शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

भारनियमनाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:32 IST

विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न : नियमित विद्युत पुरवठ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्युत निर्मितीचा वेग मंदावताच महावितरणने जिल्ह्यात भारनियमनाचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात भारनियमन तथा अवेळी वीज खंडित केली जात असल्याचे चित्र आहे. शहरांमध्ये अद्याप भारनियमन सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी ‘इमर्जंसी’च्या नावावर वीज पुरवठा खंडित केला जात आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.काही दिवसांत कोळशाचा पुरवठा थांबल्याने वीज निर्मितीवर विपरित परिणाम झाला. यामुळे महावितरणद्वारे लगेच ग्रामीण भागात भारनियमनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. सकाळ, दुपार व सायंकाळ अशा तीन वेळात महावितरणकडून भारनियमन केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे. यामुळे ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात सकाळी तीन तास, दुपारी वा रात्री तीन तास, असे भारनियमनाचे वेळापत्रक आहे; पण या व्यतिरिक्त अन्य वेळीही वीज पुरवठा खंडित केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. शहरांसाठी सध्या भारनियमन नाही, असे विद्युत कार्यालयांकडून सांगितले जात आहे. असे असले तरी दिवसातून एक-दोन वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याशिवाय राहत नाही. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.भारनियमन त्वरित बंद करा; व्यापारी संघटनेची मागणीआष्टी (शहीद) : शहरासह तालुक्यात दुपारी व रात्रीच्या वेळी प्रत्येकी तीन तास सक्तीचे भारनियमन केले जात आहे. याविरूद्ध आष्टी तालुका व्यापारी संघाने महावितरणच्या सहायक अभियंत्याला निवेदन देण्यात आले. यात त्वरित भारनियमन न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.शहरात मागील १५ दिवसांपासून सतत भारनियमन सुरू आहे. सकाळी ३ तास, कधी दुपारी ३ तास तर रात्रीला ३ तास वीज खंडित केली जाते. सायंकाळी ५.१५ ते ८.१५ ही वेळ व्यापाºयांची व्यवसायाची वेळ असते. याच वेळेत भारनियमन केले जात असल्याने नुकसान होत आहे. आष्टीत कुठलाही मोठा उद्योग व व्यवसाय नाही. यामुळे व्यापारी आधीच अडचणीत आले आहेत. त्यात आता विजेचे नवीन संकट उभे ठाकले आहे. ही वेळ त्वरित बदलण्यात यावी, शहरात भारनियमन बंद करावे, अन्यथा वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापारी संघाने दिला आहे. निवेदन देताना संघाचे अध्यक्ष अशोक विजयकर, उपाध्यक्ष अता खान, संजय शिरभाते, सचिव पवन अग्रवाल, शफी अहमद, प्रदीप गुप्ता, नरेश भार्गव, राजेश ठाकरे, धिरज वाडेकर, सागर सिनकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.