऐच्छिक वेळापत्रक तयार करण्यात आले की काय? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. दिवसातून धड दोन तासही सतत वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे त्रस्त झाले आहे. मोटारपंप चालू करूनही धड ओलीत होत नसल्याने हातचे पीक जावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.जमिनीतून बाहेर आलेल्या अंकुरांना पाण्याची गरज आहे. वीज कंपनीने सद्या अघोषित भारनियमन थांबवावे व शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनापासून ही बाब लपलेली नाही. परंतु लक्ष दिले जात नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन भारनियमन थांबवावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)