शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

भारनियमनाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:32 IST

विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न : नियमित विद्युत पुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे. शहरांमध्ये अद्याप भारनियमन सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी ‘इमर्जंसी’च्या नावावर वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.काही दिवसांत कोळशाचा पुरवठा थांबल्याने वीज निर्मितीवर विपरित परिणाम झाला. यामुळे महावितरणद्वारे लगेच ग्रामीण भागात भारनियमनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन वेळात महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे. यामुळे ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात सकाळी तीन तास, दुपारी वा रात्री तीन तास, असे भारनियमनाचे वेळापत्रक आहे; पण या व्यतिरिक्त अन्य वेळीही वीज पुरवठा खंडित केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. शहरांसाठी सध्या भारनियमन नाही, असे विद्युत कार्यालयांकडून सांगितले जात आहे. असे असले तरी दिवसातून एक-दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याशिवाय राहत नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.भारनियमन त्वरित बंद करा; व्यापारी संघटनेची मागणीआष्टी (शहीद) : शहरासह तालुक्यात दुपारी व रात्रीच्या वेळी प्रत्येकी तीन तास सक्तीचे भारनियमन केले जात आहे. याविरूद्ध आष्टी तालुका व्यापारी संघाने महावितरणच्या सहायक अभियंत्याला निवेदन देण्यात आले. यात त्वरित भारनियमन न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.शहरात मागील १५ दिवसांपासून सतत भारनियमन सुरू आहे. सकाळी ३ तास, कधी दुपारी ३ तास तर रात्रीला ३ तास वीज खंडित केली जाते. सायंकाळी ५.१५ ते ८.१५ ही वेळ व्यापाºयांची व्यवसायाची वेळ असते. याच वेळेत भारनियमन केले जात असल्याने नुकसान होत आहे. आष्टीत कुठलाही मोठा उद्योग व व्यवसाय नाही. यामुळे व्यापारी आधीच अडचणीत आले आहेत. त्यात आता विजेचे नवीन संकट उभे ठाकले आहे. ही वेळ त्वरित बदलण्यात यावी, शहरात भारनियमन बंद करावे, अन्यथा वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे. निवेदन देताना संघाचे अध्यक्ष अशोक विजयकर, उपाध्यक्ष अता खान, संजय शिरभाते, सचिव पवन अग्रवाल, शफी अहमद, प्रदीप गुप्ता, नरेश भार्गव, राजेश ठाकरे, धिरज वाडेकर, सागर सिनकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.