शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पारा ४७ अंशावर असताना भारनियमन १६ तास

By admin | Updated: June 8, 2014 00:04 IST

जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन

महावितरणचा अफलातून कारभार : विभाग म्हणतो, वर्धा जिल्ह्यात भारनियमनच नाहीवर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन केले जात आहे. या भागातील नागरिकांचे जगणेच मुश्किल झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.खरीप हंगाम सुरू झाला आहे. मृग बरसण्याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. या अनुषंगाने शेतकरी दिवसभर शेतात राबत आहे. ज्यांच्याकडे ओलिताची शेती आहे. त्यांना शेतात पाण्याची गरज आहे; मात्र भारनियमनामुळे तो ओलित करू शकत नाही. सध्या जिल्ह्यातील काही भागात सुरू असलेल्या १४ ते १६ तासांच्या भारनियमनामुळे ओलित कुठून करावे अशी चिंता त्याला आहे. इतक्या तासाच्या भारनियमनामुळे गावकर्‍यांनाही कमालीच्या तापमानाशी झुंज द्यावी लागत आहे. गावांमध्ये बहुतांश घरांचे छप्पर हे टिनाचे आहे. ४७ अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे टिना आगीसारख्या तापत आहे. यामुळे घरात राहणे कठीण झाले आहे. घराबाहेर पडले तर थेट तापमान अंगावर घ्यावे लागते. मोठय़ांनाच या तापमानात दिवस काढणे कठीण असताना लहान मुलांचे तर हालच आहे. एकूणच तापमान आणि अशातच होत असलेल्या भारनियमनामुळे नागरिकांचे जिणे कठीण होऊन बसले आहे.शहरातील नागरिकांना मात्र या भारनियमनाचा फारसा फटका नाही.  शहरातील रस्ते दिवसभर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. या आगीत कोणीही घराबाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही. बाजारपेठांमध्ये दुकानदारांशिवाय एकही ग्राहक फिरकताना दिसत नाही. एकूण वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बिकट परिस्थितीत महावितरण भारनियमन करून या आगीत तेल टाकण्याचे काम करीत आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात भारनियमन करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मागील आठवड्यात  ३ हजार मे.वॅ. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागला, असेही सांगण्यात आले; मात्र आता ही स्थिती राहिली नाही. या आठवड्यापासून भारनियमन होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात भारनियमनाच्या शेड्युलमध्ये ‘डी’ सेक्शनमध्ये मोडत असलेल्या फीडर परिसरात भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागातील दोन, आर्वी आणि वर्धा उपविभागातील प्रत्येकी एक फीडर डी मध्ये येत असल्याने या भागातील शेतकर्‍यांना १४ ते १६ तास भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. ही स्थिती केवळ वर्धेची नसून ती राज्याची असल्याचेही कार्यकारी अभियंता आर. आर. कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)