शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

भारनियमनाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:32 IST

विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न : नियमित विद्युत पुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे. शहरांमध्ये अद्याप भारनियमन सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी ‘इमर्जंसी’च्या नावावर वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.काही दिवसांत कोळशाचा पुरवठा थांबल्याने वीज निर्मितीवर विपरित परिणाम झाला. यामुळे महावितरणद्वारे लगेच ग्रामीण भागात भारनियमनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन वेळात महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे. यामुळे ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात सकाळी तीन तास, दुपारी वा रात्री तीन तास, असे भारनियमनाचे वेळापत्रक आहे; पण या व्यतिरिक्त अन्य वेळीही वीज पुरवठा खंडित केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. शहरांसाठी सध्या भारनियमन नाही, असे विद्युत कार्यालयांकडून सांगितले जात आहे. असे असले तरी दिवसातून एक-दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याशिवाय राहत नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.भारनियमन त्वरित बंद करा; व्यापारी संघटनेची मागणीआष्टी (शहीद) : शहरासह तालुक्यात दुपारी व रात्रीच्या वेळी प्रत्येकी तीन तास सक्तीचे भारनियमन केले जात आहे. याविरूद्ध आष्टी तालुका व्यापारी संघाने महावितरणच्या सहायक अभियंत्याला निवेदन देण्यात आले. यात त्वरित भारनियमन न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.शहरात मागील १५ दिवसांपासून सतत भारनियमन सुरू आहे. सकाळी ३ तास, कधी दुपारी ३ तास तर रात्रीला ३ तास वीज खंडित केली जाते. सायंकाळी ५.१५ ते ८.१५ ही वेळ व्यापाºयांची व्यवसायाची वेळ असते. याच वेळेत भारनियमन केले जात असल्याने नुकसान होत आहे. आष्टीत कुठलाही मोठा उद्योग व व्यवसाय नाही. यामुळे व्यापारी आधीच अडचणीत आले आहेत. त्यात आता विजेचे नवीन संकट उभे ठाकले आहे. ही वेळ त्वरित बदलण्यात यावी, शहरात भारनियमन बंद करावे, अन्यथा वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे. निवेदन देताना संघाचे अध्यक्ष अशोक विजयकर, उपाध्यक्ष अता खान, संजय शिरभाते, सचिव पवन अग्रवाल, शफी अहमद, प्रदीप गुप्ता, नरेश भार्गव, राजेश ठाकरे, धिरज वाडेकर, सागर सिनकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.