शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४७ अंशावर असताना भारनियमन १६ तास

By admin | Updated: June 8, 2014 00:04 IST

जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन

महावितरणचा अफलातून कारभार : विभाग म्हणतो, वर्धा जिल्ह्यात भारनियमनच नाहीवर्धा : जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन केले जात आहे. या भागातील नागरिकांचे जगणेच मुश्किल झाले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.खरीप हंगाम सुरू झाला आहे. मृग बरसण्याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. या अनुषंगाने शेतकरी दिवसभर शेतात राबत आहे. ज्यांच्याकडे ओलिताची शेती आहे. त्यांना शेतात पाण्याची गरज आहे; मात्र भारनियमनामुळे तो ओलित करू शकत नाही. सध्या जिल्ह्यातील काही भागात सुरू असलेल्या १४ ते १६ तासांच्या भारनियमनामुळे ओलित कुठून करावे अशी चिंता त्याला आहे. इतक्या तासाच्या भारनियमनामुळे गावकर्‍यांनाही कमालीच्या तापमानाशी झुंज द्यावी लागत आहे. गावांमध्ये बहुतांश घरांचे छप्पर हे टिनाचे आहे. ४७ अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे टिना आगीसारख्या तापत आहे. यामुळे घरात राहणे कठीण झाले आहे. घराबाहेर पडले तर थेट तापमान अंगावर घ्यावे लागते. मोठय़ांनाच या तापमानात दिवस काढणे कठीण असताना लहान मुलांचे तर हालच आहे. एकूणच तापमान आणि अशातच होत असलेल्या भारनियमनामुळे नागरिकांचे जिणे कठीण होऊन बसले आहे.शहरातील नागरिकांना मात्र या भारनियमनाचा फारसा फटका नाही.  शहरातील रस्ते दिवसभर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. या आगीत कोणीही घराबाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही. बाजारपेठांमध्ये दुकानदारांशिवाय एकही ग्राहक फिरकताना दिसत नाही. एकूण वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या बिकट परिस्थितीत महावितरण भारनियमन करून या आगीत तेल टाकण्याचे काम करीत आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात भारनियमन करण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मागील आठवड्यात  ३ हजार मे.वॅ. विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना भारनियमनाचा फटका सहन करावा लागला, असेही सांगण्यात आले; मात्र आता ही स्थिती राहिली नाही. या आठवड्यापासून भारनियमन होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात भारनियमनाच्या शेड्युलमध्ये ‘डी’ सेक्शनमध्ये मोडत असलेल्या फीडर परिसरात भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागातील दोन, आर्वी आणि वर्धा उपविभागातील प्रत्येकी एक फीडर डी मध्ये येत असल्याने या भागातील शेतकर्‍यांना १४ ते १६ तास भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. ही स्थिती केवळ वर्धेची नसून ती राज्याची असल्याचेही कार्यकारी अभियंता आर. आर. कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)