शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

पारा ४७ अंशावर असताना भारनियमन १६ तास

By admin | Updated: June 8, 2014 00:04 IST

जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन

महावितरणचा अफलातून कारभार : विभाग म्हणतो, वर्धा जिल्ह्यात भारनियमनच नाहीवर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन केले जात आहे. या भागातील नागरिकांचे जगणेच मुश्किल झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.खरीप हंगाम सुरू झाला आहे. मृग बरसण्याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. या अनुषंगाने शेतकरी दिवसभर शेतात राबत आहे. ज्यांच्याकडे ओलिताची शेती आहे. त्यांना शेतात पाण्याची गरज आहे; मात्र भारनियमनामुळे तो ओलित करू शकत नाही. सध्या जिल्ह्यातील काही भागात सुरू असलेल्या १४ ते १६ तासांच्या भारनियमनामुळे ओलित कुठून करावे अशी चिंता त्याला आहे. इतक्या तासाच्या भारनियमनामुळे गावकर्‍यांनाही कमालीच्या तापमानाशी झुंज द्यावी लागत आहे. गावांमध्ये बहुतांश घरांचे छप्पर हे टिनाचे आहे. ४७ अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे टिना आगीसारख्या तापत आहे. यामुळे घरात राहणे कठीण झाले आहे. घराबाहेर पडले तर थेट तापमान अंगावर घ्यावे लागते. मोठय़ांनाच या तापमानात दिवस काढणे कठीण असताना लहान मुलांचे तर हालच आहे. एकूणच तापमान आणि अशातच होत असलेल्या भारनियमनामुळे नागरिकांचे जिणे कठीण होऊन बसले आहे.शहरातील नागरिकांना मात्र या भारनियमनाचा फारसा फटका नाही.  शहरातील रस्ते दिवसभर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. या आगीत कोणीही घराबाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही. बाजारपेठांमध्ये दुकानदारांशिवाय एकही ग्राहक फिरकताना दिसत नाही. एकूण वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बिकट परिस्थितीत महावितरण भारनियमन करून या आगीत तेल टाकण्याचे काम करीत आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात भारनियमन करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मागील आठवड्यात  ३ हजार मे.वॅ. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागला, असेही सांगण्यात आले; मात्र आता ही स्थिती राहिली नाही. या आठवड्यापासून भारनियमन होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात भारनियमनाच्या शेड्युलमध्ये ‘डी’ सेक्शनमध्ये मोडत असलेल्या फीडर परिसरात भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागातील दोन, आर्वी आणि वर्धा उपविभागातील प्रत्येकी एक फीडर डी मध्ये येत असल्याने या भागातील शेतकर्‍यांना १४ ते १६ तास भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. ही स्थिती केवळ वर्धेची नसून ती राज्याची असल्याचेही कार्यकारी अभियंता आर. आर. कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)